शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

दारूबंदीबाबतची गाजराची ‘चंद्रपुरी’ पुंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 05:55 IST

lift liquor ban in Chandrapur district: २०१५ मध्ये तत्कालीन युती सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतला खरा; पण त्याची अंमलबजावणी कागदावरच राहिली. यासाठी कोणता राजकीय पक्ष व कोण सत्ताधारी जबाबदार हा प्रश्न नाही. पावणेचार वर्षे युतीची व सव्वा वर्ष महाविकास आघाडीचे, असे या अपयशाचे वाटप आहे.

सहा वर्षे वाजविण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही न वाजलेली चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीची गाजराची पुंगी अखेर मोडून खाण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. बाजूच्या वर्धा व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्येही ती पुंगी अजिबात वाजत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे; पण ते उघडपणे कोणी बोलत नाही इतकेच. या शेजारी जिल्ह्यांमध्ये दारूबंदी असल्याने चंद्रपूरमध्ये दारूचा महापूर वाहत असल्याचा, त्यामुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होत असल्याचा आक्षेप घेत  उभ्या राहिलेल्या जनआंदोलनामुळे मार्च २०१५ मध्ये तत्कालीन युती सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतला खरा; पण त्याची अंमलबजावणी कागदावरच राहिली. यासाठी कोणता राजकीय पक्ष व कोण सत्ताधारी जबाबदार हा प्रश्न नाही. पावणेचार वर्षे युतीची व सव्वा वर्ष महाविकास आघाडीचे, असे या अपयशाचे वाटप आहे.या काळात चोरूनलपून दारू विक्री होत राहिली. लगतच्या नागपूर, यवतमाळमधील जिल्हा सीमेवरचे दारू विक्रेते गब्बर बनले. बघताबघता हा तस्करीचा धंदा वर्षाकाठी शेकडो कोटींचा बनला. सरकारी, राजकीय अशा सगळ्याच घटकांना वरकमाईचे नवे साधन उपलब्ध झाले. सगळीकडे होतो तसा विषारी दारूचा वापरही सुरू झाला. सारे काही अवैधच असल्याने गुन्हेगारीही वाढली व तिला संरक्षण देणारेही सक्रिय झाले. याशिवाय राज्याच्या महसुलाचे वर्षाला अंदाजे साडेतीनशे कोटींचे नुकसान झाले ते वेगळेच. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या कारभाऱ्यांनी ही फसलेली दारूबंदी हा राजकीय मुद्दा बनवला. दारूबंदी मागे घेण्याचा मनोमन निर्णय झाला. मग त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती, तिची पाहणी, अहवाल, शिफारशी असे सोपस्कार पार पडले आणि अंमलबजावणीतील अपयश अधिक ठळकपणे अधोरेखित करीत दारूबंदी मागे घेण्याचा निर्णय झाला.मुळात अशा एकेकट्या जिल्ह्यात दारूबंदी यशस्वी होत नाही किंवा होणार नाही, हे राज्यकर्ते व प्रशासकीय यंत्रणेच्या लक्षात येऊ नये, हेच आश्चर्य आहे. गुजरात व बिहार या दोन राज्यांमध्ये सध्या दारूबंदी आहे. सेवाग्राम आश्रमामुळे  वर्धेच्या दारूबंदीला महात्मा गांधी यांच्याप्रति श्रद्धेची किनार आहे, तशीच ती गुजरातला आहे. बिहारचे प्रकरण मात्र चंद्रपूर, गडचिरोलीसारखे गरिबांच्या कल्याणाचे व कळवळ्याचे आहे. राज्य दारूमुक्त असले तरी पाहुणे व बड्या मंडळींची अडचण होऊ नये, याची काळजी गुजरातमध्ये घेतली जाते. तिथल्या ठरावीक तारांकित हॉटेल्समध्ये परवान्यावर दारू मिळते. कारण, व्हायब्रंट गुजरातला आधुनिकता सोडून संकुचित राहणे परवडणारे नाही. बिहार अजून आधुनिकतेच्या इतका मागे लागलेला नाही. तिथे त्यामुळे दारू तस्करीचे लाखो गुन्हे, कित्येक लिटर दारू जप्ती, तस्करीला छत्रछाया दिल्याबद्दल शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई हे पाहिले की दारूबंदीने काय साधले, हा प्रश्न विचारावासाच वाटतो. दारूमुळे गरिबांचे शोषण होते, नाडवणूक होते, संसार उद्ध्वस्त होतात, महिलांचा छळ होतो हे मान्य; पण जिल्हा असो की राज्य, दारू बंद केल्यामुळे हे शोषण किंवा महिलांचा छळ थांबला असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. उलट, गरिबांचा छळ करण्याची नवी संधी पोलिसांना मिळाली.चंद्रपूरची दारूबंदी मागे घेण्यात आल्याने अनेक गांधीवादी, समाजवादी, मानवतावादी मंडळींना वेदना झाल्यात हे खरे. त्यांचे हे दु:ख लटका आदर्शवाद व समाजसुधारणेच्या भाबडेपणातून आले आहे. सामान्य माणसांच्या व्यथा-वेदनांना किंवा हालअपेष्टांना दारू किंवा अन्य काही असे एकच एक कारण नसते. इतरही अनेक पैलू असतात. मध्यंतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागेही दारू हे कारण असल्याचा जावईशोध काहींनी लावला होता. तसे असेल तर शेतकऱ्यांपेक्षा अधिक दारू पितात ते शहरी नोकरदार का आत्महत्या करीत नाहीत, या प्रश्नावर मात्र कुणाकडेच उत्तर नव्हते. उठताबसता हिंदुत्वाचा गजर करणारा हा देश कितीही आतून वाटत असले तरी गोवा किंवा ईशान्येकडील राज्यांमध्ये गोमांसबंदी करू शकत नाही. दारूचेही तसेच आहे. पर्यटन, त्यात खाण्यापिण्याचा आनंद हा अनेक राज्ये, जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोळसा, जंगल, तेंदुपत्ता अशा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध चंद्रपूरमध्येही ही आधुनिकता बऱ्यापैकी रूजली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. सरकारला मिळणाऱ्या महसुलाशिवाय हे पैसा खेळता ठेवणारे कंगोरे दारूबंदीला होते व आहेत. उशिरा का होईना सरकारने ते समजून घेतले हे बरे झाले.

टॅग्स :liquor banदारूबंदीchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार