शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

मान्सूनच्या आविष्काराची नासाडी नको!

By वसंत भोसले | Updated: June 12, 2018 00:44 IST

मान्सूनचा पाऊस हा निसर्गाचा आविष्कार. त्याला प्रतिसाद द्यायला हवा. त्याची साठवणूक केली, पण जपणूक करण्यास आपण शिकलो नाही. तो दरवर्षी मान्सूनच्या आगमनाच्या प्रतीक्षेत जूनचा महिना सुरू होतो. ७ जूनला मृग नक्षत्राचा प्रारंभ होतो. पेरण्यांची धांदल सुरू करण्यासाठी नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या जोराबरोबर येणा-या ढगांकडे डोळे लागलेले असतात. तो प्रथम लक्षद्वीप समूहाच्या बेटावर येतो. दिवस उगवेल तेव्हाच आपण निसर्गाची आराधना केली असे होईल. '

दरवर्षी मान्सूनच्या आगमनाच्या प्रतीक्षेत जूनचा महिना सुरू होतो. ७ जूनला मृग नक्षत्राचा प्रारंभ होतो. पेरण्यांची धांदल सुरू करण्यासाठी नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या जोराबरोबर येणा-या ढगांकडे डोळे लागलेले असतात. तो प्रथम लक्षद्वीप समूहाच्या बेटावर येतो. केरळमध्ये प्रवेश करतो. एका सप्ताहात तो धावत धावत कोकण किनारपट्टीवरून पश्चिम घाटाला गवसणी घालतो. संपूर्ण कोकणाला ओलेचिंब करीत घाटमाथ्यावर बरसायला सुरुवात करतो आणि त्याच्या आविष्काराबरोबर कडक उन्हाने तावून निघालेल्या जमिनीचा नूरच बदलून जातो.घाटमाथ्यावर एव्हाना पेरण्यांची तयारी झालेली असते. नद्यांच्या पात्रातील कोल्हापुरी टाईप बंधा-यांच्या फळ्या काढून मान्सूनच्या पावसाच्या सरींनी धो धो वाहणा-या पाण्याला वाट करून दिलेली असते. धरणांचे दरवाजे बंद करून साठा करण्याची तयारी होते. या साठ्याची दररोज सुरू होते मोजदाद. गेल्या चोवीस तासात पडलेल्या पावसाची रोज सकाळी ८ वाजता आकडेवारी जाहीर होते.हा मान्सून पुढे विंध्य पर्वतापर्यंत धावत जातो. त्याला अडून खानदेश आणि विदर्भाची काळीभोर जमीन ओली करून सोडतो. पूर्व विदर्भातील जंगलात तर तो धो धो कोसळतो. दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधनाने निर्माण झालेले वाण पेरले जाते. त्याला धान म्हणतात. अशी ही उत्तम शेती पिकविणारा मान्सूनचा पाऊसच दैवत आहे.चालूवर्षी तो वेळेवर आला आहे. नद्या-नाल्यांना तांबडे पाणी वाहू लागले आहे. हा मान्सून दूरवर अद्याप पोहोचायचा आहे. तो अगदी भारताच्या अतिपूर्वेकडील ईशान्य प्रांतापर्यंत जाणार आहे. महाराष्टÑाचा क्रमांक केरळ, कर्नाटक आणि गोव्यानंतर लागतो. त्यामुळे खरीप हंगामाचा हमखास पेरा होतो. गेल्या काही वर्षात तो वेळेवर आला नाही. पुरेसा बरसला नाही. परतीचा पाऊसही वेळेवर पडला नाही. त्याचा फटका पिकांना बसला.असा हा मान्सून मराठी माणसाच्या जीवनाचा भाग झाला आहे. कृष्णा, गोदावरी आणि नर्मदा नद्यांच्या खोºयातील सर्व नद्या तो वाहत्या करतो आहे. त्यावर बांधलेल्या धरणांची कवाडे भरतो आहे. ते पाणी आपण वर्षभर वापरतो आहोत. मान्सून निसर्गदत्त आहे. त्याचे पाणी म्हणजे नैसर्गिक आविष्कारच आहे. तो भरभरून देतो. कृष्णा खोºयात तर जवळपास चार हजार टीएमसी पाणी वापरण्यायोग्य देतो. जमिनीत मुरणारे, विहिरीत साचणारे याची गणती किती तरी अधिक पटीची असणार आहे. त्या पाण्याचा वापर करताना मात्र आपण गैर वागतो आहे. निसर्गाने दिलेली ही देणगी नाश होणार नाही, खराब होणार नाही याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो आहोत. गंगा आणि यमुना नद्यांच्या खोºयाप्रमाणेच कृष्णा नदीच्या खोºयातील सर्वच नद्यांचे साठविलेले पाणी खराब करीत आहोत. ते वापरून परत नद्यांमध्ये सोडून मूळ प्रवाहच नष्ट करीत आहोत. येत्या काही दिवसांत इतिहासप्रसिद्ध शाहूकालीन राधानगरीचे धरण तुडुंब भरेल. कोयना धरण भर भर भरत जाईल. पंचगंगेवरील पाचही धरणे महिन्याभरात भरून वाहू लागतील. या पाण्यावर ऊसशेती फुलणार आहे. माणसाची आणि पशु-पक्ष्यांची तहान भागणार आहे. उद्योगांना पाणी मिळणार आहे. त्याची नासाडी व्हायला नको! निसर्गाच्या या आविष्काराला प्रतिसाद द्यायला हवा. त्याची साठवणूक केली, पण जपणूक करण्यास अद्याप आपण शिकलो नाही. तो दिवस उगवेल तेव्हाच आपण निसर्गाची आराधना केली असे होईल. मान्सूनच्या आगमनाचे स्वागत करताना हा निर्धार करू या!(bhosalevasant@gmail.com)

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊस