शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

संगीत नाटकांचा मानदंड : सौभद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:39 IST

अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाच्या पहिल्या प्रयोगास परवा १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत... मराठी संस्कृतीत काव्य-शास्त्र-विनोदाला प्राचीन काळापासून खूप महत्त्वाचे स्थान आहे.

अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाच्या पहिल्या प्रयोगास परवा १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत...मराठी संस्कृतीत काव्य-शास्त्र-विनोदाला प्राचीन काळापासून खूप महत्त्वाचे स्थान आहे. यातूनच मराठी नाटकाचा उगमही झाला. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग करून मराठी रंगभूमीची सुरुवात केली. या मराठी रंगभूमीने नुकतेच ५ नोव्हेंबरला १७५ व्या वर्षात पदार्पण केले. संगीत हाच आत्मा असलेलं गद्य म्हणजे ‘संगीत नाटक’. नांदीनं प्रारंभ, भरतवाक्याचा सुरेल शेवट आणि दरम्यान ठिकठिकाणी पदं हे संगीत नाटकाचं बाह्यरूप. पूर्ण नाटकात संगीताचा अखंड प्रवाह वाहत राहणं, गद्याचा प्रभाव संगीतानंच वाढवणारं नाटक म्हणजे संगीत नाटक. या संगीत नाट्यपरंपरेतील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेले ‘संगीत सौभद्र’ हे एक महत्त्वाचं नाटकं. त्याच्या पहिल्या प्रयोगास १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. पुण्यातील फरासखान्याजवळील पूर्णानंद नाट्यगृहात हा पहिला प्रयोग सादर झाला. ‘सौभद्र’ नाटक लिहून अण्णासाहेबांनी संगीत नाटक अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. आजतागायत सौभद्र नाटकाची, त्यातील पदांची मोहिनी मराठी रसिकांवर कायम आहे. म्हणूनच संगीत रंगभूमीच्या इतिहासात व वर्तमानातही या नाटकाचे मोल अधिक आहे.‘सौभद्र’ हे संगीत नाटकाचा मानदंड ठरून एक नाट्यशैली म्हणून मान्य झाले. या नाटकाचे यश केवळ त्यातील संगीतावर निर्भर राहिलेले नाही, तर या नाटकातील पात्रांचे मानवी पातळीवरचे परस्परसंबंध, नातेसंबंध लोभसवाणे वाटतात. वरकरणी ही सुभद्रेच्या विवाहाची कथा. पण केवळ पुराणकाळातील कुणा एका सुभद्रेची विवाहकहाणी म्हणून ती राहत नाही, ती कुणाही मध्यमवर्गीय घरातील एखाद्या मुलीच्या विवाहाची कहाणी ठरते. दर्शनी पौराणिक कथानक घेऊनही तसे हे सामाजिक नाटक आहे. सुभद्रा, अर्जुन, कृष्ण, बलराम, रुक्मिणी, नारद इत्यादि परिचितांमधून ही कहाणी उभी राहिलेली आहे. त्यांच्या जीवनातील प्रसंग, संवाद, संघर्षबिंदू या साºया गोष्टी मराठी प्रेक्षकाला जवळच्या वाटल्याने आज इतक्या वर्षांनंतरही ‘सौभद्र’ नाटकाची रसिकप्रियता कमी झालेली नाही. अण्णासाहेब किर्लोस्कर आपण लिहिलेले नाटक रंगमंचावर कसे व्हावे यासाठी जे म्हणून काही करावे लागते ते जाणणारे होते. किर्लोस्कर कंपनीतील बाळकोबा नाटेकर तर पिढीजात गवई. यातील गीतांच्या चालींमध्ये पारंपरिकतेबरोबरच टप्पा, कर्नाटकी रागदारीप्रधानही पदं होती. ‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी’ या पदाची पूर्वीची लावणी ढंगाची चाल बदलून पुढे बालगंधर्वांनी ती भीमपलास रागात गायली. ‘वद जाऊ कुणाला’ या पदाच्या सध्याच्या ढंगाचं योगदान हिराबाई बडोदेकरांचे आहे. अशा अनेक कहाण्यांसह सुभद्रेची भूमिका बालगंधर्वांप्रमाणेच अनेकांनी स्त्रीपार्टी‘ नट तसेच गायक अभिनेत्रींनी अजरामर केली. तीनच कलावंतांचा समावेश असलेले त्रिपात्री सौभद्र नाटकाचा अनोखा प्रयोग लता व कीर्ती शिलेदार या भगिनींनी साकारला तसेच सौभद्रच्या पहिल्या प्रयोगास १२५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा ‘मराठी रंगभूमी’ पुणे संस्थेने पुढाकार घेऊन पुण्यातील पूर्णानंद थिएटर पासून बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत रथयात्रा काढून सौभद्र नाटकाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवही साजरा केला. संगीत नाटकाबद्दल बोलताना प्रा. शिवाजीराव भोसले एकदा म्हणाले होते, ‘प्रत्यक्ष अनुभवाला येणारं ज्ञान, सामर्थ्य, अस्तित्व या गुणांचं कल्पनारूप संगीत नाटकाला मिळालं आहे. संगीत नाटक हे एक मनोनिर्मित पण मनोरम कल्पनाशिल्प आहे.’ संगीत सौभद्रचे स्मरणरंजन म्हणूनच महत्त्वाचे व हवेहवेसे आहे. 

- विजय बाविस्कर (vijay.baviskar@lokmat.com)