शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

‘गुन्हेगार’ संतांची दहशत

By admin | Updated: November 24, 2014 04:20 IST

श्रद्धा नेहमीच अंध असते, असे मानले जाते. पण, एखाद्या अंध व्यक्तीला जाणूनबुजून खड्ड्यात टाकणे हा जसा गुन्हा आहे, तसेच लोकांच्या भावनांचा वापर स्वार्थ साधण्यासाठी करून घेणे, हाही गुन्हा आहे.

विजय दर्डा(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)श्रद्धा नेहमीच अंध असते, असे मानले जाते. पण, एखाद्या अंध व्यक्तीला जाणूनबुजून खड्ड्यात टाकणे हा जसा गुन्हा आहे, तसेच लोकांच्या भावनांचा वापर स्वार्थ साधण्यासाठी करून घेणे, हाही गुन्हा आहे. याला विश्वासघातच म्हणावे लागेल. धार्मिक भावनांना आवाहन करून विश्वासघात करण्याच्या घटना मानवी इतिहासात जागोजागी आढळतात. धर्माच्या नावाखाली हिंसाचार आणि शोषण करण्याचा प्रकार सर्वच धर्मांमध्ये आढळून येतो. धर्मांमध्ये जेव्हा गुन्हेगारी तत्त्वे सामील होतात तेव्हा सारा समाजच घसरणीला लागतो. पण, धर्मातील आध्यात्मिक भावना माणसाला उच्चकोटीत नेऊन पोहोचवितात, हेही तितकेच खरे आहे. या भावनांच्या आधारावर समाजातील नीतिमत्ता टिकून आहे. त्यामुळे आपल्या सामान्य आयुष्याला वेगळाच अर्थ प्राप्त होतो. बाबा, ढोंगी साधू, तीर्थक्षेत्री आढळणारे भिक्षेकरी आणि धर्माच्या नावाखाली देशभर भ्रमंती करणारे भिक्षुक हे सर्व आपल्या समाजाचे अविभाज्य घटक आहेत. समाज त्यांचे पालनपोषण करतो, त्यांना खपवून घेत असतो. पण, आता काळ बदलला आहे. हल्ली कोणत्याही गोष्टीला बाजारी स्वरूप येऊन त्यातूनच व्यावसायिक हितसंबंध निर्माण होत आहेत आणि त्यात गुन्हेगारीही शिरत आहे. अशा परिस्थितीत रामपालसारखे निरुपद्रवी दिसणारे लोक पाहता पाहता दहशतवादी दैवी पुरुषाचे स्वरूप प्राप्त करतात आणि ते सरकारलाही आव्हान देण्यास सज्ज होतात. रामपालने दीर्घकाळ सरकारी यंत्रणेला धाब्यावर बसवले आणि सरकारला शरण येण्याचे टाळले, ही गोष्ट दुर्लक्षिण्याजोगी नाही. अतिरेक्यांपाशी असते तशी सर्व तऱ्हेची दहशतवादी सामग्री त्याच्याजवळ होती. शस्त्रास्त्रे तर होतीच, पण ढाल म्हणून वापरण्यासाठी त्याच्याकडे मोठे मनुष्यबळ होते. अनेक दिवस पोलिसांच्या वेढ्याला तोंड देता येईल एवढी अन्नसामग्री, पिण्याचे पाणी आणि जळण त्याच्यापाशी होते. याशिवाय प्रशिक्षित सशस्त्र कमांडोजदेखील त्याच्याकडे होते. ही एवढी साधनसामग्री एखाद्या संतपुरुषाला कशाला हवी? ती त्याच्याकडे आहे, याचा अर्थ त्यामागे गुन्हेगारी हेतू आहे, असाच घ्यावा लागेल. त्यांना या गोष्टींचा वापर सरकारविरुद्ध करायचा नव्हता, तर त्यांनी हे सारे कशासाठी जमवले होते? त्यांनी जे केले त्याचे समर्थन करण्याजोगे कोणतेही कारण त्यांच्यापाशी नव्हते. या सर्व कृत्यांवर भंपकबाजीचा ठसा स्पष्टपणे जाणवतो. त्याची सुरुवात स्वत:ला संत कबीर किंवा गुरू नानक यांचा अवतार असल्याचा दावा करण्यापासून झाली. शिष्यपरिवार वाढू लागला तशी त्यांची जीवनशैलीदेखील बदलली. त्यांच्या धार्मिक शिकवणीतही बदल झाला. लोकांना आकर्षित करण्याची शक्ती त्यांच्याकडे होतीच. गरिबीने गांजलेल्या समाजात आपल्या मर्यादांचे उल्लंघन करणारे अनेक ह्यसंतह्ण दिसून येतात व पाहता पाहता त्यांचे हितसंबंध निर्माण होतात. त्यांचा