शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

बिघडलेले आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:04 IST

सामान्य माणसाला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्य सेवेचे जाळे, पुरेसा औषधीसाठा, योजनांची यंत्रणा राबविण्यात येत असली तरी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या ‘आरोग्यात’ सुधारणा होण्याचे नाव नाही. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चालली आहे. परंतु अचूक निदान व योग्य उपचार करण्याऐवजी तात्पुरत्या मलमपट्टीवर भर दिला जात आहे.

सामान्य माणसाला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्य सेवेचे जाळे, पुरेसा औषधीसाठा, योजनांची यंत्रणा राबविण्यात येत असली तरी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या ‘आरोग्यात’ सुधारणा होण्याचे नाव नाही. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चालली आहे. परंतु अचूक निदान व योग्य उपचार करण्याऐवजी तात्पुरत्या मलमपट्टीवर भर दिला जात आहे. भाजपाचे असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढले हे बरे झाले. किमान सामान्य माणसाची व्यथा आणि वेदना खडसे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ही यंत्रणा हलेल ही अपेक्षा नव्हतीच. कारण झोपलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? आता हेच पहा ना! राज्याचे कार्यक्षम आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत हे गेल्या महिन्यात एकदाचे नंदुरबार दौऱ्यावर आले. यापूर्वी दोनदा त्यांचा दौरा रद्द झाला होता. त्यामुळे या दौ-याचे कौतुक होते. नंदुरबारला त्यांनी आढावा बैठक घेतली आणि अक्कलकुव्यात पाहणी केली. अनेक आश्वासने दिली. पण मंत्र्यांची आश्वासनेच ती, अंमलात येतील तेव्हाच खरे मानायचे. मंत्र्यांची पाठ फिरताच सजग आणि सतर्क झालेली आरोग्य यंत्रणा पुन्हा सुस्तावली. काही जागरुक, कर्तव्यतत्पर अधिका-यांनी नर्मदा काठच्या आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या असता काही केंद्रांना नेहमीप्रमाणे कुलूप आढळले. जी केंद्रे चक्क उघडी होती, तिथे अधिकारी वा कर्मचारी नव्हते. जिथे हजर होते, तेथील औषधी मुदतबाह्य होती. अशी यंत्रणा ‘सक्षम’ असेल तर आदिवासी बांधवांचे आरोग्य आणि त्यांच्या मुलांमधील कुपोषणाची समस्या सुटलीच म्हणून समजा. धुळ्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीनंतर जिल्हा रुग्णालयाच्या जागेत होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात नवीन पदे भरली गेली नाही, होती ती पदे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग झाली. आता महाविद्यालय गावाबाहेर गेले आणि जिल्हा रुग्णालय मोजके वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आणि अपु-या औषधी साठ्यासह नागरिकांच्या असंतोषाला सामोरे जात आहे. हीच परिस्थिती पुढे जाऊन जळगावात निर्माण होणार आहे हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. वैद्यकीय महाविद्यालय चिंचोलीला गेल्यावर गावातील सामान्य रुग्णालय रुग्णांना सोयीचे ठरणार आहे. पण तेथेही धुळ्यासारखीच स्थिती होईल. आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन खात्यांमध्ये सामान्य माणसाचे आरोग्य विभागले गेल्याचे चित्र आहे. आरोग्य शिबिरे आणि आरोग्यदूतांची संख्या वाढत असताना रुग्णालये सक्षम कशी होतीत, हे बघायला कुणाला वेळ नाही. निवडणुकीच्या राजकारणात आणि सवंग लोकप्रियतेच्या काळात आरोग्य शिबिरे भरविणे, रुग्णवाहिकेद्वारे मुंबईला नेणे सोयीचे ठरते. पण योग्य उपचार, औषधी मिळतील, याची शाश्वती कोण देणार? हा प्रश्न आहेच.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव