शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:19 IST

रेल्वेत कायमची नोकरी मिळावी, म्हणून तरुणांनी सकाळी लवकर उठून रेल रोको केला. मुंबईची गती थांबवली. या आंदोलनामुळे हजारो चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचता आले नाही. संपूर्ण देशाने हा हलकल्लोळ अनुभवला.

रेल्वेत कायमची नोकरी मिळावी, म्हणून तरुणांनी सकाळी लवकर उठून रेल रोको केला. मुंबईची गती थांबवली. या आंदोलनामुळे हजारो चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचता आले नाही. संपूर्ण देशाने हा हलकल्लोळ अनुभवला. याच काळात ओला, उबर या ‘अ‍ॅपबेस्ड टॅक्सीं’नी बेमुदत संप पुकारला. रेल रोकोने त्रस्त झालेल्या मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा हा प्रकार होता. मुंबई ‘थांबवली’ तर आपल्या मागण्या मान्य होतातÞ; हवे ते आपल्या पदरी पाडता येते, हा एक नवा समज सध्या जनमानसात दृढ होत आहे. हेदेखील त्याचेच उदाहरण म्हणता येईल. मात्र मुंबईकरांनी नेहमी होऊ पाहणारा हा नाहक त्रास का सहन करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आंदोलन करणे हा अधिकार आहे, पण हा अधिकार बजावताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकरी आंदोलनाने दाखवलेला समजूतदारपणा रेल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावशाली ठरतो. मुंबईकरांना, विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून दीडशे किलोमीटर चालत आलेले शेतकरी मध्यरात्रीच सोमय्या मैदानातून आझाद मैदानाकडे निघाले. याउलट रेल रोको आंदोलक कशाचाही विचार न करता थेट ‘रुळांवर’ उतरले. अशा आकस्मिक आंदोलनांसाठी ठोस यंत्रणा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. ही यंत्रणा आपत्कालीन यंत्रणेच्या धर्तीवर काम करणारी असायला हवी. दोन दशकांपूर्वी आझाद मैदानातून येणारे मोर्चे मंत्रालयापर्यंत धडकत होते. रहिवाशांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. वाहतूककोंडी, ध्वनिप्रदूषण असे अनेक मुद्दे रहिवाशांनी न्यायालयासमोर ठेवले. न्यायालयाने गंभीर दखल घेत मोर्चे आझाद मैदानातच थांबतील, अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिलेÞ; आणि त्या आदेशाची अंमलबजावणीही झाली. मोर्चे आझाद मैदानात स्थानबद्ध झाले. हे आदेश देताना किंवा त्याच्या अंमलबजावणीवेळी कोणताही विशेष कायदा केला गेला नाही. सरकारची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे मुंबई रोखू पाहणाºयांना आता रोखण्याची गरज आहे. मुंबई पोलिसांची जगभर ख्याती आहे. गुन्ह्याची उकल करण्यात मुंबई पोलिसांचा हातखंडा आहे. ही सक्षम यंत्रणा मात्र गेल्या काही वर्षांपासून कमकुवत बनत चालली आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला अशा घटनांतून केवळ सुरक्षेच्या उपायांकडे अधिक लक्ष देण्यात आले. तथापि, अशा घटना घडण्यापूर्वीच त्याची चाहूल देणारी गुप्तचर यंत्रणादेखील अधिक बलशाली करणे अत्यंत आवश्यक आहे. तसे न झाल्यास भविष्यात मुंबईत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल