शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

दलित - मुस्लीम यांची नवी करारशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 06:05 IST

- प्रकाश पवार । राज्यशास्त्र विभाग प्रमुख महाराष्ट्राच्या राजकारणात भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएमची आघाडी ही लक्षवेधक ठरू लागली आहे. ...

- प्रकाश पवार । राज्यशास्त्र विभाग प्रमुखमहाराष्ट्राच्या राजकारणात भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएमची आघाडी ही लक्षवेधक ठरू लागली आहे. दलित-मुस्लीम या दोन समूहामधील राजकीय समझोता केवळ २०१९ च्या आधी घडत आहे, तो नवीन समझोता होत आहे, असे नव्हे. दलित-मुस्लीम समझोत्याची परंपरा निवडणुकीत, राजकारणात जवळपास एका शतकाची दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना परिषदेवर प्रतिनिधी म्हणून मुस्लिमांनी पाठविले होते. तेव्हा दलितांनी पुढाकार घेऊन दलित-मुस्लीम असा समझोता केला होता. तो भाग पाकिस्तानमध्ये गेला म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधित्व रद्द झाले होते, परंतु दलित-मुस्लीम आघाडीचे आरंभीचे हे यशस्वी प्रारूप होते.

पन्नाशीच्या दशकात दलित नेतृत्वाने सामाजिक समझोत्याचा मार्ग वापरला होता. १९५२ च्या लोकसभा निवडणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समविचारी पक्षांशी जुळवाजुळव सुरू केली होती. राम मनोहर लोहिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमध्ये पक्षीय समझोत्याचा विचार सुरू होता. याखेरीज एस. एम. जोशी, अत्रे या नेत्यांशी आंबेडकरांनी आघाडीसाठी पत्रव्यवहार केला होता. किंबहुना, या नेत्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षात सहभागी व्हावे, असे आंबेडकरांना वाटत होते. म्हणजेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम, ओबीसी, उच्च जाती यांच्याशी लोकशाहीच्या व्यापक चौकटीमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात, हा प्रयत्न दलितांनी सत्ताधारी वर्ग व्हावे म्हणून होता, तसेच दलित मुक्तीचा सत्ताधारी होणे हा एक मार्ग होता, परंतु आंबेडकरांच्या निधनामुळे हे प्रारूप प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरले नाही, परंतु संयुक्त महाराष्ट्र समितीबरोबर अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने आघाडी केली. या आघाडीस यश मिळाले होते.

साठीच्या दशकामध्ये बी. पी. मोर्य यांनी दलित-मुस्लीम अशी सामाजिक आघाडी स्थापन केली होती. १९६२ च्या निवडणुकीत बी. पी. मोर्य यांचे संबंध स्थानिक मुस्लीम नेत्यांशी मित्रत्वाचे होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातून तीन उमेदवार लोकसभेवर निवडून गेले होते. बी. पी. मोर्य (अलिगड), मुजफ्फर हुसेन (मोरादाबाद) व ज्योती स्वरूप (हथरस) या तीनपैकी दोन उमेदवार सर्वसाधारण जागेवर विजयी झाले होते. मोर्य व हुसेन हे सर्वसाधारण जागेवरून निवडून आले होते. म्हणजेच उत्तर प्रदेशातदेखील दलित-मुस्लीम आघाडीचे प्रारूप प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरले होते.

प्रकाश आंबेडकरांनी अशा प्रकारचा सामाजिक समझोता करण्याचा प्रयत्न नव्वदीच्या दशकापासून सातत्याने केला. त्यास अकोला प्रारूप म्हणून ओळखले जाते. एमआयएमने पुढाकार घेऊन मुस्लीम-दलित ‘मतपेटी’ तयार केली. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा व महानगरपालिकांमध्ये ‘मुस्लीम-दलित’ मतपेटीचा प्रभाव दिसला. सध्या भारिप-बहुजन महासंघ व एमआयएम या दोन संघटना ‘दलित-मुस्लीम’ अशी आघाडी करत आहेत. ही घटना नवीन नाही, तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथे घडलेली घटना आहे. या घडामोडीचा परिणाम काँग्रेसविरोधी होईल ही चर्चा अपुरी आहे. कारण दलित-मुस्लीम हे दोन्ही समूह वंचित आहेत. त्यामुळे अशा वंचित घटकांमधून एक राजकीय ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ती एक डावपेचात्मक व करारशक्ती आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMuslimमुस्लीम