शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
2
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
3
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
4
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
5
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
6
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
7
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
8
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
9
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
10
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
11
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
12
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
13
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
14
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
15
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
16
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
17
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
18
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
19
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
20
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला

जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:29 AM

जगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नातं फक्त रक्ताचं नसतं. एकाच आईच्या पोटी जन्मलेली विविध विचारसरणींची मुलं आणि विविध आयांच्या पोटी जन्मलेली एकाच विचारसरणीचे बांधव.

- किशोर पाठकजगण्याच्या समृद्ध संकल्पना माणसाला जिवंत ठेवतात. हा जन्म सुंदर आहे, माझ्यासाठी आलाय आणि मला एकदाच मिळालाय यावर आपण जगू शकतो. पुढल्या जन्माचं कुणी पाहिलं. घ्या मजा करून या जन्मात. मग मस्त खा, प्या, भरपूर हिंडा-फिरा माणसं जोडा, नाती जोडा असं वाटतं. नातं फक्त रक्ताचं नसतं. एकाच आईच्या पोटी जन्मलेली विविध विचारसरणींची मुलं आणि विविध आयांच्या पोटी जन्मलेली एकाच विचारसरणीचे बांधव. मग कुठे जुळवायचा हा हिशेब! सख्खा नवरा वा बायको एकमेकांना विचारत नाहीत; आणि नात्यात न बांधलेली व्यक्ती आपल्यावर जीव टाकते हे कोणतं गणित? थोडक्यात नातं रक्तात नसतं, जीव जडवण्यावर असतं. आपण प्रत्येकाच्या कुठल्या गोष्टीवर प्रेम करतो, जीव लावतो. कुणाचा गळा, कुणाचा शस्त्रक्रिया करणारा हात, कुणाचा पळणारा पाय, कुणाचा कुंचला, कुणाच्या हातातील कला, कुणाचा शब्द... आपण म्हणतो ना तो माणूस नाही मला आवडत. पण त्याचं गाणं, कविता, अभिनय, दिग्दर्शन एकाच मुशीतून बाहेर पडलेल्या ६४ कला या सर्वांवर जीव लावता लावता आपला जीव कधी संपतो ते कळत नाही. हा जीव जडण्याचा प्रकार असतो. बघा जीव, जीवन आणि जीव लावणे एकाच शब्दाचे विराट दर्शन. आपण आपला केवढा जीव म्हणतो या एकाच जिवाने जीव लावायचा जिवात जीव असेपर्यंत जीवनात जगायचं, जीवन घडवायचं, जीव नकोसा वा हवासा होईपर्यंत व्यक्तीवर जीव लावायचा आणि शेवटी जिवाला जीव देऊन जीवन संपवायचं. हीच जीवनाची इतिकर्तव्यता. आयुष्याची चाळीस पन्नास वर्षे एकत्र जगून माणसं एकमेकांना कळत नाहीत. म्हातारपणी कळतं की हा माणूस फक्त कामाकरिता, पैशांकरिता वासनेकरिता आपला होता. अशा साठीच्या स्त्री-पुरुषांना सहवासाची निरर्थकता जाणवते तेव्हा उतारवयात एकटेपण अनुभवतांना तो वा ती आठवते. खूप छान वाटतं आठवणींनी वा वाईटही वाटतं. ही व्यक्ती आपल्याजवळ आली होती पण आपला ताठरपणा, संकोच, स्वाभिमान, स्वार्थ, सामाजिक रुढींचं जाळं या सगळ्यांनी हा वा ही लांब गेले. मग पश्चाताप त्यातूनही जळणारा जीव, कोपणारा जीव, दु:ख करणारा जीव, काठोकाठ नैराश्याने आत्महत्येचा प्रयत्न, विफलता. म्हणून आजच आपला जीव हवेत सोडा. जिवात जीव असेपर्यंत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. मरताना हे राहून गेलं. ही भावना नको. हवं ते आणि हवं तेच, तसं जगा! गेलेला क्षण पुन्हा येत नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या