शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

गाय झाली ‘राजकीय प्राणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 07:04 IST

तीन वर्षांपूर्वी अख्ख्या भारतवंशात ‘चाय पे चर्चा’ला ऊत आला होता. केवळ टपऱ्यांवरच नव्हे तर कॉर्पोरेटमधेही कधी नव्हे त्या चाय पे चर्चा रंगू लागल्या होत्या.

तीन वर्षांपूर्वी अख्ख्या भारतवंशात ‘चाय पे चर्चा’ला ऊत आला होता. केवळ टपऱ्यांवरच नव्हे तर कॉर्पोरेटमधेही कधी नव्हे त्या चाय पे चर्चा रंगू लागल्या होत्या. अलीकडच्या वर्षात मात्र या ‘चाय’ची जागा ‘गाय’ने घेतली आहे, बरे का! देशात गाय हा एवढा कळीचा आणि देशभक्तीचा मुद्दा होईल, याचा विचारही बहुदा कुणी केला नसावा. दस्तुरखुद्द गार्इंनासुद्धा आपले ‘अच्छे दिन’ येणार हे कुठे माहिती होते? आश्चर्य म्हणजे, टीआरपीत जंगलचा राजा वाघोबालाही तिने मागे टाकले आहे म्हणे! अशात देशवासीयांचे हे असीम प्रेम बघून गाईचा ऊर भरून येणारच! नव्हे त्या चौखूर उधळणारच! आणि हे स्वाभाविकच म्हणायचे. कुठल्याही सुरक्षेची मागणी न करता स्वयंघोषित सुरक्षा फौज त्यांच्यासाठी तैनात होत असेल तर ही या गरीब कपिलांसाठी अभिमानाचीच बाब असणार ना! अर्थात तिच्या या सुरक्षा फौजेचा भावनांक इतका अतिरेकी आणि नकारात्मक आहे की गाईला माणूस बनविण्याच्या प्रयत्नात तीच पशू बनते आहे, ते अलाहिदा! एकंदरीत काय तर वाघ, सिंह या राष्ट्रीय प्राण्यांच्या तुलनेत गाईचे वाढते ‘वजन’ बघितल्यावर तिला ‘राजकीय प्राणी’ जाहीर करण्यास कुणाची काही हरकत नसावी. तसे एखाद्याला राजकीय कवचकुंडले प्राप्त झाली की त्याचा कसा उद्धार होतो आणि ती निघाली की बडेबडे असामी कसे जाळ्यात अडकतात याची कल्पना तुम्हा आम्हा सर्वांना आहेच. गायही काही ‘दूध’खुळी नाही. म्हणूनच कदाचित आधार कार्ड मिळणार ही आनंदवार्ता कळल्यावर एकदम ‘रिअ‍ॅक्ट’ न होण्याचेच तिने ठरविले. पण तिच्या या उदोउदोने वाघाचा मात्र प्रचंड जळफळाट होत असल्याचे कानी आले. वर्षानुवर्षे गणना आमची करायची आणि आधारकार्ड मात्र गार्इंना द्यायचे हे काही त्याला पटलेले नाही. भरीसभर म्हणजे हरियाणाचा लुवास येथील लाला लजपतराय पशुचिकित्सा व पशुविज्ञान विद्यापीठाने गार्इंसाठी हायटेक मसाज केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे समजले तेव्हा तर काही विचारायलाच नको. एका अर्थी ही मसाज केंद्रे सर्वांच्याच फायद्याची असणार आहेत. देशभरात अशी मसाज केंद्रे उघडली की गार्इंना रस्त्यांच्या मधे, चौकात आराम करण्याची गरजच भासणार नाही आणि वाहतुकीतील अडथळा आपसूकच दूर होईल. राज्याराज्यांमध्ये गो अभयारण्ये निर्माण करण्याचाही काही राजकीय नेत्यांचा मानस आहे. याशिवाय ‘घर तिथे गाय’ या योजनेचा घाट घातला जातोय. ही योजना अमलात आली तर भविष्यात प्रत्येक इमारतीत गार्इंसाठी राखीव जागा असेल. याला म्हणतात नशीब. गार्इंची तर मज्जाच मज्जा आहे बुवा! फक्त चिंता एकच वाटते, ती ही की पोस्ट-ट्रूथच्या या जमान्यात गाईवरील हे प्रेम आभासी ठरु नये म्हणजे झाले!