शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

सीमाप्रश्न आता न्यायालयदारी

By admin | Updated: January 17, 2015 00:41 IST

थंडा करके खावो, हा दिल्लीचा शिरस्ता आहे. यामध्येच साठ वर्षांपासून अधिक काळापासून बेळगाव सीमाप्रश्न लोंबकळत पडला आहे. या विषयात कोणाला किती रूची आहे, हाही संशोधनाचा विषय उरला आहे.

थंडा करके खावो, हा दिल्लीचा शिरस्ता आहे. यामध्येच साठ वर्षांपासून अधिक काळापासून बेळगाव सीमाप्रश्न लोंबकळत पडला आहे. या विषयात कोणाला किती रूची आहे, हाही संशोधनाचा विषय उरला आहे. छळ, राजकीय तट व भावनिक संघर्षांच्या वळणावर हा विषय पुन्हा जन्माला आला आहे, २००७ पासून, म्हणजे सात वर्षांहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी यापुढे न्यायालयाने नेमलेले जम्मू- काश्मीरचे निवृत्त न्या. मनमोहन सरीन या कोर्ट कमिशनरकडे होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील यांनी दोन साक्षीदार आणून, पहिली सुनावणी पार पाडली. आपल्या बोलण्यातून एकही शब्द बेळगावच्या विरोधात जाणार नाही, याची दक्षता म्हणून ते सारेच कमिशनरपुढे मराठीतूनच बोलले. दुभाषीने अनुवाद केला. पण या एका कृतीवरून या मंडळीच्या रक्तात महाराष्ट्र किती भिनला आहे, हे वेगळे सांगायला नको. ते राजधानीचे उंबरठे झिजवून थकत नाहीत. मागील सात वर्षांत ते साठ वेळा दिल्लीत आले आहेत. बेळगाव, बिदर, कारवार भागातील १० तालुके आणि ८६५ गावांच्या मराठी बांधवांचा हा मुद्दा कोणत्याही स्थितीत खाली ठेवणार नाही, हा इरादा असला तरी संभाजी पाटील एका गोष्टीने कमालीचे व्यथित होते. मराठी म्हणून आम्ही साठ वर्षे हा मुद्दा रेटून नेतो आहोत. आता आमची मुले कानडीतूनच बोलतात. त्यांना महाराष्ट्रातच परतायचे आहे, पण ही लढाई त्यांना जगू देत नाही. जगाच्या पाठीवरील कोणताही सीमाप्रश्न मनाची अंतरे तयार करतो, सोन्यासारख्या बेळगावचेही तेच झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक नवीन खासदारांना तर हा प्रश्न काय आहे, कोठून सुरू झाला याची अंधुकशीही माहिती नाही. तीन महिन्यांपूर्वी येल्लूर येथील कर्नाटकी पोलिसांच्या अत्याचारानंतर बेळगावातील मराठी मंडळी तेथील माजी महापौर व काही नगरसेवकांना घेऊन गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या भेटीला दिल्लीत आली, तेव्हा अनेक खासदारांनी त्यांना भेटण्याचे सौजन्यही दाखविले नाही. महाराष्ट्रात तरी काय वेगळे घडत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्याचारात जखमी झालेल्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा करून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना यादी करण्याच्या सूचना केल्या होत्या. पण आजपर्यंत ती यादी मंत्रालयातून खाली आली नाही, मग मदत दूरचीच गोष्ट ! या उलट कर्नाटक सरकारने पोलिसांना अभय दिले. आता नवा खेळ मांडला आहे. कमिशनरचा अहवाल न्यायालयात जाईल, तेथून तो बेळगाव कुणाला सोडायचे त्या निर्णयासाठी संसदेत जाईल.जावडेकरांचे ‘कोकमप्रेम’केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर नव्या बंगल्यात राहायला गेले. राजधानीतील त्यांच्या एक तपाच्या कारकीर्दीतील हा तिसरा ‘बंगला बदल’! त्यांच्या हाती पर्यावरण खाते आहे, हे सांगायची गरजच त्यांनी ठेवली नाही. बंगल्याच्या दारातील त्यांचे नावही हिरव्या रंगात कोरले आहे. नव्या घरातील प्रवेश आप्तमित्रांच्या भोजनाने पूर्ण झाला. देश विदेशातील जाणकार मंडळी, पत्रकार, मंत्री सारेच होते. पण प्रकाशजींचा सारा जोर होता, कोकम सरबतावर! ‘एक तरी भुरका मारा’, असा त्यांचा आग्रह होता. प्रकृतीसाठी ते किती उत्तम आहे, हे पटवून देत होते. राज्य व केंद्राच्या पर्यटन विभागाच्या सर्वच स्टॉल्सवर कोकम विक्री व पिण्यासाठी असेल, ही घोषणाच त्यांनी लगोलग करून टाकली. तर एका खासगी विमान कंपनीने जावडेकरांच्या कोकमप्रेमाची दखल घेत प्रवाशांना ‘कोकम’ देणे सुरूही केले. आता हाच कित्ता रेल्वेतही गिरवला जाईल. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू कोकणातीलच असल्याने त्यांनी रेल्वेला लगेचच अंमलबजावणी करा, असे बजावले. लालंूनी ‘कुल्हडमधील दूध’ प्रसिद्ध केले होते, आता कोकम ती जागा घेईल.- रघुनाथ पांडे