शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

धुळ्याची धूळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:16 IST

खान्देशातील जिल्ह्याचे प्रमुख शहर असलेल्या धुळ्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय धुळवड सुरु आहे. ९ डिसेंबरला मतदान असल्याने तोवर हा शिमगा चालेल.

मिलिंद कुलकर्णीखान्देशातील जिल्ह्याचे प्रमुख शहर असलेल्या धुळ्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय धुळवड सुरु आहे. ९ डिसेंबरला मतदान असल्याने तोवर हा शिमगा चालेल.भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी विधिमंडळात धुळ्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढले. स्वत: आमदारांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे आणि पत्नीविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचे सांगत त्यांनी कारवाईची मागणी केली. दीड वर्षापूर्वी झालेला कुख्यात गुंड गुडड्याचा खून आणि सहा महिन्यांपूर्वी पाटील पिता-पुत्राचा भरचौकात झालेला खून या दोन खळबळजनक घटना धुळ्यातील गुन्हेगारी कोणत्या दिशेने चालली आहे, त्याच्या निदर्शक आहे.या दोन्ही खुनानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेले अनिल गोटे आणि विरोधी पक्षाचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये कलगीतुरा रंगला. खून झालेला आणि खून करणारे यांना कुणाचे समर्थन होते, यावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. याचा अर्थ सरळ आहे, राजकीय पाठिंब्याशिवाय गुन्हेगारी प्रवृत्ती स्थिरावली, फोफावलेली नाही. पाठिंबा कुणी दिला, विरोध कुणी केला हा वादाचा मुद्दा असला तरी कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याने गुंडगिरीला प्रोत्साहन दिले आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार अनिल गोटे यांनी या मुद्याला अधिक हवा दिली. त्यांच्या आरोपांची तोफ माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे होती. परंतु, कदमबांडे आणि राष्टÑवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत काही नगरसेववक भाजपामध्ये दाखल झाले. त्यामुळे आपल्याच पक्षात ही मंडळी येत असल्याचे पाहून गोटे यांनी आधी विरोध, नंतर पक्षाविरुध्द बंड आणि आता केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि निवडणुकीचे प्रभारी आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलेला आहे. हत्येच्या कटात हे तीन मंत्री सहभागी असल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी मुंबईत केला आहे.गोटे यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्षा हेमा गोटे यांच्या बदनामी प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विनोद थोरात हा या तिन्ही मंत्री आणि त्यांच्या स्वीय सहायकांच्या संपर्कात असल्याचा आरोपदेखील गोटे यांनी केला आहे. आता केवळ आरोपावर लोक विश्वास ठेवत नाही, परंतु आॅडिओ क्लीप सादर केल्याने त्यांच्या वक्तव्याला वजन येते. न्यायालयात हा तांत्रिक पुरावा किती टिकतो, हा प्रश्न असला तरी निवडणुकीतील नफा-तोटा या उद्देशाने त्याकडे राजकीय पक्ष बघत आहेत.गोटे यांच्या हत्येचा कटाचे जे संभाषण व्हायरल झालेले आहे, त्यातून जी माहिती समोर आली ती राजकीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अभद्र युतीचे धक्कादायक वास्तव समोर आणते. पूर्वी स्वस्त धान्य, रॉकेल, पेट्रोल, गॅस सिलिंडर यांचा काळाबाजार होत असे. त्यात ही अभद्र युती असे. काळ बदलला तसे अवैध धंद्यांचे क्षेत्र बदलून महामार्गावरील टोलनाके या मंडळींचे लक्ष्य बनले आहेत. ठेका मिळविण्यासाठी प्रयत्न, तो रद्द करण्यासाठी कागदी घोडे नाचविणे, घोड्यांना रतीब घालण्यासाठी मग मागणी असे सगळे दुष्टचक्र आहे. जे वाळूचे होते, तेच आता टोलनाक्यांचे होऊ लागले आहे. त्यातील संघर्ष हा रक्तरंजित असाच असतो. या संभाषणामधून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.सामान्य धुळेकर या सगळ्या गदारोळात पुरता भांबावून गेला आहे. महापालिका कुणाच्या ताब्यात द्यायची हा त्याच्यापुढे यक्षप्रश्न आहे. पंधरा वर्षे महापालिका ताब्यात असूनही शहराचा विकास करु न शकणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींच्या सहभागाने सत्ता राबविणाºया राष्टÑवादी कॉंग्रेसला, उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याच्या प्रवृत्तीने हातातील ‘घड्याळ’ काढून कमळ घेणाºया त्याच नगरसेवकांना सन्मानाने प्रवेश देणाºया भाजपाला, भाजपामध्ये राहून पक्षाविरुध्द बंड करणाºया आणि गुन्हेगारी प्रवृत्तीविरुध्द लढण्याचा दावा करणाºया आमदारांनी १५ वर्षांत या विषयावर किती मोर्चे काढले, निवेदने दिली, विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकाºयाची बदली झाल्यावर आंदोलन केले, त्या आमदारांना समर्थन द्यायचे काय हा प्रश्न सामान्य धुळेकरांना सतावत आहे.अर्थात, मतदार समंजस आहे. नीरक्षीर विवेकाने तो मतदान करेल आणि धुळ्याचा खरा विकास कोण करु शकतो, त्याच्याच हाती धुळ्याची चावी देईल,यात तीळमात्र शंका नाही.

टॅग्स :DhuleधुळेPoliticsराजकारण