शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दहावीतील विद्यार्थ्यांच्या कलमापनाचा कल शिक्षण खात्याला कळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 21:18 IST

मुलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे हे सर्वजण सांगतात.

- धर्मराज हल्लाळेमुलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे हे सर्वजण सांगतात. परंतु अनेकदा मुलांना काय कळते, असा समज असलेले पालकच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. अशा परिस्थितीत शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेऊन मुलांना पुढील दिशा ठरविण्याचा हक्क दिला, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु, निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची, याची स्पष्टता नसल्याने थेट विद्यार्थ्यांना लाभ कसा मिळेल हा प्रश्न आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलमापन चाचणी हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो़ज्याद्वारे विद्यार्थ्यांची अभिरूची शोधली जाते. परिणामी विद्यार्थ्यांना दहावीनंतर कोणते करिअर निवडावे याची दिशा मिळते, अशी अपेक्षा असते. मात्र शिक्षण मंडळाकडे स्पष्टतेचा अभाव असल्याने कलमापनाचा कल शिक्षण खात्यालाच कळेना की काय असे वाटते.आज पालक जागरूक आहेत. मुलेही हुशार आहेत. मात्र शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये अजूनही दहावीनंतर पुढे काय करावे, या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी व पालकांना सापडत नाही. पारंपरिक शिक्षण घ्यावे की व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावा हा प्रश्न असतो. शिक्षणाचे माध्यम, पद्धती, अभ्यासक्रमातील फरक यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विषम शिक्षण व्यवस्था पेरलेली आहे. केवळ वर्गनिहाय विचार करून सर्वांना दहावीनंतर एका रांगेत उभे करून त्यांची तुलना करणे अन्यायकारक आहे. जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, इंग्रजी शाळा हा फरक शालेय शिक्षणात आहे. सीबीएसई तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या शाळांमधील पालक नानाविध प्रकारे मुलांच्या कलमापन चाचण्या करून घेतात. मुलेही तितकीच हुशार असतात, त्यांचे कुठल्या दिशेने जायचे ठरलेले असते. प्रश्न ग्रामीण भागातील शाळांचा आहे. निश्चितच तेथील मुलांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. मुलाची आवड पाहून त्याच्या अभ्यासक्रमाची निवड झाली पाहिजे. त्याचसाठी शिक्षण मंडळ, विद्या प्राधिकरण व श्यामची आई फाऊंडेशन कलमापन चाचण्या घेते. जे विद्यार्थी दहावीला आहेत त्यांच्यासाठीची ही चाचणी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ही चाचणी घेतली गेली. आता ही चाचणी मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार आहे. परंतु, प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना मोबाईल कोठून मिळणार हा विषय आहे. शाळांनी टप्प्याटप्प्यांनी विद्यार्थ्यांकडून ही चाचणी पूर्ण करून घ्यायची आहे. यापूर्वी संगणकाद्वारे ही चाचणी झाली. परंतु, त्यातील अडचणी समोर ठेवून मोबाईल अ‍ॅपचा निर्णय घेतला. त्याचे स्वागतही होत आहे. मात्र मोबाईल शिक्षकांनी उपलब्ध करून द्यायचा की शिक्षण विभागाकडून मिळेल, हा सवाल आहे.शासन अडचणी दूर करेल. शिक्षकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देईल. चाचणीसाठी योग्य प्रशिक्षण होईल. ज्यामुळे कलमापन चाचणी योग्यरीत्या पूर्ण होईल. हे सर्व गृहित धरले तरी कलमापन चाचणीतून येणाऱ्या निष्कर्षावर पुढे कसे काम होते, यावरच निर्णयाचे फलित अवलंबून आहे. विद्यार्थ्यांचा कल आणि त्यांचा निर्णय अंतिम असला पाहिजे. तरच शिक्षणाचा मूलभूत हेतू सफल होईल आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणही दूर होईल.