शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गणरायाच्या आगमनाची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 13:27 IST

मिलिंद कुलकर्णीसुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे आगमनाला आता चार दिवस उरले आहे. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी स्वागताची तयारी सुरु आहे. बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याच्या खोलीत आवराआवर करणे, आरासीचे जुने साहित्य शोधणे, नवीन कोणते घ्यायचे याविषयी विचारविनीयम करणे, मूर्तीची आगाऊ नोंदणी करणे, उकडीच्या मोदकांची नोंदणी करणे, रोज दुर्वा आणि फुले देण्यासाठी ...

मिलिंद कुलकर्णीसुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे आगमनाला आता चार दिवस उरले आहे. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी स्वागताची तयारी सुरु आहे. बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याच्या खोलीत आवराआवर करणे, आरासीचे जुने साहित्य शोधणे, नवीन कोणते घ्यायचे याविषयी विचारविनीयम करणे, मूर्तीची आगाऊ नोंदणी करणे, उकडीच्या मोदकांची नोंदणी करणे, रोज दुर्वा आणि फुले देण्यासाठी फुलवाल्याशी बोलणे ही पुरुष मंडळींची कामे असल्याने त्यांची लगबग सुरु झाली आहे. महिला वर्गाची धावपळ तर सर्वाधिक असते. चतुर्थीच्या साग्रसंगीत पूजेच्या साहित्यापासून तर रोज सकाळ-संध्याकाळ दाखवायच्या नैवेद्याची यादी करणे, वाणसामानाची यादी करणे, घरात गौरी असतील तर तयारी दुप्पट करावी लागते. नातलग येणार असल्याने त्यांची व्यवस्था असे सगळे गृहिणीला बघावे लागणार असते. हाती असलेल्या एकमेव रविवारी करावयाच्या कामांची यादी तयार करुन झाली आहे. रविवार पूर्ण बाजारपेठेत जाणार हे निश्चित आहे. एवढी धावपळ असूनही ‘बाप्पा’ येणार असल्याचा आनंद आणि उत्साह प्रचंड आहे. बाजारपेठेतदेखील चैतन्य पसरले आहे. आर्थिक आघाडीवरील चढउतार, महागाई, करप्रणालीतील बदल, पर्जन्यमान अशा सगळ्या गोष्टींमुळे उद्योग-व्यापारावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. ‘सुखकर्ता, दु:खहर्त्या’च्या आगमनाने हे सगळे दूर होईल. चिंता मिटतील आणि बाजारपेठेत पुन्हा वैभव जाणवेल, अशी आशा घेऊन उद्योजक, व्यापारी तयारीत आहेत. गणेशोत्सव मंडळांची तयारी तर महिनाभरापासून सुरु आहे. आरास कधीच निश्चित झाली आहे. त्याची उभारणीदेखील निम्म्याहून अधिक पूर्ण होत आली आहे. मूर्तीची नोंदणी झाली आहे. बाप्पांचे वाजत गाजत स्वागत करण्याचे नियोजन पूर्ण झाले असून विसर्जन मिरवणुकीसाठी ढोलपथक सज्ज झाले आहेत. प्रशासनाच्या परवानगीची प्रक्रिया बऱ्यापैकी सोपी झाल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. डीजे, गुलालावरील बंदी मंडळांनी कधीच स्विकारली आहे. पर्यावरण पूरक उत्सव, विधायक वळण, समाजोपयोगी उपक्रम यासाठी महामंडळांची आचारसंहिता पाळण्यासाठी सर्वच मंडळांची तयारी आहे. सार्वजनिक मंडळांसोबत गल्लीबोळातील छोटी मंडळेदेखील जय्यत तयारीत आहेत. रात्री उशिरापर्यंत बैठका सुरु आहेत. नियोजनाचा दोन-तीनदा आढावा घेण्यात येत आहे. ऐनवेळी येणाºया अडचणी, समस्यांवर मार्ग करण्यासाठी विचारांचे अदान-प्रदान केले जात आहे. महसूल, पोलीस, महावितरण, महापालिका या प्रशासनांनीदेखील उत्सवाची पूर्वतयारी केली आहे. आढावा बैठका, पूर्वतयारी बैठका, शांतता समितीच्या बैठका, बंदोबस्त अशा सर्व पातळीवर नियोजनबध्द तयारी सुरु आहे. मंगलदायी सणाला गालबोट लागू नये, म्हणून प्रत्येक शासकीय विभाग काटेकोर नियोजन करीत आहे.लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याविषयी जनजागृतीसाठी सुरु केलेल्या या उपक्रमाने शतकीय उंबरठा केव्हाच ओलांडला आहे. विधायक उपक्रमांमुळे हा उत्सव महाराष्टÑाची ओळख बनला आहे. पर्यटनाच्यादृष्टीने त्याचे मोल वाढले आहे. त्यासोबतच समाजाची जनजागृती करण्यासाठी या उत्सवात जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे. समाजापुढे असलेल्या जातीयता, स्त्रीभ्रुणहत्या,दहशतवाद, भ्रष्टाचार अशा समस्यांविषयी जनजागृतीसाठी सजीव देखावे, चित्र प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. गणेश मंडळांमध्ये शिस्त, विधायकता वाढावी, म्हणून शासन, सामाजिक संस्थांतर्फे स्पर्धा आयोजित केल्या जातात. बक्षीसे देऊन मंडळांना गौरविले जाते. त्यामुळे अधिकाधिक मंडळे या विधायकतेकडे वळतील, हा उद्देश सफल होऊ लागला आहे. किरकोळ अडचणी, वाद हे घडत असतात, परंतु त्यावर मात करीत हे उत्सव व्यापक आणि देखणे होत आहे, हे विशेष.

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Jalgaonजळगाव