शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

विकास व पर्यावरणाचा समन्वय गरजेचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 03:10 IST

विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असलेल्या अकोला-खांडवा रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा उफाळला आहे.

- रवी टालेविकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असलेल्या अकोला-खांडवा रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा उफाळला आहे.उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या रेल्वेमार्गांपैकी एक असलेल्या जयपूर-हैदराबाद मार्गाचा एक टप्पा असलेला अकोला-खांडवा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून जातो. मीटरगेज मार्ग असलेल्या जयपूर-हैदराबाद मार्गातील अकोला-खांडवा व इंदूर-खांडवा या दोनच टप्प्यांचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करणे बाकी आहे. पर्यावरण आणि वन्य जीवनासाठी धोकादायक असल्याच्या आक्षेपांमुळे ते रखडले आहे. काही दिवसांपूर्वी अकोला-खांडवा टप्प्याच्या रुंदीकरणातील अडथळे दूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र पर्यावरणवाद्यांनी आता पुन्हा एकदा हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यवर्ती समितीपुढे नेला आहे.आज मनुष्यजात अशा वळणावर उभी आहे, जिथे पर्यावरण रक्षण आणि विकास या दोन्हींची नितांत आवश्यकता आहे. वाढत्या लोकसंख्येची भूक आणि इतर गरजा भागविण्यासाठी विकास आवश्यक आहे, तर पर्यावरणाची हानी मनुष्यजातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करू बघत आहे. त्यामुळे दोन्हींचा समन्वय साधणे नितांत गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली मनुष्य जातीने आधीच पर्यावरणाची अपरिमित हानी केली आहे. त्यामध्ये आणखी भर घातल्यास भावी पिढ्या आम्हाला अजिबात माफ करणार नाहीत. दुसरीकडे पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली विकासाला नकारही देता येत नाही.विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष काही आमच्या देशापुरताच मर्यादित नाही. इतर देशांमध्येही असे प्रसंग नित्य उद्भवत असतात; मात्र ते तंत्राचा वापर करून पर्यावरणास हानी न पोहोचविता विकास प्रकल्प मार्गी लावतात. केनिया हा आफ्रिका खंडातील एक मागास देश आहे. कोणत्याही बाबतीत भारताच्या पासंगासही न पुरणारा! केनियातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या अभयारण्यातून रेल्वेमार्ग नेण्याचा पेच त्या देशाच्या सरकारपुढेही उभा ठाकला होता; मात्र रेल्वेमार्ग उभारणीचे कंत्राट घेतलेल्या चीनच्या कंपनीने वन्य जीवनास धोका निर्माण न करता रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले. त्यासाठी समतल रेल्वेमार्गाऐवजी उन्नत रेल्वेमार्गाचा पर्याय निवडण्यात आला. वन्य जीवांना रेल्वेमार्गावर जाता येऊ नये, यासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूंना उंच व मजबूत कुंपण घालण्यात आले आणि त्यांना रेल्वेमार्ग ओलांडता यावा यासाठी ठराविक अंतरावर भरपूर अंडरपास निर्माण करण्यात आले. त्यामुळे रेल्वेमार्गाचा खर्च वाढला खरा; पण वन्य जीवांना सुरक्षितता लाभली. हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आहे. अंडरपासखाली सिंह आणि इतर वन्य श्वापदांची पदचिन्हे मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. याचा अर्थ त्यांनी अंडरपासचा वापर सुरू केला आहे. भारतातही या तंत्राचा वापर करण्याची चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे; पण अद्याप तरी मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी झालेली नाही. अकोला-खांडवा रेल्वेमार्गाच्या निमित्ताने तो प्रयोग झाल्यास, विकासासाठी आतुरलेली या भागातील जनता दुआ देईल!

टॅग्स :railwayरेल्वे