शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:19 IST

रेल्वेत कायमची नोकरी मिळावी, म्हणून तरुणांनी सकाळी लवकर उठून रेल रोको केला. मुंबईची गती थांबवली. या आंदोलनामुळे हजारो चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचता आले नाही. संपूर्ण देशाने हा हलकल्लोळ अनुभवला.

रेल्वेत कायमची नोकरी मिळावी, म्हणून तरुणांनी सकाळी लवकर उठून रेल रोको केला. मुंबईची गती थांबवली. या आंदोलनामुळे हजारो चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचता आले नाही. संपूर्ण देशाने हा हलकल्लोळ अनुभवला. याच काळात ओला, उबर या ‘अ‍ॅपबेस्ड टॅक्सीं’नी बेमुदत संप पुकारला. रेल रोकोने त्रस्त झालेल्या मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा हा प्रकार होता. मुंबई ‘थांबवली’ तर आपल्या मागण्या मान्य होतातÞ; हवे ते आपल्या पदरी पाडता येते, हा एक नवा समज सध्या जनमानसात दृढ होत आहे. हेदेखील त्याचेच उदाहरण म्हणता येईल. मात्र मुंबईकरांनी नेहमी होऊ पाहणारा हा नाहक त्रास का सहन करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आंदोलन करणे हा अधिकार आहे, पण हा अधिकार बजावताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकरी आंदोलनाने दाखवलेला समजूतदारपणा रेल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावशाली ठरतो. मुंबईकरांना, विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून दीडशे किलोमीटर चालत आलेले शेतकरी मध्यरात्रीच सोमय्या मैदानातून आझाद मैदानाकडे निघाले. याउलट रेल रोको आंदोलक कशाचाही विचार न करता थेट ‘रुळांवर’ उतरले. अशा आकस्मिक आंदोलनांसाठी ठोस यंत्रणा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. ही यंत्रणा आपत्कालीन यंत्रणेच्या धर्तीवर काम करणारी असायला हवी. दोन दशकांपूर्वी आझाद मैदानातून येणारे मोर्चे मंत्रालयापर्यंत धडकत होते. रहिवाशांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. वाहतूककोंडी, ध्वनिप्रदूषण असे अनेक मुद्दे रहिवाशांनी न्यायालयासमोर ठेवले. न्यायालयाने गंभीर दखल घेत मोर्चे आझाद मैदानातच थांबतील, अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिलेÞ; आणि त्या आदेशाची अंमलबजावणीही झाली. मोर्चे आझाद मैदानात स्थानबद्ध झाले. हे आदेश देताना किंवा त्याच्या अंमलबजावणीवेळी कोणताही विशेष कायदा केला गेला नाही. सरकारची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे मुंबई रोखू पाहणाºयांना आता रोखण्याची गरज आहे. मुंबई पोलिसांची जगभर ख्याती आहे. गुन्ह्याची उकल करण्यात मुंबई पोलिसांचा हातखंडा आहे. ही सक्षम यंत्रणा मात्र गेल्या काही वर्षांपासून कमकुवत बनत चालली आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला अशा घटनांतून केवळ सुरक्षेच्या उपायांकडे अधिक लक्ष देण्यात आले. तथापि, अशा घटना घडण्यापूर्वीच त्याची चाहूल देणारी गुप्तचर यंत्रणादेखील अधिक बलशाली करणे अत्यंत आवश्यक आहे. तसे न झाल्यास भविष्यात मुंबईत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल