शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मृत्युदंड टळला! मुसद्देगिरीचे यश, भारत-कतार प्रदीर्घ संबंधाची मोठी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2023 7:31 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या प्रकरणात जातीने लक्ष घालत होते.

हेरगिरीच्या आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांची शिक्षा सौम्य करून त्यांना तुरुंगवास ठोठाविण्याचा कतारमधील वरिष्ठ न्यायालयाचा निर्णय, केवळ त्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठीच दिलासादायक आहे. गत २६ ऑक्टोबरला कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने त्या अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली, तेव्हा संपूर्ण देश स्तब्ध झाला होता.

आपसूकच पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्याच आरोपावरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय नौदलाच्याच माजी अधिकाऱ्याचे प्रकरण प्रत्येकाच्या मनात ताजे झाले होते. जाधव यांच्या प्रकरणात भारत सरकारने संपूर्ण ताकद झोकून त्यांचा जीव वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला, त्यामुळे स्वाभाविकच एक प्रकारचा मापदंड प्रस्थापित झाला होता. कतारमधील प्रकरणातही भारत सरकारने तेवढीच ताकद झोकून देशसेवा केलेल्या माजी अधिकाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. सरकार त्या कसोटीवर खरे उतरल्याचा प्रत्येक सच्च्या भारतीयाला निश्चितच आनंद झाला आहे. 

अर्थात भारत आणि कतारदरम्यानच्या प्रदीर्घ उत्तम संबंधांनीही त्यामध्ये मोठी भूमिका बजावली असेल. कतारला १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सर्वप्रथम कतार सरकारला मान्यता देणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारतही होता. पुढे दोनच वर्षांनी उभय देशांदरम्यान संपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. यावर्षी भारत-कतार संबंधांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना, भारत सरकारला कतारमध्ये कायदेशीर लढाई लढावी लागली आणि मुत्सद्देगिरीच्या पातळीवरही अथक प्रयत्न करावे लागले. अशा सर्वच प्रयत्नांची इतिहासाच्या पानांमध्ये कधीच पूर्णांशाने नोंद होत नसते. 

इंग्रजी भाषेत ज्यासाठी ‘बॅकडोर डिप्लोमसी’ ही संज्ञा वापरली जाते, अशी पडद्यामागील मुत्सद्देगिरी अशा प्रकरणांत मोठी भूमिका बजावत असते. त्यात सहभागी व्यक्ती कधीच प्रकाशात येत नाहीत. या प्रकरणातही तशा मुत्सद्देगिरीची नक्कीच मोठी भूमिका असेल. उघड आणि पडद्यामागे अशा दोन्ही प्रकारच्या मुत्सद्देगिरीशिवाय असे यश मिळू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या प्रकरणात जातीने लक्ष घालत होते. एक महिन्यापूर्वीच मोदींनी कतारचे राजे शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी दुबईत विविध द्विपक्षीय मुद्यांवर सखोल चर्चा केली होती. त्यामध्ये कतारमधील भारतीय समुदायाच्या कल्याणाचा मुद्दाही अंतर्भूत होता. अशा चर्चांचे सर्व तपशील उघड केले जात नसले तरी, मोदींनी कतारच्या राजांकडे नौदल अधिकाऱ्यांना सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेचा मुद्दा नक्कीच उपस्थित केला असेल. 

मोदी आणि थानी यांच्यातील त्या शिखर परिषदेनंतर अवघ्या दोनच दिवसांत कतारमधील भारतीय राजदूत विपूल यांना त्या आठ अधिकाऱ्यांना तुरुंगात भेटण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर महिनाभराच्या आतच त्या अधिकाऱ्यांची शिक्षा सौम्य करण्यात आली. हे केवळ योगायोग असू शकत नाहीत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केंद्र सरकारसाठी हा मोठाच दिलासा म्हणावा लागेल. कतारच्या वरिष्ठ न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय फिरविण्यास नकार दिला असता, तर सरकारची नाचक्की झाली असती आणि विरोधकांच्या हाती आयताच एक मुद्दा लागला असता. अर्थात हा अंतिम विजय नाही, याचेही भान सरकारमधील धुरिणांना राखावे लागणार आहे. त्या माजी अधिकाऱ्यांची मृत्युदंडाची शिक्षा टळली असली तरी, त्याऐवजी दिला जाणारा तुरुंगवास अल्प कालावधीचा नक्कीच नसेल. कदाचित त्या अधिकाऱ्यांवर उर्वरित संपूर्ण आयुष्य कतारमधील तुरुंगात काढण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे यानंतर कतारच्या राजांसोबतच्या घनिष्ट संबंधांचा वापर करून, त्यांच्या विशेषाधिकारात अधिकाऱ्यांची तुरुंगवासाची शिक्षा माफ करवून घेण्यासाठी रदबदली करावी लागेल. ते शक्य नसल्यास तुरुंगवासाचा कालावधी कमी करवून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुरुंगवास अटळ असल्यास तो भारतातील तुरुंगांमध्ये व्यतीत करता यावा, यासाठी जोर लावावा लागेल. 

सुदैवाने २०१५ मध्ये भारत आणि कतारदरम्यान झालेल्या एका करारामुळे ते शक्य आहे. त्या करारान्वये भारत आणि कतारमध्ये परस्परांच्या नागरिकांना शिक्षा सुनावण्यात आल्यास, त्यांना ती मायदेशांतील तुरुंगांमध्ये भोगण्याची मुभा मिळू शकते. या प्रकरणात पुढे काय होईल, हे काळाच्या उदरात दडलेले आहे; पण मृत्युदंडाची शिक्षा सौम्य होणे, हादेखील नक्कीच मोठा विजय आहे. हा प्रसंग आनंद साजरा करण्याचा नसला तरी पुढेही नक्कीच काही तरी चांगलेच होईल, असा विश्वास बाळगायला हरकत नसावी.

 

टॅग्स :Qatarकतारindian navyभारतीय नौदल