शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘पाकिस्तानशी चर्चा नको’ हे धोरण चुकीचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 05:11 IST

भारताने पाकिस्तानबरोबर बोलणी करावी का? भारताच्या विरोधात दहशतवादाचे समर्थन जोपर्यंत पाकिस्तानकडून होत आहे, तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करू नये, ही पारंपरिक विचारधारा आहे. सध्या तरी आपण याच धोरणाचा अंगीकार करताना दिसतो.

-पवन के. वर्मा(राजकीय विश्लेषक)भारतानेपाकिस्तानबरोबर बोलणी करावी का? भारताच्या विरोधात दहशतवादाचे समर्थन जोपर्यंत पाकिस्तानकडून होत आहे, तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करू नये, ही पारंपरिक विचारधारा आहे. सध्या तरी आपण याच धोरणाचा अंगीकार करताना दिसतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण समारंभाला पाकिस्तानला निमंत्रण देण्यात आले नव्हते. बोलणी सुरू व्हावीत, याविषयी पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी पाठविलेल्या संदेशांना भारताने प्रत्युत्तर दिले नाही. बिश्केकपरिषदेसाठी जाताना नरेंद्र मोदींच्या विमानाला पाकिस्तानातील हवाई हद्दीतून जाऊ देण्याचा पाकिस्तानचा देकार मोदींनी नाकारला. इतकेच नव्हे, तर बिश्केक येथील शांघाय सहकार्य शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांची अधिकृत वा अनधिकृत बैठक होऊ शकली नाही!भारताच्या विरोधात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे दिसत असताना (अलीकडच्या पुलवामा हल्ल्यात तो स्पष्टच होता.) आपली कडक भूमिका योग्यच म्हणावी लागेल. बोलणी आणि दहशतवाद एकत्र नांदू शकत नाही, हा संदेश पाकिस्तानपर्यंत पोचायलाच हवा. यापूर्वी भारताने जसे पाकिस्तानला माफ करून विसरून जाण्याचे धोरण स्वीकारले होते आणि पाकिस्तानसोबत साधारण स्थिती लागू करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच धोरणाची पाकिस्तानची अपेक्षा होती, पण अशा मवाळ भूमिकेमुळेच पाकिस्तानने एकीकडे आक्रमक दहशतवादी हल्ले करतानाच, दुसरीकडे भारताचे लांगुलचालन करण्याची नीती अवलंबिली होती. या भूमिकेचा आपण त्याग करून कठोर भूमिकेचा स्वीकार करायला हवा.पण असे असले, तरी शेजारी राष्ट्रांच्या दोन्ही नेत्यांनी बालिशपणा करून एकमेकांविरुद्धच्या शत्रुत्वाच्या भावनेचे प्रदर्शन जगासमोर करणे कितपत योग्य होते? शांघाय शिखर परिषदेत इम्रानखान आणि नरेंद्र मोदी यांनी एकमेकांना अभिवादनही केले नाही, ही गोष्ट पुतिन की जिनपिंग आणि अन्य जागतिक नेत्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितली! पूर्व नियोजित किंवा साधारण चर्चा करण्याचे आपले धोरण नसले, तरी शिखर परिषदेसारख्या महत्त्वाच्या बैठकीत शत्रूराष्ट्रांनी मूलभूत शिष्टाचाराचे पालन न करण्याइतक्या गोष्टी ताणायला हव्यात का? चर्चा करायची की करायची नाही, हा राष्ट्राच्या धोरणाचा भाग असू शकतो. त्याचे काय परिणाम होतील, ते भोगण्याचीही तयारी ठेवावी लागते. अशा वेळी राष्ट्राचे हित हेच सर्वात महत्त्वाचे असते. चर्चेने राष्ट्रहित जर साधणार असेल, तर आपण बोलायला हवे. ते होत नसेल तर बोलायची गरज नाही. अशा निर्णयाचे काय परिणाम होतील, त्याची योग्य तपासणी करून मगच त्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा.याबाबत चाणक्य नीती काय होती, ती समजून घेण्याची गरज आहे. राजकारणात चर्चा करणे, चर्चा न करणे ही काही अंतिम स्थिती राहू शकत नाही. मुख्य दृष्टी राष्ट्रीय हित साधण्याची हवी. चाणक्याचे धोरण त्यांच्या साम, दाम, दंड, भेद या चार तत्त्वांत सामावलेले आहे. तडजोड, आमिष दाखवून, शासन करून किंवा विध्वंसाने गोष्ट साध्य करा, असे चाणक्यांचे म्हणणे होते. त्यात आणखी एक पाचवा पर्याय म्हणजे कुंपणावर बसण्याचा. चांगल्या परराष्ट्र धोरणात या तत्त्वांचा वापर केला जातो. बालाकोटवरील हल्ला हे ‘दंड’ तत्त्वाचे चांगले उदाहरण आहे. त्याचा पुढचा भाग म्हणून पाकिस्तानने चर्चेचा पुढे केलेला हात आपण नाकारत असतो!पण ‘दंड’ धोरण हे नेहमीसाठी उपयुक्त ठरते काय? पुलवामासारखे हल्ले आपल्या भूभागात होत राहिले, तर बालाकोटसारखे प्रतिहल्ले करण्यात काहीच चुकीचे नाही, पण प्रत्येक बाबतीत पाकिस्तानला अस्पृश्यतेची वागणूक दिल्याने दंडनीती निष्प्रभ ठरण्याची शक्यता असते, तसेच भारताशी चांगले संबंध ठेवण्याची आमची इच्छा आहे, पण भारतच त्याला तयार नाही, असा डिंडीम जागतिक पातळीवर वाजविणे पाकिस्तानला शक्य होते. दोन अण्वस्त्र सज्ज राष्ट्रे सतत भांडणाच्या स्थितीत असणे हा साºया जगासाठी चिंतेचा विषय ठरतो. सर्वात चांगले धोरण हे राहील की, आपण निवडलेल्या वेळेला आपल्या अटींवर आणि अजेंड्यावर चर्चा करण्याची आपण तयारी ठेवणे. या अजेंड्यात दहशतवादाच्या मुद्द्याला प्राधान्य असावे. त्यामुळे भारत हा तडजोडीसाठी तयार आहे, हे जगाच्या लक्षात येईल.आपले पंतप्रधान कोणतेही नियोजन नसताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विमानाने त्या देशात जातात आणि दुसºया खेपेस त्या देशाच्या नव्या प्रधानमंत्र्यांना शुभेच्छाही देण्यासाठी जात नाहीत! भावनात्मकता आणि नियोजन किंवा आत्मप्रेरणेने वागणे आणि दीर्घमुदतीचे धोरण बाळगणे या गोष्टी तेल आणि पाण्यासारख्या असतात. त्या एकमेकात मिसळत नाहीत, ही चाणक्याची शिकवण आपण लक्षात ठेवायला हवी. मला वाटते परस्परांना शुभेच्छाही न देण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय समुदायासमोर एकमेकांच्या डोळ्यालाही डोळा न भिडविण्याच्या आपल्या धोरणाचा आपण फेरविचार करायला हवा. मुत्सद्दीपणा हे आपले धोरण असायला हवे. त्यात बालिशपणा नसावा. मुत्सद्दीपणात निर्धाराची अपेक्षा असते, आवश्यक त्या सामाजिक जाणिवांचा अभाव त्यात नसावा, मग शेजारी राष्ट्रांसोबतचे प्रश्न कोणतेही असोत!

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद