शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...त्यांचा बंदोबस्त लोकांनी करायचा की मोदींनी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 02:04 IST

पंतप्रधानांचा उपदेश हा अधिकारी वजन असलेला व घटनेची चौकट असणारा असतो.

‘देशातील लोकशाही सुरक्षित ठेवायला सदैव जागे राहा, सतर्क राहा आणि लोकशाहीच्या मूल्यांशी खेळ करीत असणाऱ्यांचा तत्काळ बंदोबस्त करा,’ असा महत्त्वाचा उपदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मासिक ‘मन की बात’मधून परवा देशाला केला. पंतप्रधानांचा उपदेश हा अधिकारी वजन असलेला व घटनेची चौकट असणारा असतो. त्यामुळे प्रत्येकच लोकशाहीप्रेमी व देशभक्त नागरिकाने तो केवळ ऐकून चालणार नाही. त्यांनी तो प्रत्यक्ष अंमलात आणला पाहिजे व आपली लोकशाही परंपरा अक्षुण्ण राखण्यासाठी झटले पाहिजे.

खरे तर आम्हीही पंतप्रधानांच्या त्या उपदेशाने पार भारावून गेलो आहोत. ते भारावणे जसजसे उतरले, तसतसे आम्हाला काही प्रश्न पडू लागले. ते इतरांनाही नक्कीच पडले व पडत असणार. आपल्या किंवा कोणत्याही लोकशाहीला धोका असतो वा संभवतो तो कुणाकडून? त्यात पहिला क्रमांक प्रत्यक्ष सरकारचा, दुसरा बंडखोरांचा, तिसरा दहशतवाद्यांचा, हिंसाचाऱ्यांचा किंवा देश लुटून खाणा-या लबाड धनवंतांचा. जरा विचार केला की लक्षात येते, आपला क्रमांक यात कुठेही नाही.

आपण सरकारात नाही, बंडखोरात नाही, हिंसाचारी दहशतवाद्यात किंवा लुटारू धनवंतातही नाही. तरीही पंतप्रधानांना तो उपदेश करावासा वाटतो, याचे खरे कारण ही सगळी माणसे जरा जास्तीची माजोरी झाली असली पाहिजेत आणि त्यांना आवरणे सरकारला झेपत नसल्याने, ते जनतेची म्हणजे आपली मदत मागत असले पाहिजेत. देशात सरकारनेच आणीबाणी लावून येथील लोकशाही १९७५ मध्ये घालविली, पण तेव्हाच्या सरकारने ती लगेच १९७७ मध्ये मागेही घेतली व लोकशाहीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली.

देशात बंडखोर आहेत, ते नक्षलवाद्यांच्या रूपाने पोलिसांवर व सरकारी यंत्रणांवर हल्ले करतात. देशात फुटीरवादी शक्ती आहेत, त्या काश्मिरात आहेत, मिझोरम आणि मणिपुरात आहेत (पंजाबातील त्यांचा उठाव इंदिरा गांधींनी स्वत:चे प्राण पणाला लावून मोडीत काढला.), देशात हिंसाचार आहे. तो बहुसंख्याकांमधील अतिरेकी व कर्मठांचा आहे. तो उत्तर प्रदेशात आहे, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आहे. उत्तर प्रदेशातील बहुसंख्याकवाद्यांनी अल्पसंख्याकांची सरळसरळ हत्या केली.

मध्य प्रदेश आणि ओरिसात त्यांनी त्यांची पूजास्थाने जाळून उद्ध्वस्त केली. गुजरातमध्ये त्यांनी दलितांना भररस्त्यात बांधून मरेस्तोवर मारहाण केली. शिवाय पंतप्रधानांच्या पक्षाने देशातील सगळी प्रसिद्धी माध्यमे ताब्यात घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच संकोच केला. बातमी द्यायची ती सरकारची, तारीफ करायची ती मोदींची आणि टीका करायची ती विरोधकांवर. सरकारवर टीका करणाºया माध्यमांच्या जाहिराती थांबवायच्या, त्यांच्या संपादकांना हाकलायला लावायचे आणि काही टीकाकारांची चक्क हत्याच करायची.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी किंवा गौरी लंकेश हे लेखक व विचारवंत असेच मारले गेले. प्रणव रॉयसकट अनेक वृत्तपत्रांच्या व संपादकांच्या कार्यालयांवर धाडी पडल्या, वृत्तपत्रांवर नियंत्रणे आली आणि संपादकांवर खटले दाखल झाले. आपल्या चाहत्यांनी टाळ्या पिटल्या की, आपण केले ते बरोबरच आहे, असे पंतप्रधान मोदी समजत असतील, तर त्यांना स्वत:च लोकशाहीची मूल्ये समजून घ्यावी लागतील.

देशातले अनेक बडे धनवंत सरकारी बँका लुटून विदेशात पळून गेले. त्यांच्या तशा पळण्याला सरकारातील वरिष्ठांची मान्यता होती. त्यांनी बँका बुडविल्या. ते काम नक्षलवाद्यांचे नाही, अतिरेक्यांचे नाही किंवा दहशतखोरांचेही नाही. ते सरकारला ठाऊक असलेल्या व सरकारच्या जवळपास वावरणाºया लोकांनी केले. त्यांचा बंदोबस्त करणे ही खरी लोकशाही आहे. हिंसाचार माजविणारे, झुंडींनी खून करणारे, अल्पसंख्याकांची हत्या करणारे, दलितांवर अत्याचार करणारे जे लोक आहेत, तेच खरे लोकशाहीचे मारेकरी आहेत. दुर्दैवाने ते पंतप्रधानांच्या पक्षाला जवळचे आहेत. त्यांचा बंदोबस्त लोकांनी करायचा की मोदींनी?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी