शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:19 IST

रेल्वेत कायमची नोकरी मिळावी, म्हणून तरुणांनी सकाळी लवकर उठून रेल रोको केला. मुंबईची गती थांबवली. या आंदोलनामुळे हजारो चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचता आले नाही. संपूर्ण देशाने हा हलकल्लोळ अनुभवला.

रेल्वेत कायमची नोकरी मिळावी, म्हणून तरुणांनी सकाळी लवकर उठून रेल रोको केला. मुंबईची गती थांबवली. या आंदोलनामुळे हजारो चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचता आले नाही. संपूर्ण देशाने हा हलकल्लोळ अनुभवला. याच काळात ओला, उबर या ‘अ‍ॅपबेस्ड टॅक्सीं’नी बेमुदत संप पुकारला. रेल रोकोने त्रस्त झालेल्या मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा हा प्रकार होता. मुंबई ‘थांबवली’ तर आपल्या मागण्या मान्य होतातÞ; हवे ते आपल्या पदरी पाडता येते, हा एक नवा समज सध्या जनमानसात दृढ होत आहे. हेदेखील त्याचेच उदाहरण म्हणता येईल. मात्र मुंबईकरांनी नेहमी होऊ पाहणारा हा नाहक त्रास का सहन करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आंदोलन करणे हा अधिकार आहे, पण हा अधिकार बजावताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकरी आंदोलनाने दाखवलेला समजूतदारपणा रेल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावशाली ठरतो. मुंबईकरांना, विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून दीडशे किलोमीटर चालत आलेले शेतकरी मध्यरात्रीच सोमय्या मैदानातून आझाद मैदानाकडे निघाले. याउलट रेल रोको आंदोलक कशाचाही विचार न करता थेट ‘रुळांवर’ उतरले. अशा आकस्मिक आंदोलनांसाठी ठोस यंत्रणा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. ही यंत्रणा आपत्कालीन यंत्रणेच्या धर्तीवर काम करणारी असायला हवी. दोन दशकांपूर्वी आझाद मैदानातून येणारे मोर्चे मंत्रालयापर्यंत धडकत होते. रहिवाशांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. वाहतूककोंडी, ध्वनिप्रदूषण असे अनेक मुद्दे रहिवाशांनी न्यायालयासमोर ठेवले. न्यायालयाने गंभीर दखल घेत मोर्चे आझाद मैदानातच थांबतील, अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिलेÞ; आणि त्या आदेशाची अंमलबजावणीही झाली. मोर्चे आझाद मैदानात स्थानबद्ध झाले. हे आदेश देताना किंवा त्याच्या अंमलबजावणीवेळी कोणताही विशेष कायदा केला गेला नाही. सरकारची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे मुंबई रोखू पाहणाºयांना आता रोखण्याची गरज आहे. मुंबई पोलिसांची जगभर ख्याती आहे. गुन्ह्याची उकल करण्यात मुंबई पोलिसांचा हातखंडा आहे. ही सक्षम यंत्रणा मात्र गेल्या काही वर्षांपासून कमकुवत बनत चालली आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला अशा घटनांतून केवळ सुरक्षेच्या उपायांकडे अधिक लक्ष देण्यात आले. तथापि, अशा घटना घडण्यापूर्वीच त्याची चाहूल देणारी गुप्तचर यंत्रणादेखील अधिक बलशाली करणे अत्यंत आवश्यक आहे. तसे न झाल्यास भविष्यात मुंबईत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल