शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

आत्मा (स्व) आणि मन यांच्यातील फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 00:32 IST

आपण आत्मा (स्व) आणि मन यांच्यात काय फरक आहे, याबद्दल थोडे चिंतन करू या. आत्मा कधीही बदलत नाही, पण मन वेळोवेळी बदलत असते. त्यामुळेच आपल्या मनाचा चंद्राशी संबंध जोडला गेला आहे. (संदर्भ- शुक्ल आणि कृष्ण पक्षातील कलाकलाने बदलणारा चंद्र) ‘चंद्रमा मनसो-जयते’ असे म्हटले जाते.

- श्री श्री रविशंकरआपण आत्मा (स्व) आणि मन यांच्यात काय फरक आहे, याबद्दल थोडे चिंतन करू या. आत्मा कधीही बदलत नाही, पण मन वेळोवेळी बदलत असते. त्यामुळेच आपल्या मनाचा चंद्राशी संबंध जोडला गेला आहे. (संदर्भ- शुक्ल आणि कृष्ण पक्षातील कलाकलाने बदलणारा चंद्र) ‘चंद्रमा मनसो-जयते’ असे म्हटले जाते. (ऋग्वेदातील पुरुष सुक्तातून साभार; अर्थ : त्याच्या वैश्विक मनापासून चंद्राचा जन्म झाला). चंद्र आणि मनाचा गहिरा अंतस्थ संबंध आहे. चंद्र जसा कलाकलाने वाढत किंवा घटत जातो, अगदी तसेच मनसुद्धा चढ आणि उतार अनुभवीत असते. कधी ते विस्तारित होते, तर कधी आकुंचित होत असते. कधी ते काहीही विशेष कारण नसताना मस्त प्रसन्न असते, तर कधी विनाकारण दु:खी असते. म्हणून प्राचीन काळापासून लोक म्हणत आले आहेत की, ‘ज्याने मन जिंकले, त्याने जग जिंकले’. बंधन आणि मुक्ती या दोन्हीमागचे कारण केवळ मन आहे. आपण बंधनाचा अनुभव घ्या, किंवा मुक्त झाल्याचा आनंद असो, त्यामागचे कारण मन आहे. म्हणूनच आपल्या मनाला पुन:पुन्हा प्रशिक्षित करावे लागते. हेच या ज्ञानाचे सार आहे. जसे आपण याचा नियमित अभ्यास करू लागतो, तसतसे आपल्याला मनावर नियंत्रण ठेवण्याची सिद्धी लाभू लागते- ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती वारंवार समस्यांशी झुंजते़ मग त्यातूनही हसतखेळत पार पडण्याची क्षमता प्राप्त करते. मग अशी स्थिती येते की समस्या आली तरी ती दु:खी होत नाही. आपण जसे जीवनातल्या अनुभवातून (ते सुखद असो वा दु:खद) जात असतो, तेव्हा अशी स्थिती येते की आपल्याला अंतस्थ पातळीवर जाणीव होऊ लागते, खरंच, हे सर्व काही, काहीच नाही. तेव्हा आपण आपल्या स्व सोबत स्थापित होण्याची सुरु वात होऊ लागते. आपल्या ‘स्व’सोबत सामावले जाणे म्हणजे कोणत्याही व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीला तोंड देताना अगदी एका क्षणासाठीही आपले हास्य न गमावता समत्व साधून स्थिर राहू शकणे. गमावले तरी ते क्षणिक असते, आणि आपण त्वरित मूळ पदावर येतो. तेव्हा आपण भक्कमपणे आणि ठामपणे आपल्या ‘स्व’मध्ये स्थिरावलेलो असतो. तेव्हाम्हटले जाईल की ती व्यक्ती सिद्ध (एक परिपूर्ण व्यक्ती) आहे, जी आपल्या अंतरात्म्यात पूर्णपणे प्रस्थापित झाली आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या