शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

एक मुलखावेगळी मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 04:12 IST

मजल दरमजल करत आम्ही मनाने परवा दिल्लीचा फेरफटका मारून आलो. द्वापारयुगात नारदांचा जसा त्रिलोकी संचार असायचा, तसा कलयुगी आमचा असतो. समर्थांच्या कृपेने कल्पनाशक्तीच्या जोरावर अवघे ब्रह्मांड मनचक्षुसमोर उभे करण्याचे सामर्थ्य आम्हांस लाभले आहे.

- नंदकिशोर पाटीलमजल दरमजल करत आम्ही मनाने परवा दिल्लीचा फेरफटका मारून आलो. द्वापारयुगात नारदांचा जसा त्रिलोकी संचार असायचा, तसा कलयुगी आमचा असतो. समर्थांच्या कृपेने कल्पनाशक्तीच्या जोरावर अवघे ब्रह्मांड मनचक्षुसमोर उभे करण्याचे सामर्थ्य आम्हांस लाभले आहे. कळी लावणे, कलागती करणे यात तर आमचा भारीच हातखंडा! किंबहुना, तोच आमच्या धंद्याचा कोडमंत्र. असो. तर सांगायचा मुद्दा असा की, राजधानी दिल्लीतील १० अकबर रोडवर भटकत असताना काहीतरी तळल्याचा (जळल्याचा नव्हे!) घमघमाट सुटला होता. जमेल तेवढे नाक फुगवून आम्ही अदमास घेण्याचा प्रयत्न केला असता कुणाच्या तरी घरी पकोडे, भुजिया, फाफडाचा बेत शिजत असल्याचे जाणवले. खात्री पटावी म्हणून फाटकामागून फाटकं किनकिनी करत आम्ही तिथल्या बंगल्यांमध्ये नाक खुपसले. काहींना आमचे असे नको तिथे नाक खुपसणे न खुपल्यामुळे त्यांनी फटीतूनच फटके मारले. नशीब बलवत्तर. अन्यथा, आम्हीही शूर्पणखा झालो असतो! असो. शेवटी त्या बंगल्यात आम्ही गनिमी काव्याने प्रवेश केला. अहाहा!! काय तो मिष्टान्नयोग! येथेच्छ ताव मारून तृप्तीची ढेकर देणार तोच एका दाढीधारी भार्इंनी आम्हांस हटकले. नाव, गाव आणि पेशा जाणून घेतल्यानंतर आमच्याकडे अत्यंत तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकून ते तरातरा आतमध्ये निघून गेले. शत्रूच्या गोटातील कुणी गनिम असावा, असा कदाचित त्यांचा ग्रह झाला असावा. मग आम्ही त्यांच्या सेवकांना विनंती केली की, आम्हांस मिष्टान्न नव्हे, तर भाईश्रींची मुलाखत हवी आहे. अनंतवार विनवणी केल्यानंतर भार्इंनी आम्हांस बैठकीच्या दालनात पाचारण केले. पार गुडघ्यापर्यंत वाकून नमस्कार करत आम्ही आमच्या मनातील साºया शंका-कुशंकांचे समाधान करून घेतले.-भाईश्री, आपण अध्यक्ष झाल्यापासून आपल्या पक्षाने १९ राज्यांमध्ये सत्ता हस्तगत केली, याचे श्रेय आपण कुणाला देता. स्वत:ला, पक्षाला की नमोजींना?भाईश्री: काँग्रेसला!-गुजरातमध्ये आपणास पुन्हा विजय मिळाला, पण खूप दमछाक झाली. जागाही कमी झाल्या, हे कशामुळे घडले?भाईश्री: काँग्रेसमुळे!-येत्या काही महिन्यात राजस्थान, कर्नाटक आदी राज्यात निवडणुका आहेत. तिथे प्रचाराचा मुद्दा काय असेल?भाईश्री: अर्थातच काँग्रेस!-गेल्या चार वर्षाच्या सत्ताकाळातील आपल्या सरकारची ठळक कामगिरी काय?भाईश्री: काँग्रेस की सफाई!- देशाचा विकास दर आणि शेअर मार्केटचा निर्देशांक सतत घसरत आहे. औद्योगिक उत्पादनही घटले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा हा परिणाम आहे का?भाईश्री: यह तो काँग्रेस का पाप है!-अच्छे दिन, प्रत्येकी १५ लाख आणि १० कोटी युवकांना रोजगाराचे काय झाले?भाईश्री: काँग्रेस परिवारवादी पार्टी है!-सत्तेवर येताच आपण पाकिस्तानला अद्दल घडविणार होतात. पण आज राजरोसपणे आतंकवादी हल्ले करत आहेत, आपले जवान शहीद होताहेत, तरीही आपण गप्प का?भाईश्री: काँग्रेसने देश का विभाजन किया है, इस का जबाब भी काँग्रेसने देना चाहिए! 

टॅग्स :Amit Shahअमित शाह