शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

...त्यांचा बंदोबस्त लोकांनी करायचा की मोदींनी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 02:04 IST

पंतप्रधानांचा उपदेश हा अधिकारी वजन असलेला व घटनेची चौकट असणारा असतो.

‘देशातील लोकशाही सुरक्षित ठेवायला सदैव जागे राहा, सतर्क राहा आणि लोकशाहीच्या मूल्यांशी खेळ करीत असणाऱ्यांचा तत्काळ बंदोबस्त करा,’ असा महत्त्वाचा उपदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मासिक ‘मन की बात’मधून परवा देशाला केला. पंतप्रधानांचा उपदेश हा अधिकारी वजन असलेला व घटनेची चौकट असणारा असतो. त्यामुळे प्रत्येकच लोकशाहीप्रेमी व देशभक्त नागरिकाने तो केवळ ऐकून चालणार नाही. त्यांनी तो प्रत्यक्ष अंमलात आणला पाहिजे व आपली लोकशाही परंपरा अक्षुण्ण राखण्यासाठी झटले पाहिजे.

खरे तर आम्हीही पंतप्रधानांच्या त्या उपदेशाने पार भारावून गेलो आहोत. ते भारावणे जसजसे उतरले, तसतसे आम्हाला काही प्रश्न पडू लागले. ते इतरांनाही नक्कीच पडले व पडत असणार. आपल्या किंवा कोणत्याही लोकशाहीला धोका असतो वा संभवतो तो कुणाकडून? त्यात पहिला क्रमांक प्रत्यक्ष सरकारचा, दुसरा बंडखोरांचा, तिसरा दहशतवाद्यांचा, हिंसाचाऱ्यांचा किंवा देश लुटून खाणा-या लबाड धनवंतांचा. जरा विचार केला की लक्षात येते, आपला क्रमांक यात कुठेही नाही.

आपण सरकारात नाही, बंडखोरात नाही, हिंसाचारी दहशतवाद्यात किंवा लुटारू धनवंतातही नाही. तरीही पंतप्रधानांना तो उपदेश करावासा वाटतो, याचे खरे कारण ही सगळी माणसे जरा जास्तीची माजोरी झाली असली पाहिजेत आणि त्यांना आवरणे सरकारला झेपत नसल्याने, ते जनतेची म्हणजे आपली मदत मागत असले पाहिजेत. देशात सरकारनेच आणीबाणी लावून येथील लोकशाही १९७५ मध्ये घालविली, पण तेव्हाच्या सरकारने ती लगेच १९७७ मध्ये मागेही घेतली व लोकशाहीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली.

देशात बंडखोर आहेत, ते नक्षलवाद्यांच्या रूपाने पोलिसांवर व सरकारी यंत्रणांवर हल्ले करतात. देशात फुटीरवादी शक्ती आहेत, त्या काश्मिरात आहेत, मिझोरम आणि मणिपुरात आहेत (पंजाबातील त्यांचा उठाव इंदिरा गांधींनी स्वत:चे प्राण पणाला लावून मोडीत काढला.), देशात हिंसाचार आहे. तो बहुसंख्याकांमधील अतिरेकी व कर्मठांचा आहे. तो उत्तर प्रदेशात आहे, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आहे. उत्तर प्रदेशातील बहुसंख्याकवाद्यांनी अल्पसंख्याकांची सरळसरळ हत्या केली.

मध्य प्रदेश आणि ओरिसात त्यांनी त्यांची पूजास्थाने जाळून उद्ध्वस्त केली. गुजरातमध्ये त्यांनी दलितांना भररस्त्यात बांधून मरेस्तोवर मारहाण केली. शिवाय पंतप्रधानांच्या पक्षाने देशातील सगळी प्रसिद्धी माध्यमे ताब्यात घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच संकोच केला. बातमी द्यायची ती सरकारची, तारीफ करायची ती मोदींची आणि टीका करायची ती विरोधकांवर. सरकारवर टीका करणाºया माध्यमांच्या जाहिराती थांबवायच्या, त्यांच्या संपादकांना हाकलायला लावायचे आणि काही टीकाकारांची चक्क हत्याच करायची.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी किंवा गौरी लंकेश हे लेखक व विचारवंत असेच मारले गेले. प्रणव रॉयसकट अनेक वृत्तपत्रांच्या व संपादकांच्या कार्यालयांवर धाडी पडल्या, वृत्तपत्रांवर नियंत्रणे आली आणि संपादकांवर खटले दाखल झाले. आपल्या चाहत्यांनी टाळ्या पिटल्या की, आपण केले ते बरोबरच आहे, असे पंतप्रधान मोदी समजत असतील, तर त्यांना स्वत:च लोकशाहीची मूल्ये समजून घ्यावी लागतील.

देशातले अनेक बडे धनवंत सरकारी बँका लुटून विदेशात पळून गेले. त्यांच्या तशा पळण्याला सरकारातील वरिष्ठांची मान्यता होती. त्यांनी बँका बुडविल्या. ते काम नक्षलवाद्यांचे नाही, अतिरेक्यांचे नाही किंवा दहशतखोरांचेही नाही. ते सरकारला ठाऊक असलेल्या व सरकारच्या जवळपास वावरणाºया लोकांनी केले. त्यांचा बंदोबस्त करणे ही खरी लोकशाही आहे. हिंसाचार माजविणारे, झुंडींनी खून करणारे, अल्पसंख्याकांची हत्या करणारे, दलितांवर अत्याचार करणारे जे लोक आहेत, तेच खरे लोकशाहीचे मारेकरी आहेत. दुर्दैवाने ते पंतप्रधानांच्या पक्षाला जवळचे आहेत. त्यांचा बंदोबस्त लोकांनी करायचा की मोदींनी?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी