शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गर्दी ओसरली, उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 4:42 AM

न्यायालयाने दहीहंडीवरील थरांचे आणि वयाचे निर्बंध शिथिल केल्यानंतरही दहीहंडी उत्सवातील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले.

न्यायालयाने दहीहंडीवरील थरांचे आणि वयाचे निर्बंध शिथिल केल्यानंतरही दहीहंडी उत्सवातील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले. मात्र उत्सवात सहभागी झालेल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या गोविंदांच्या उत्साहाने मुंबापुरीवर हंडीचा ‘फिव्हर’ चढल्याचे चित्र होते. विशेषत: प्रायोजक आणि आयोजक यांची घटलेली संख्या ओसरत्या गर्दीला कारणीभूत असली तरी ‘माना’च्या हंड्या फोडणाºया मोजक्या गोविंदा पथकांसह सातत्य टिकवून ठेवणाºया गोविंदांच्या रेट्यामुळे का होईना उत्सवातील उत्साही गोविंदांनी जान आणली होती. गोविंदा पथकांमध्ये सामील होणाºया गोविंदांचे वय आणि थरांचे निर्बंध अशा दोन प्रमुख कारणांमुळे गोविंदा गेल्या काही वर्षांपासून हिरमुसला होता. न्यायालयीन प्रक्रिया, राज्य सरकारची भूमिका आणि गोविंदांमधील अंतर्गत स्पर्धा; अशा अनेक कलहांनी हंडीला घेरले होते. विशेषत: लाखमोलाच्या हंड्या फोडण्यासाठी पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील गोविंदा पथकांमध्ये लागलेल्या चढाओढीने उत्साहासोबतच स्पर्धा आणि अर्थकारणाचा खेळ दिसून आला. विशेषत: मोठ्या गोविंदा पथकांसह छोटी गोविंदा पथके लाखमोलाच्या हंड्या फोडून येणाºया गणेश उत्सवाची तजवीज करण्यात मग्न होते. विशेषत: नऊ एक वर्षांपूर्वी पूर्व उपनगरात सुरू झालेल्या ‘देशातील सर्वांत मोठ्या हंडी’ने उत्सवाला ‘बाजारीकरणा’चे स्वरूप दिले. ठाण्यातील लाखमोलाच्या हंड्यांसह वरळी येथील तारकादळांच्या हंडीनेही गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचविला होता. प्रत्यक्षात मात्र थरांसह बालगोविंदांच्या मुद्द्यांवर सुरू झालेली न्यायालयीन प्रक्रिया आणि दरम्यानच्या काळात प्रायोजकांसह आयोजकांनी मागे घेतलेले पाऊल ओसरत्या गर्दीला कारणीभूत ठरले. परिणामी लाखमोलाच्या हंड्याही कमी झाल्या. उत्सवाला राजकारणाचे गालबोट लागले आणि उत्साह आणि उत्सवाभोवती केंद्रित असणारी हंडी अर्थकारणाभोवती फिरू लागली. गेल्या वर्षी न्यायालयाच्या निर्णयामुळे उत्साह ओसरला होता. यंदा वाट मोकळी होऊनही प्रायोजकांअभावी दहीहंडीतील उत्साह पूर्वीप्रमाणे दिसला नाही. त्यातूनच ६० ते ७० टक्के आयोजन कमी झाले. नोटाबंदीपाठोपाठ आलेल्या जीएसटीचा परिणाम असल्याचे आयोजक दबक्या आवाजात सांगू लागले आहेत. तथापि, ‘गर्दी ओसरली तरी उत्साह कायम’ हे ठळकपणे निदर्शनास आले. एकूणच न्यायालयाचे निर्बंध हटनूही ‘वलयप्राप्त’ हंडी कोरडीच राहिल्याचे अधोरेखित झाले.