शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

बिघडलेले आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:04 IST

सामान्य माणसाला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्य सेवेचे जाळे, पुरेसा औषधीसाठा, योजनांची यंत्रणा राबविण्यात येत असली तरी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या ‘आरोग्यात’ सुधारणा होण्याचे नाव नाही. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चालली आहे. परंतु अचूक निदान व योग्य उपचार करण्याऐवजी तात्पुरत्या मलमपट्टीवर भर दिला जात आहे.

सामान्य माणसाला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्य सेवेचे जाळे, पुरेसा औषधीसाठा, योजनांची यंत्रणा राबविण्यात येत असली तरी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या ‘आरोग्यात’ सुधारणा होण्याचे नाव नाही. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चालली आहे. परंतु अचूक निदान व योग्य उपचार करण्याऐवजी तात्पुरत्या मलमपट्टीवर भर दिला जात आहे. भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढले हे बरे झाले. किमान सामान्य माणसाची व्यथा आणि वेदना खडसे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ही यंत्रणा हलेल ही अपेक्षा नव्हतीच. कारण झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? आता हेच पहा ना! राज्याचे कार्यक्षम आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत हे गेल्या महिन्यात एकदाचे नंदुरबार दौऱ्यावर आले. यापूर्वी दोनदा त्यांचा दौरा रद्द झाला होता. त्यामुळे या दौ-याचे कौतुक होते. नंदुरबारला त्यांनी आढावा बैठक घेतली आणि अक्कलकुव्यात पाहणी केली. अनेक आश्वासने दिली. पण मंत्र्यांची आश्वासनेच ती, अंमलात येतील तेव्हाच खरे मानायचे. मंत्र्यांची पाठ फिरताच सजग आणि सतर्क झालेली आरोग्य यंत्रणा पुन्हा सुस्तावली. काही जागरुक, कर्तव्यतत्पर अधिका-यांनी नर्मदा काठच्या आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या असता काही केंद्रांना नेहमीप्रमाणे कुलूप आढळले. जी केंद्रे चक्क उघडी होती, तिथे अधिकारी वा कर्मचारी नव्हते. जिथे हजर होते, तेथील औषधी मुदतबाह्य होती. अशी यंत्रणा ‘सक्षम’ असेल तर आदिवासी बांधवांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांमधील कुपोषणाची समस्या सुटलीच म्हणून समजा. धुळ्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीनंतर जिल्हा रुग्णालयाच्या जागेत होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात नवीन पदे भरली गेली नाही, होती ती पदे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग झाली. आता महाविद्यालय गावाबाहेर गेले आणि जिल्हा रुग्णालय मोजके वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आणि अपु-या औषधी साठ्यासह नागरिकांच्या असंतोषाला सामोरे जात आहे. हीच परिस्थिती पुढे जाऊन जळगावात निर्माण होणार आहे हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. वैद्यकीय महाविद्यालय चिंचोलीला गेल्यावर गावातील सामान्य रुग्णालय रुग्णांना सोयीचे ठरणार आहे. पण तेथेही धुळ्यासारखीच स्थिती होईल. आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन खात्यांमध्ये सामान्य माणसाचे आरोग्य विभागले गेल्याचे चित्र आहे. आरोग्य शिबिरे आणि आरोग्यदूतांची संख्या वाढत असताना रुग्णालये सक्षम कशी होतीत, हे बघायला कुणाला वेळ नाही. निवडणुकीच्या राजकारणात आणि सवंग लोकप्रियतेच्या काळात आरोग्य शिबिरे भरविणे, रुग्णवाहिकेद्वारे मुंबईला नेणे सोयीचे ठरते. पण योग्य उपचार, औषधी मिळतील, याची शाश्वती कोण देणार? हा प्रश्न आहेच.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव