शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बैल गेला अन् झोपा केला? आर्थिक सल्लागार परिषदेचे पुनर्गठन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 3:09 AM

घसरलेली अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आणणे, हे मोदी सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठीच आर्थिक सल्लागार परिषदेचे पुनर्गठन करण्यात आले आहे.

घसरलेली अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आणणे, हे मोदी सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठीच आर्थिक सल्लागार परिषदेचे पुनर्गठन करण्यात आले आहे. हे पाऊल परिणामकारक ठरते, की तहान लागल्यावर तळे खोदणे ठरते, या प्रश्नाचे उत्तरच आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच्या सरकारचे चित्र स्पष्ट करणार आहे.आपण सत्तेवर येण्याआधी देशात जे काही होते, जे काही झाले, ते सारे टाकाऊच होते, अशी मांडणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर आर्थिक सल्लागार परिषदेचे पुनर्गठन करावे लागले. पंतप्रधानांना आर्थिक बाबतीत सल्ला देण्यासाठी ही परिषद २०१४ पूर्वी कार्यरत होती. अगदी डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखा अर्थतज्ज्ञ पंतप्रधान विराजमान असतानाही! मोदींनी सत्तेवर येताच सदर परिषद मोडीत काढली; मात्र आता अर्थव्यवस्थेच्या नाजूक अवस्थेबाबत सर्वदूर ओरड सुरू झाली असताना त्यांना परिषदेच्या गठनाची उपरती झाली आहे.गत काही महिन्यांपासून अर्थव्यवस्थेवर संकटाचे काळे ढग जमा झाले आहेत. देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीने गत तीन वर्षातील तळ गाठला आहे. बेरोजगारी वाढतच चालली आहे आणि नवे रोजगार निर्माण होण्याचे चिन्ह काही दिसत नाही. बुडीत कर्जांच्या ओझ्याखाली बँका पिचूू लागल्या आहेत. पूर्ण तयारी न करता अंमलबजावणी सुरू केलेल्या वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीमुळे व्यापारी-उद्योजक मेटाकुटीस आले आहेत. निश्चलनीकरणाचे दुष्परिणाम अद्यापही जाणवत आहेत. देशाच्या बहुतांश भागांमध्ये चांगला पाऊस होऊनही कृषी क्षेत्र चाचपडतच आहे.आर्थिक सल्लागार परिषदेचे गठन या पाशर््वभूमीवर झाले आहे. विवेक देवरॉय यांच्या अध्यक्षतेखालील ही परिषद पंतप्रधानांना स्थूल आर्थिक (मॅक्रो इकॉनॉमिक) बाबींवर सल्ला देण्याचे काम करणार आहे. आपल्याला अर्थशास्त्र फारसे कळत नाही, हे स्वत: मोदींनी जाहीररीत्या मान्य केले आहे आणि तरीदेखील कुणालाही विश्वासात न घेता निश्चलनीकरणासारखा दूरगामी परिणाम करणारा निर्णय त्यांनी घेतला होता.जीएसटी ही एक उत्तम आर्थिक सुधारणा आहे; मात्र जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी पुरेशी तयारी झालेली नाही, हे अनेक अर्थतज्ज्ञांनी बजावूनही मोदींनी जीएसटीच्या अंमलबजावणीचा हट्ट पूर्ण केला होता. हे दोन निर्णयच प्रामुख्याने अर्थव्यवस्थेच्या जीवावर उठले असल्याचा निष्कर्ष देशातील आणि विदेशातील अनेक अर्थतज्ज्ञांनी काढला आहे. मोदी आणि त्यांच्या गोतावळ्याला मात्र तो मान्य नाही.आता पाणी नाकातोंडात जाऊ लागले असताना आर्थिक सल्लागार परिषदेचे पुनर्गठन करण्यात आले आहे. ही परिषद मोडीत काढली नसती आणि तिने निश्चलनीकरण व जीएसटी अंमलबजावणीच्या विरोधात कौल दिला असता, तर तो मोदींनी मान्य केला असता का? या प्रश्नाच्या उत्तरातच आर्थिक सल्लागार परिषदेच्या गठनाच्या फलश्रुतीचे उत्तर दडलेले आहे. उपरोक्त प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल, तरच परिषदेच्या गठनाचा, घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी उपयोग होऊ शकेल; अन्यथा तहान लागल्यावर खोदलेल्या आर्थिक सल्लागार परिषदरूपी तळ्याची गत, बैल गेला अन् झोपा केला, अशीच होण्याची शक्यता अधिक!