शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीमाप्रश्न आता न्यायालयदारी

By admin | Updated: January 17, 2015 00:41 IST

थंडा करके खावो, हा दिल्लीचा शिरस्ता आहे. यामध्येच साठ वर्षांपासून अधिक काळापासून बेळगाव सीमाप्रश्न लोंबकळत पडला आहे. या विषयात कोणाला किती रूची आहे, हाही संशोधनाचा विषय उरला आहे.

थंडा करके खावो, हा दिल्लीचा शिरस्ता आहे. यामध्येच साठ वर्षांपासून अधिक काळापासून बेळगाव सीमाप्रश्न लोंबकळत पडला आहे. या विषयात कोणाला किती रूची आहे, हाही संशोधनाचा विषय उरला आहे. छळ, राजकीय तट व भावनिक संघर्षांच्या वळणावर हा विषय पुन्हा जन्माला आला आहे, २००७ पासून, म्हणजे सात वर्षांहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी यापुढे न्यायालयाने नेमलेले जम्मू- काश्मीरचे निवृत्त न्या. मनमोहन सरीन या कोर्ट कमिशनरकडे होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील यांनी दोन साक्षीदार आणून, पहिली सुनावणी पार पाडली. आपल्या बोलण्यातून एकही शब्द बेळगावच्या विरोधात जाणार नाही, याची दक्षता म्हणून ते सारेच कमिशनरपुढे मराठीतूनच बोलले. दुभाषीने अनुवाद केला. पण या एका कृतीवरून या मंडळीच्या रक्तात महाराष्ट्र किती भिनला आहे, हे वेगळे सांगायला नको. ते राजधानीचे उंबरठे झिजवून थकत नाहीत. मागील सात वर्षांत ते साठ वेळा दिल्लीत आले आहेत. बेळगाव, बिदर, कारवार भागातील १० तालुके आणि ८६५ गावांच्या मराठी बांधवांचा हा मुद्दा कोणत्याही स्थितीत खाली ठेवणार नाही, हा इरादा असला तरी संभाजी पाटील एका गोष्टीने कमालीचे व्यथित होते. मराठी म्हणून आम्ही साठ वर्षे हा मुद्दा रेटून नेतो आहोत. आता आमची मुले कानडीतूनच बोलतात. त्यांना महाराष्ट्रातच परतायचे आहे, पण ही लढाई त्यांना जगू देत नाही. जगाच्या पाठीवरील कोणताही सीमाप्रश्न मनाची अंतरे तयार करतो, सोन्यासारख्या बेळगावचेही तेच झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक नवीन खासदारांना तर हा प्रश्न काय आहे, कोठून सुरू झाला याची अंधुकशीही माहिती नाही. तीन महिन्यांपूर्वी येल्लूर येथील कर्नाटकी पोलिसांच्या अत्याचारानंतर बेळगावातील मराठी मंडळी तेथील माजी महापौर व काही नगरसेवकांना घेऊन गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या भेटीला दिल्लीत आली, तेव्हा अनेक खासदारांनी त्यांना भेटण्याचे सौजन्यही दाखविले नाही. महाराष्ट्रात तरी काय वेगळे घडत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्याचारात जखमी झालेल्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा करून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना यादी करण्याच्या सूचना केल्या होत्या. पण आजपर्यंत ती यादी मंत्रालयातून खाली आली नाही, मग मदत दूरचीच गोष्ट ! या उलट कर्नाटक सरकारने पोलिसांना अभय दिले. आता नवा खेळ मांडला आहे. कमिशनरचा अहवाल न्यायालयात जाईल, तेथून तो बेळगाव कुणाला सोडायचे त्या निर्णयासाठी संसदेत जाईल.जावडेकरांचे ‘कोकमप्रेम’केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर नव्या बंगल्यात राहायला गेले. राजधानीतील त्यांच्या एक तपाच्या कारकीर्दीतील हा तिसरा ‘बंगला बदल’! त्यांच्या हाती पर्यावरण खाते आहे, हे सांगायची गरजच त्यांनी ठेवली नाही. बंगल्याच्या दारातील त्यांचे नावही हिरव्या रंगात कोरले आहे. नव्या घरातील प्रवेश आप्तमित्रांच्या भोजनाने पूर्ण झाला. देश विदेशातील जाणकार मंडळी, पत्रकार, मंत्री सारेच होते. पण प्रकाशजींचा सारा जोर होता, कोकम सरबतावर! ‘एक तरी भुरका मारा’, असा त्यांचा आग्रह होता. प्रकृतीसाठी ते किती उत्तम आहे, हे पटवून देत होते. राज्य व केंद्राच्या पर्यटन विभागाच्या सर्वच स्टॉल्सवर कोकम विक्री व पिण्यासाठी असेल, ही घोषणाच त्यांनी लगोलग करून टाकली. तर एका खासगी विमान कंपनीने जावडेकरांच्या कोकमप्रेमाची दखल घेत प्रवाशांना ‘कोकम’ देणे सुरूही केले. आता हाच कित्ता रेल्वेतही गिरवला जाईल. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू कोकणातीलच असल्याने त्यांनी रेल्वेला लगेचच अंमलबजावणी करा, असे बजावले. लालंूनी ‘कुल्हडमधील दूध’ प्रसिद्ध केले होते, आता कोकम ती जागा घेईल.- रघुनाथ पांडे