शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

संगीत नाटकांचा मानदंड : सौभद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:39 IST

अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाच्या पहिल्या प्रयोगास परवा १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत... मराठी संस्कृतीत काव्य-शास्त्र-विनोदाला प्राचीन काळापासून खूप महत्त्वाचे स्थान आहे.

अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाच्या पहिल्या प्रयोगास परवा १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत...मराठी संस्कृतीत काव्य-शास्त्र-विनोदाला प्राचीन काळापासून खूप महत्त्वाचे स्थान आहे. यातूनच मराठी नाटकाचा उगमही झाला. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग करून मराठी रंगभूमीची सुरुवात केली. या मराठी रंगभूमीने नुकतेच ५ नोव्हेंबरला १७५ व्या वर्षात पदार्पण केले. संगीत हाच आत्मा असलेलं गद्य म्हणजे ‘संगीत नाटक’. नांदीनं प्रारंभ, भरतवाक्याचा सुरेल शेवट आणि दरम्यान ठिकठिकाणी पदं हे संगीत नाटकाचं बाह्यरूप. पूर्ण नाटकात संगीताचा अखंड प्रवाह वाहत राहणं, गद्याचा प्रभाव संगीतानंच वाढवणारं नाटक म्हणजे संगीत नाटक. या संगीत नाट्यपरंपरेतील अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेले ‘संगीत सौभद्र’ हे एक महत्त्वाचं नाटकं. त्याच्या पहिल्या प्रयोगास १८ नोव्हेंबर रोजी १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. पुण्यातील फरासखान्याजवळील पूर्णानंद नाट्यगृहात हा पहिला प्रयोग सादर झाला. ‘सौभद्र’ नाटक लिहून अण्णासाहेबांनी संगीत नाटक अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. आजतागायत सौभद्र नाटकाची, त्यातील पदांची मोहिनी मराठी रसिकांवर कायम आहे. म्हणूनच संगीत रंगभूमीच्या इतिहासात व वर्तमानातही या नाटकाचे मोल अधिक आहे.‘सौभद्र’ हे संगीत नाटकाचा मानदंड ठरून एक नाट्यशैली म्हणून मान्य झाले. या नाटकाचे यश केवळ त्यातील संगीतावर निर्भर राहिलेले नाही, तर या नाटकातील पात्रांचे मानवी पातळीवरचे परस्परसंबंध, नातेसंबंध लोभसवाणे वाटतात. वरकरणी ही सुभद्रेच्या विवाहाची कथा. पण केवळ पुराणकाळातील कुणा एका सुभद्रेची विवाहकहाणी म्हणून ती राहत नाही, ती कुणाही मध्यमवर्गीय घरातील एखाद्या मुलीच्या विवाहाची कहाणी ठरते. दर्शनी पौराणिक कथानक घेऊनही तसे हे सामाजिक नाटक आहे. सुभद्रा, अर्जुन, कृष्ण, बलराम, रुक्मिणी, नारद इत्यादि परिचितांमधून ही कहाणी उभी राहिलेली आहे. त्यांच्या जीवनातील प्रसंग, संवाद, संघर्षबिंदू या साºया गोष्टी मराठी प्रेक्षकाला जवळच्या वाटल्याने आज इतक्या वर्षांनंतरही ‘सौभद्र’ नाटकाची रसिकप्रियता कमी झालेली नाही. अण्णासाहेब किर्लोस्कर आपण लिहिलेले नाटक रंगमंचावर कसे व्हावे यासाठी जे म्हणून काही करावे लागते ते जाणणारे होते. किर्लोस्कर कंपनीतील बाळकोबा नाटेकर तर पिढीजात गवई. यातील गीतांच्या चालींमध्ये पारंपरिकतेबरोबरच टप्पा, कर्नाटकी रागदारीप्रधानही पदं होती. ‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी’ या पदाची पूर्वीची लावणी ढंगाची चाल बदलून पुढे बालगंधर्वांनी ती भीमपलास रागात गायली. ‘वद जाऊ कुणाला’ या पदाच्या सध्याच्या ढंगाचं योगदान हिराबाई बडोदेकरांचे आहे. अशा अनेक कहाण्यांसह सुभद्रेची भूमिका बालगंधर्वांप्रमाणेच अनेकांनी स्त्रीपार्टी‘ नट तसेच गायक अभिनेत्रींनी अजरामर केली. तीनच कलावंतांचा समावेश असलेले त्रिपात्री सौभद्र नाटकाचा अनोखा प्रयोग लता व कीर्ती शिलेदार या भगिनींनी साकारला तसेच सौभद्रच्या पहिल्या प्रयोगास १२५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा ‘मराठी रंगभूमी’ पुणे संस्थेने पुढाकार घेऊन पुण्यातील पूर्णानंद थिएटर पासून बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत रथयात्रा काढून सौभद्र नाटकाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवही साजरा केला. संगीत नाटकाबद्दल बोलताना प्रा. शिवाजीराव भोसले एकदा म्हणाले होते, ‘प्रत्यक्ष अनुभवाला येणारं ज्ञान, सामर्थ्य, अस्तित्व या गुणांचं कल्पनारूप संगीत नाटकाला मिळालं आहे. संगीत नाटक हे एक मनोनिर्मित पण मनोरम कल्पनाशिल्प आहे.’ संगीत सौभद्रचे स्मरणरंजन म्हणूनच महत्त्वाचे व हवेहवेसे आहे. 

- विजय बाविस्कर (vijay.baviskar@lokmat.com)