शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फाशीचा पंचनामा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 04:08 IST

देहदंड ही केवळ सर्वात कठोर शिक्षा नाही. सरकारने कायदेशीर मार्गाने केलेले ते प्राणहरण असते. शिवाय ही शिक्षा देताना चूक झाली असे नंतर लक्षात आले तरी ती सुधारता येऊ शकत नाही.

देहदंड ही केवळ सर्वात कठोर शिक्षा नाही. सरकारने कायदेशीर मार्गाने केलेले ते प्राणहरण असते. शिवाय ही शिक्षा देताना चूक झाली असे नंतर लक्षात आले तरी ती सुधारता येऊ शकत नाही. यामुळेच ही शिक्षा अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याची पूर्ण खात्री पटल्यावर केवळ वस्तुनिष्ठ निकषांवरच दिली जाणे अपेक्षित असते. परंतु दुर्दैवाने भारतात तशी स्थिती नाही, असा धक्कादायक निष्कर्ष एका ताज्या अभ्यास पाहणीतून काढण्यात आला आहे. दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या ‘सेंटर आॅन डेथ पेनल्टी’ने ही अभ्यास पाहणी केली. आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावताना न्यायाधीशांची नेमकी काय मानसिकता असते याचा प्रथमच धांडोळा घेऊन तयार केलेला अहवाल म्हणून या अहवालाचे चिकित्सामूल्य मोठे आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या ६० निवृत्त न्यायाधीशांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींमधून समोर आलेली सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यापैकी बहुतांश न्यायाधीशांना भारतातील प्रचलित फौजदारी न्यायदानाची पद्धत शंभर टक्के निर्धोक असल्याची खात्री देता आली नाही. चुकीचा आणि पक्षपाती तपास, अभियोग चालविण्यातील त्रुटी आणि आरोपींना परिणामकारक बचाव करण्याची पूर्ण संधी न मिळणे यामुळे निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविले जाण्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही. तरी बहुतांश न्यायाधीशांनी फाशीच्या शिक्षेचे समर्र्थन केले. फाशीच्या शिक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘विरळात विरळा’ असा निकष ठरवून दिला आहे. मात्र ‘विरळात विरळा’ म्हणजे नेमके काय यावर या न्यायाधीशांमध्ये एकवाक्यता दिसली नाही. शिवाय शिक्षा ठरविण्याआधी आरोपीस अनुकूल व प्रतिकूल अशा सर्व मुद्यांचा तौलनिक अभ्यासही निश्चित मापदंड नसल्याने न्यायाधीश आपल्या व्यक्तिगत मतीनुसार हा निर्णय करतात, असेही दिसून आले. फाशी द्यायची की जन्मठेप हा न्यायाधीशाचा स्वेच्छानिर्णय असतो. परंतु हा स्वेच्छानिर्णय वस्तुनिष्ठतेने न होता बºयाच वेळा व्यक्तिनिष्ठ पद्धतीने केला जातो. परिणामी ज्याने एखाद्याचा जीव घेतला जायचा आहे अशी फाशीची शिक्षासुद्धा नशिबाचा खेळ ठरते. हे फौजदारी न्यायव्यवस्थेचे घोर अपयशच म्हणावे लागेल. शिवाय या न्यायाधीशांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये जरब बसविणे हा फाशी देण्यामागचा मुख्य हेतू असतो असे सांगितले असले तरी वास्तवात ज्या पद्धतीने फाशीच्या शिक्षा दिल्या जातात ते पाहता बहुतांश फाशी ‘जशास तसे’ या न्यायाने दिल्या जात असल्याचे दिसते. शासन यंत्रणा त्यांना असलेल्या दंडात्मक अधिकारांचा वापर उट्टे काढण्यासाठी करीत असल्याचा संदेश यातून जाऊ शकतो. भारतासारख्या लोकशाही आणि कायद्याचे राज्य असलेल्या देशाला तसे होणे खचितच भूषणावह नाही. काहीही असले तरी निवृत्त न्यायाधीशांनी या विषयावर मनमोकळेपणाने बोलणे हेही नसे थोडके. यामुळे फाशीची शिक्षा असावी की ती रद्द करावी या चर्चेचा एक पूर्णपणे नवा पैलू पुढे आला हे नक्की. एकीकडे कायदे शिक्षणाचा दर्जा घसरत असताना असा अभ्यासपूर्ण व व्यासंगी उपक्रम हाती घेतल्याबद्दल नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे अभिनंदन करावेच लागेल.

टॅग्स :Crimeगुन्हा