शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ताजमहालला ‘द्वेषाचे प्रतीक’बनवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:27 IST

ताजमहालकडे एक कलाकृती म्हणून बघितले गेले पाहिजे. जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीयांची आहे. आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी त्याला ‘द्वेषाचे प्रतीक’ बनविण्याचा प्रयत्न कुणी करू नये.

- सविता देव हरकरेताजमहालवर आपला हक्क सांगणाऱ्या सुन्नी वक्फ मंडळाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले हे फार चांगले झाले. ताजमहालवर हक्क हवा असेल तर आधी शहाजहाँची स्वाक्षरी असलेले दस्तावेज सादर करा असा आदेशच न्यायालयाने दिला. उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ मंडळाने २००५ साली ताजमहाल ही मंडळाची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. एवढेच नाहीतर शहाजहाँने या वास्तूचा मालकी हक्क मंडळाच्या सुपूर्द केला होता असा दावाही केला होता. ताजमहालवर दावा सांगण्याचा प्रकार यापूर्वीही घडला आहे. ताजमहाल हा तेजोमहाल अर्थात श्रीशंकराचे देवस्थान असल्याचा जावईशोध या देशातील काही उपद्रवींनी लावला होता. न्यायालयाने तो सुद्धा फेटाळून लावला. आग्रा येथील ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. सतराव्या शतकात मुघल सम्राट शाहजहाँने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मृती जपण्यासाठी अप्रतिम अशा ताजमहालची निर्मिती केली होती. तेव्हापासून ही वास्तू देशविदेशातील कलाप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. परंतु अलीकडच्या काळात या ऐतिहासिक वास्तूवर नैसर्गिक आघातांसोबतच धार्मिक आणि राजकीय आघातही मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. तिचा इतिहास बदलण्याचे मनसुबे आखले जात आहेत. पुरातत्त्व विभाग आणि न्यायालयाने ताजमहालकडे वक्रदृष्टी टाकणाºया उपद्रवींचे नापाक इरादे वेळोवेळी उधळून लावले, हे खरे. पण कुणीही यावे टिकली मारूनी जावे असला प्रकार ताजमहालच्या बाबतीत सध्या अनुभवास येत असून हे या देशाचे आणि ही अप्रतिम वास्तू निर्माण करणाºया कलाकारांचे दुर्दैवच म्हणायचे. ताजमहालला राजकीय खेळीचा सामना करावा लागेल याचा तरी विचार कुणी केला होता का? पण तेही घडतेय. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यानंतर तर ताजमहालला वाळीत टाकण्याचा जणू चंगच बांधण्यात आला. या राज्यातील पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळण्यात आले. विदेशी पाहुण्यांना भेट स्वरुपात ताजमहालची प्रतिकृती देण्याची परंपरा जाणीवपूर्वक मोडीत काढण्याचा असांस्कृतिक प्रकारही घडला. पर्यावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे शतकांपासून मोठ्या डौलाने उभ्या असलेल्या या वास्तूचे अस्तित्व तसेच धोक्यात आले आहे. तिचे मूळ रूपात जतन करण्याचे सर्वंकष प्रयत्न पुरातत्त्व विभागाकडून सुरु असले तरी प्रदूषणाच्या भीषणतेपुढे ते थिटे पडतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. परवा आलेल्या वादळात ताजमहालच्या प्रवेशद्वाराचे मिनार कोसळले अन् पांढºया रंगाचा छोटा घुमटही पडून तुटला. केवळ भारतवंशाचीच नव्हे साºया जगाची शान समजल्या जाणाºया ताजमहालच्या जपणुकीचे प्रयत्न पुरातत्त्व विभागाकडून सरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे ताजमहाल भविष्यातही असंख्य वर्षे असाच डौलाने उभा राहील, याबद्दल शंका नाही. पण त्याच्यावर होणारे धार्मिक आणि राजकीय आघात तसेच मिळणाºया परकेपणाच्या वागणुकीचे काय? ताजमहालकडे एक कलाकृती म्हणून बघितले गेले पाहिजे. जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीयांची आहे. आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी त्याला ‘द्वेषाचे प्रतीक’ बनविण्याचा प्रयत्न कुणी करू नये.

टॅग्स :Taj MahalताजमहालIndiaभारत