शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

बिघडलेले आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:04 IST

सामान्य माणसाला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्य सेवेचे जाळे, पुरेसा औषधीसाठा, योजनांची यंत्रणा राबविण्यात येत असली तरी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या ‘आरोग्यात’ सुधारणा होण्याचे नाव नाही. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चालली आहे. परंतु अचूक निदान व योग्य उपचार करण्याऐवजी तात्पुरत्या मलमपट्टीवर भर दिला जात आहे.

सामान्य माणसाला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्य सेवेचे जाळे, पुरेसा औषधीसाठा, योजनांची यंत्रणा राबविण्यात येत असली तरी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या ‘आरोग्यात’ सुधारणा होण्याचे नाव नाही. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चालली आहे. परंतु अचूक निदान व योग्य उपचार करण्याऐवजी तात्पुरत्या मलमपट्टीवर भर दिला जात आहे. भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढले हे बरे झाले. किमान सामान्य माणसाची व्यथा आणि वेदना खडसे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ही यंत्रणा हलेल ही अपेक्षा नव्हतीच. कारण झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? आता हेच पहा ना! राज्याचे कार्यक्षम आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत हे गेल्या महिन्यात एकदाचे नंदुरबार दौऱ्यावर आले. यापूर्वी दोनदा त्यांचा दौरा रद्द झाला होता. त्यामुळे या दौ-याचे कौतुक होते. नंदुरबारला त्यांनी आढावा बैठक घेतली आणि अक्कलकुव्यात पाहणी केली. अनेक आश्वासने दिली. पण मंत्र्यांची आश्वासनेच ती, अंमलात येतील तेव्हाच खरे मानायचे. मंत्र्यांची पाठ फिरताच सजग आणि सतर्क झालेली आरोग्य यंत्रणा पुन्हा सुस्तावली. काही जागरुक, कर्तव्यतत्पर अधिका-यांनी नर्मदा काठच्या आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या असता काही केंद्रांना नेहमीप्रमाणे कुलूप आढळले. जी केंद्रे चक्क उघडी होती, तिथे अधिकारी वा कर्मचारी नव्हते. जिथे हजर होते, तेथील औषधी मुदतबाह्य होती. अशी यंत्रणा ‘सक्षम’ असेल तर आदिवासी बांधवांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांमधील कुपोषणाची समस्या सुटलीच म्हणून समजा. धुळ्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीनंतर जिल्हा रुग्णालयाच्या जागेत होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात नवीन पदे भरली गेली नाही, होती ती पदे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग झाली. आता महाविद्यालय गावाबाहेर गेले आणि जिल्हा रुग्णालय मोजके वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आणि अपु-या औषधी साठ्यासह नागरिकांच्या असंतोषाला सामोरे जात आहे. हीच परिस्थिती पुढे जाऊन जळगावात निर्माण होणार आहे हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. वैद्यकीय महाविद्यालय चिंचोलीला गेल्यावर गावातील सामान्य रुग्णालय रुग्णांना सोयीचे ठरणार आहे. पण तेथेही धुळ्यासारखीच स्थिती होईल. आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन खात्यांमध्ये सामान्य माणसाचे आरोग्य विभागले गेल्याचे चित्र आहे. आरोग्य शिबिरे आणि आरोग्यदूतांची संख्या वाढत असताना रुग्णालये सक्षम कशी होतीत, हे बघायला कुणाला वेळ नाही. निवडणुकीच्या राजकारणात आणि सवंग लोकप्रियतेच्या काळात आरोग्य शिबिरे भरविणे, रुग्णवाहिकेद्वारे मुंबईला नेणे सोयीचे ठरते. पण योग्य उपचार, औषधी मिळतील, याची शाश्वती कोण देणार? हा प्रश्न आहेच.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव