शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाचनीय लेख - गवत हरीण खाईल, हरणाला चित्ता खाईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 10:12 IST

आपण गवताकडे फारसे लक्ष देत नाही. गवत असतेच.. असे आपण गृहीत धरतो. पण हे विसरतो, की अन्नसाखळी अविरत राहायची, तर गवत हवेच हवे!

प्रा. डॉ. गजानन मुरतकर

देशातून नामशेष झालेला चित्ता भारतात नुकताच परतला आहे. त्याचे पाऊल हिरव्यागार नैसर्गिक गवताच्या मुलायम गालिचावर पडावे, यासाठी दीर्घकाळ काम चालू होते. २०१३ पासून मध्य प्रदेशातील कुनोच्या अभयारण्यात सिंहांसाठी  सोयीचे असे कुरणक्षेत्र तयार व्हावे, यासाठी आम्ही धडपडत होतो. सिंहांसाठी केलेली ही तयारी आता नामिबियातून आपल्याकडे पाहुण्या आलेल्या चित्त्यासाठी उपयुक्त ठरली आहे.

एरवी आपण गवताकडे फारसे लक्ष देत नाही. गवत ही गोष्ट आपण गृहीत धरतो. पण हे विसरतो, की गवत ही संवर्धनासाठी अत्यंत कठीण वनस्पती आहे.  पर्यावरणाचा समतोल राखण्यात गवत मोठी भूमिका बजावत  असते. शिवाय, निरनिराळ्या वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठीही गवत हा घटक अत्यंत संवेदनशील आहे. भारतात पाच हजारांहून अधिक वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असतील, परंतु गवत या विषयावर काम करणारे मोजकेच! याचे कारण सरसकट दुर्लक्ष आणि मुख्य म्हणजे गवत या प्रजातीवरच्या अभ्यासातली गुंतागुंत! मेळघाटातील गवत प्रजातीचा अभ्यास करत असताना ही गुंतागुंत मी अनुभवलेली आहे. पण हेही खरे, की या अभ्यासातून हाती लागलेले निष्कर्ष आणि वन्यजीवांच्या अधिवासावर सकारात्मक परिणाम करण्याची त्यांची क्षमता हे एक विलक्षण समाधान आहे. मध्य भारतीय भूभागातील अमूल्य गवताळ प्रदेश संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये मी दीर्घकाळ सहभागी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या वैराट, कोहा, बोरी, धारगड, गुल्लरघाट, अमोना या गावांच्या जमिनीवर अतीव प्रयत्नांती आम्ही तयार केलेले कुरण क्षेत्र हे त्याचे उदाहरण! गवताची गुणवत्ता वाढताच या भागात त्यानंतर तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आणि त्यामागोमाग मेळघाटातील  वाघांची संख्याही वाढली!

गवतामध्ये ८६ प्रकारच्या प्रजाती आहेत. त्यापैकी ४२ प्रजातींचे गवत वन्यजीव सर्वाधिक आवडीने खातात. मारवेल या गवताच्या प्रजातीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबर याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हे गवत  तृणभक्षी प्राण्यांना विशेष आवडते. या गवताला ‘रसगुल्ला गवत’ असेही एक गोड नाव आहे.तृणभक्षी प्राणी कडक आणि मुलायम अशा दोन्ही प्रकारचे गवत खातात. कडक गवत खाणाऱ्यांमध्ये हत्ती, रानगवा, नीलगाय आदींचा समावेश आहे, तर  हरीण, काळवीट, चिंकारा अशा तृणभक्षी प्राण्यांना मऊ पोताचे गवत अधिक आवडते.  या जीवसृष्टीमध्ये गवत हा निसर्गानेच निर्मिलेला एक इंजिनिअर आहे असे मी नेहमी म्हणतो. गवतामुळे जमिनीची धूप थांबते, पावसाचे पाणी जमिनीच्या पोटात राखून ठेवायला मदत होते आणि माती वाहून जात नाही. गवत खाऊन तृणभक्षी प्राणी जगतात आणि तृणभक्षी प्राणी खाऊन मांसभक्षी प्राण्यांचा उदरनिर्वाह होतो, अशी ही अन्नसाखळी अविरत सुरू राहते. या जीवसृष्टीतील ही अन्नसाखळी अविरत चालती राहण्यासाठी गवत हा सर्वांत महत्त्वाचा, अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवाने सर्वात दुर्लक्षित  असा घटक आहे. या गवताच्या संवर्धनासाठी कुरण विकास तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न मी गेला दीर्घकाळ करतो आहे. त्यासाठी बियाणे बँक तयार करणे, मदर बेड तयार करणे आणि स्थानिक गवतांची ओळख करून देण्यासाठी क्षेत्रस्तरीय वन कर्मचाऱ्यांना सामावून घेणे अशी पद्धती वापरली जाते आहे. हे तंत्र  भारतातील सर्वांत जुन्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २०१२ मध्ये विकसित केले गेले आहे.महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू, उत्तराखंड आणि केरळ अशा बारा राज्यांमधल्या संरक्षण क्षेत्रांमध्ये गवताची कुरणे विकसित व्हावीत आणि आमच्या भाषेत ‘पूर्ण क्षेत्र उगवावे’ यासाठी दशकापासून परिश्रम सुरू आहेत.आम्ही वाघांबरोबर काम केले, सिंहांसाठी सोयीची अशी कुरणे विकसित व्हावीत म्हणून धडपडलो, आता आम्हाला चित्त्याचा उत्तम पाहुणचार करायचा आहे.(शब्दांकन - नरेंद्र जावरे, अमरावती)

टॅग्स :forestजंगल