शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

घोषणेतील फोलपणा, हमीभाव हवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 07:21 IST

केंद्र शासनाने दीडपट हमीभावाची घोषणा केली़ प्रत्यक्ष शेतक-यांच्या पदरात काय पडेल, हे तपासले तर पुन्हा एकदा घोषणेतील फोलपणा दिसून येईल़

- धर्मराज हल्लाळे

शेतमाल पिकत नाही, पिकला तर विकत नाही़ विकला तर हमीभाव मिळत नाही, या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी कायम कर्जाच्या फेऱ्यात गुंतून राहतो़ परिणामी, आत्महत्यांचे सत्र थांबत नाही़ एकंदर ग्रामीण भागात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शासनाबद्दल नाराजी आहे़ ती दूर करण्याचा राजकीय प्रयत्न म्हणून केंद्र शासनाने दीडपट हमीभावाची घोषणा केली़ प्रत्यक्ष शेतक-यांच्या पदरात काय पडेल, हे तपासले तर पुन्हा एकदा घोषणेतील फोलपणा दिसून येईल़ २०१४ च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने शेतक-यांना स्वामीनाथन आयोग लागू करून सदर आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असा एकूण हमीभाव देण्याचे जाहीर केले होते़

प्रत्यक्षात ४ वर्षानंतर २०१८ - १९ च्या हंगामातील पिकांचा हमीभाव जाहीर केला़ ज्याला त्यांनी दीडपट भाव दिला असे म्हटले आहे़ यापूर्वी तूर, हरभरा हमीभावाचे काय झाले, हे महाराष्ट्रात समोर आले आहे़ खरेदी केंद्रांवर गर्दी, शिवाय शासनाकडे हमीभावाप्रमाणे तूर, हरभरा खरेदी करण्यासाठी बारदाणा नसल्यामुळे अनेकवेळा खरेदी थांबली़ आंदोलने झाली़ दरम्यान, कैक शेतकºयांनी गरजेपोटी बाजारात कमी भावाने शेतमाल विकला़ विशेष म्हणजे ज्यांनी हमीभाव केंद्रावर तूर व हरभरा विकला त्यातील अनेकांना आजही पैसे मिळालेले नाहीत़ खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे ७२ तासात देवू अशी घोषणाबाजी झाली़ एकट्या लातूर जिल्ह्यात ९१ हजार क्विंटल हरभ-याचे ४० कोटी, दीड हजार क्विंटल तुरीचे ८ कोटी अद्यापि शेतकºयांना मिळालेले नाहीत़ दोन महिन्यांपासून शेतकरी विकलेल्या मालाचा पैसा कधी येईल, याची प्रतीक्षा करीत आहेत़ हीच परिस्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये आहे़ नियोजन शून्य यंत्रणेमुळे १० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकºयांनी आपला शेतमाल विक्री केलेला नाही़ तसेच ज्या शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली व त्यांची तूर व हरभरा खरेदी केला गेला नाही, त्यांना दोन हेक्टरपर्यंत क्विंटलला एक हजार रूपये फरकाचे अनुदान देण्याची घोषणा केली़ त्याचीही अंमलबजावणी होताना दिसत नाही़ नोंदणी झालेल्या शेतकºयांच्या यादीची पडताळणीच सुरू आहे़ मुळातच शासनाने खरेदी केलेल्या शेतमालाचेही पैसे मिळत नाही तिथे फरकाची रक्कम कधी मिळणार हा यक्ष प्रश्न आहे़

दरवर्षी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे पिकांचा उत्पादन खर्च काढतात़ त्यांच्याकडून काढण्यात आलेला उत्पादन खर्च पडताळून राज्य सरकार केंद्राकडे हमीभावासाठी शिफारस करते़ मराठवाड्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते़ राज्य सरकारने ४ हजार ७५० रूपये इतका भाव देण्याची शिफारस केंद्राकडे केली़ केंद्राने तो भाव ३ हजार ५० इतका जाहीर केला आहे़ म्हणजेच उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा हमीभाव हा कमीच आहे़ हीच स्थिती इतर पिकांच्या बाबतीत आहे़ कृषी विद्यापीठांनी काढलेला उत्पादन खर्च, त्यावर ५० टक्के अधिक नफा धरून हमीभाव दिला पाहिजे, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे़ साधारणपणे सोयाबीन हे एक पीक समोर ठेऊन हिशेब घातला तर एक हेक्टर रान तयार करायला ३५०० रूपये खर्च येतो़ त्यात कुळव, पाळी घालण्याला १५०० रूपये, हेक्टरी ५ हजार रूपयांचे बियाणे लागते़ २४०० रूपयांचे दोन पोती खत लागते़ पेरणीचा खर्च १७५० रूपये येतो़ कोळपणी ५०० रूपये, पहिली फवारणी ३ हजार रूपये, रोगाचा प्रादुर्भाव झाला तर दुसरी फवारणी ५ ते ६ हजार रूपये़ खुरपणे ३ हजार रूपये, काढणी ७ ते ८ हजार रूपये, मशिनवर रास ४ हजार रूपये असा एकूण ३६ हजार ५०० रूपये खर्च येतो़ ज्यामध्ये ९० दिवस राबणाºया शेतकºयाची, मजुरांची मजुरीही गृहित धरलेली नाही़ त्यांची दिवसाला एकूण ४०० रूपये मजुरी म्हटली तरी ३६ हजार रूपये मिळाले पाहिजेत़ म्हणजेच ७२ हजार ५०० रूपये थेट खर्च व मेहनताना आहे़ त्यापेक्षा अधिक भाव मिळाला तर तो फायदा म्हणता येईल़ सध्या सोयाबीनला ३ हजार ४९० रूपये इतका भाव आहे़ हेक्टरी २० क्विंटल उत्पन्न निघेल, असे गृहित धरले तर ६१ हजार रूपये उत्पन्न होईल़ म्हणजेच हा सर्व व्यवहार तोट्याचा आहे़ त्यात पाऊस झाला वा अतिवृष्टी झाली तर पेरणीचा खर्चही निघत नाही़ त्यामुळे सोयाबीनला ३५० रूपये, तुरीला २२५ रूपये, मूग ४०० रूपये आणि उडीदासाठी २०० रूपये हमीभावातील सरकार वाढ हवेतच विरणार आहे़

टॅग्स :Farmerशेतकरी