शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

निर्णय स्वागतार्ह तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 06:33 IST

नीट आणि जेईई परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग क्लास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे़

नीट आणि जेईई परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग क्लास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागात व छोट्या शहरांमध्ये राहणाºया विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करता यावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ केंद्र सरकारचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे व त्यासाठी केंद्र सरकारचे कौतुकच करायला हवे़ मात्र हा निर्णय घेऊन केंद्र सरकारची जबाबदारी संपत नाही़ कारण सध्या शिक्षणाचा बाजार झाला आहे़ अव्वाच्या सव्वा शुल्क, आश्वासनांची खैरात केली जाते़ मात्र प्रत्यक्षात कामगिरी शून्य, अशा अनेक गोष्टी शिक्षण क्षेत्रात होत आहेत़ या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढालही होत आहे़ अशा परिस्थितीत केंद्र सरकार मोफत कोचिंग क्लास देणार असेल तर त्याचा दर्जाही उत्तम हवा़ क्लासेस घेणारे शिक्षक उच्च शिक्षित व तज्ज्ञ असायला हवेत़ कोचिंग क्लास होत असलेल्या जागी मूलभूत सुविधाही हव्यात़ विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने शिकू शकतील असे तेथील वातावरण हवे़ तरच हा प्रयोग यशस्वी होऊ शकेल़ अन्यथा या कोचिंग क्लासचेही बाजारीकरण होईल़ आपली शिक्षण पद्धती जुनाट आहे़ रोजगार देणारी नाही, अशी ओरड होतच असते़ तरीही नवनवीन प्रयोग करून सरकार शिक्षण संस्था टिकविण्याचा प्रयत्न करत असते़ शाळा, महाविद्यालयांत उत्तम शिक्षण दिले जाते, अशी खास जाहिरातबाजीही होते़ मात्र तरीही प्रत्येक पालक खासगी कोचिंग क्लासचा पर्याय निवडतो़ पालकांच्या या मानसिकतेमुळे खासगी कोचिंग क्लासची चलती झाली़ खासगी कोचिंग क्लाससाठी पालक लाखो रुपये शुल्कही मोजतात़ असे असताना नीट व जेईईसाठी घेतल्या जाणाºया कोचिंग क्लासचा दर्जा खालावलेला असेल तर त्याचा टिकाव लागणे कठीण आहे़ यातील दुसरी बाब म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल याचे निकष ठरवायला हवेत़ तेथे आरक्षणाची मागणी होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला हवी़ गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही तर या योजनेला भ्रष्टाचाराचे गोंदण लागेल़ त्यामुळे त्याची काळजीही सरकारने घ्यायला हवी़ तसेच कोचिंग क्लासची प्रक्रिया सुलभ असणेही आवश्यक आहे़ ग्रामीण भागात व छोट्या शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला याची माहिती मिळायला हवी़ तरच मोफत कोचिंग क्लासची संकल्पना फलदायी ठरेल अन्यथा त्याचेही बाजारीकरण व्हायला वेळ लागणार नाही़ ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थी आधीच उच्च शिक्षणाची स्वप्ने पहात नाही़ काही जण छातीवर दगड ठेवूनच या शिक्षणपद्धतीत उतरतात़ कमी मनोबलामुळे यशाच्या शिखरापर्यंत पोहचत नाही़ खरे तर त्यांची पुरेशी क्षमता असते, परंतु योग्यवेळी योग्य मार्गदर्शन नसल्याने ती धडपडतात, अपयशी ठरतात़ त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी केंद्राची ही योजना सुवर्णसंधी ठरू शकते़ या योजनेतून खºया अर्थाने मातीतल्या विद्यार्थ्यांना मोठी झेप घेण्याची संधी प्राप्त होणार आहे़ प्रश्न आहे, तो फक्त योग्य अंमलबजावणीचा़ सध्या बाजारातील खासगी कोचिंग क्लासेसनी ढीगभर जाहिराती करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले आहे़ त्यांच्या यशापयशाचा आलेख मांडणे अवघड आहे़ तरीही केंद्र सरकारच्या या योजनेमुळे सध्याच्या कोचिंग क्लासेसचे धाबे दणाणले असेल़ पण त्यातून निकोप स्पर्धा निर्माण होऊन त्याचा गुणवंत विद्यार्थ्यांना फायदा झाला तरच तो खरा सुदिन ठरेल़ अर्थात आपल्याकडे अनेक योजना कागदावर यशस्वी ठरतात़ प्रत्यक्ष अंमलबजावणी वेळी त्याचा बोजवारा उडतो़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनविणारी ही योजना फलदायी ठरो, अशी अपेक्षा तूर्त व्यक्त करायला हरकत नाही़

टॅग्स :NEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८examपरीक्षा