हा धंदा सुरू राहावा, यासाठी श्रीमंत आणि सामर्थ्यवान आश्रयदाते त्यांना मदत करतात. फुकटात राहायला, खायला मिळते म्हणून मोठा शिष्यसंप्रदाय त्यांच्याभोवती गोळा होतो. त्यामुळे हे आश्रम पाहता पाहता समृद्ध होतात. त्यातच त्यांना राजकीय समर्थन लाभले, की त्यांचे आणखीनच आकर्षण वाटू लागते. राजकारणी आणि हे बाबा परस्परांचे स्वार्थ जपत असतात. हे संबंध परस्परावलंबी असतात. बाबांना आश्रयदाते मिळतात आणि राजकारण्यांना मतदार मिळतात. रामपालबाबाचीदेखील स्वत:ची व्होट बँक होती आणि त्याने आर्य समाजाच्या विरुद्ध संघर्षही केला होता. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा हे स्वत: आर्य समाजाचे आहेत. रामपालच्या सतलोक आश्रमामध्ये राष्ट्रीय समाज सेवा समितीचे मुख्यालय होते. बाबाला अटक करण्यासाठी येणाऱ्या हुडांच्या पोलिसांना बाबाचे पोलीस तोंड देत होते. रामपालबाबा किंवा आसारामबापू यांच्यापाशी दैवी शक्ती आहे, असे समजले जात होते आणि त्यामुळे ते कायद्यापेक्षा मोठे आहेत, असा समज त्यांच्या भक्तांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे न्यायालयासमोर शरण येण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा आपल्या भक्तांचा पुढे करून त्यांनी अटक टाळण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर राजकीय सूड उगवण्यात येत आहे, असे आसारामबापू आणि रामदेवबाबा म्हणतात आणि काँग्रेसच्या सोनिया गांधींना त्यासाठी जबाबदार धरतात. पण, सरते शेवटी त्यांना कायद्यासमोर शरणागती पत्करावी लागली. सुरुवातीला या बाबांनी समंजसपणा दाखविला. पण नंतर मात्र या सत्पुरुषांनी पोलिसांना टाळण्याचा प्रयत्न केला. पण, त्यामुळे या बाबांच्या आश्रमामध्ये भक्तांचे शोषण होत होते, हे उघडकीस आले व सर्वच कृष्णकृत्ये उघड झाली, हे चांगले झाले. हे सामाजिक संकट केवळ कायद्याने अथवा सरकारी कारवाईने दूर होणार नाही. धर्माच्या गैरवापराविरुद्ध दीर्घकाळ लढा द्यावा लागणार आहे. सामाजिक जागृतीतून आणि ज्ञानाच्या प्रसारातून हे संकट दूर होऊ शकेल. अर्थात, यात सरकारची कोणतीच भूमिका असणार नाही, असे म्हणता येणार नाही. अशा संतांच्या गैरकृत्यांच्या विरोधात शासनाने कठोर कारवाई करायला हवी. अनेक संत हे बेकायदेशीर कृत्यात अडकले आहेत. त्यांच्याविरुद्ध कोणतेही भय न बाळगता सरकारने कृती करायला हवी. धर्माच्या नावाने होणारे भावनिक शोषण थांबविलेच पाहिजे.रामपालची सेना एका रात्रीत निर्माण झालेली नाही. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे हे सैन्य निर्माण होऊ शकले. सुरक्षेतील गलथानपणामुळे हे घडले, असे समजून, याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी कारवाई करायला हवी. भविष्यात या तऱ्हेचे रामपाल निर्माण होऊ नयेत, याकडे लक्ष पुरवायला हवे. या आश्रमाविरुद्ध झालेल्या कारवाईत फक्त सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे ही शांततामय कारवाई होती, असा दावा करण्यात येत आहे. पण, एकही निरपराध व्यक्ती मरता कामा नये, हे बघितले गेले पाहिजे. तेथील परिस्थिती स्फोटक होती, हे मान्यच करावे लागेल. रामपालसारख्या क्रूर व्यक्ती किती प्रमाणात विध्वंस घडवून आणू शकतील, याला मर्यादाच नाही. त्यांचा मुळातूनच नायनाट करायला हवा.