शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

कोर्टाचे टोचले कान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 06:22 IST

ही शेरेबाजी करणारे न्यायाधीश पूर्वी वकील असताना माध्यमांशी कसे आढ्यतेने व तुसडेपणाने वागायचे, हे आठवले तर आता न्यायाधीश झाल्यावर त्यांना फुटलेला कंठ विशेष लक्षणीय म्हणावा लागेल. जे निकालपत्रात लिहिता येईल, एवढेच बोलण्याचे बंधन न्यायाधीशांनी पाळायला हवे.

प्रसिद्धीची हाव ही अपप्रवृत्ती समाजात खूप बोकाळली आहे. या अपप्रवृत्तीने भल्याभल्यांच्या वागण्यात विवेक राहत नाही. माध्यमे समोर असली की, अनेकांच्या जिभेवर ताबा राहत नाही. काही न्यायाधीशांनाही याची लागण झाल्याचे दिसते. पूर्वी न्यायाधीश कोर्टात अपवादाने बोलायचे व बोललेच तर ते सुरू असलेल्या सुनावणीच्या अनुषंगाने असायचे. न्यायाधीशांनी फक्त निकालपत्रातून बोलावे, असे म्हटले जायचे व त्याचे पालनही व्हायचे. पण हल्ली काही न्यायाधीश वकिलांपेक्षा जास्त बोलतात. समोर असलेले प्रकरण आधीच प्रसिद्धीच्या झोतात असेल व माध्यम प्रतिनिधींची कोर्टात गर्दी झालेली असेल तर अशा न्यायाधीशांना किती बोलू आणि किती नको, असे होऊन जाते. बऱ्याचदा त्यांचे हे बोलणे दुसºया दिवशीचे मथळे डोळ्यापुढे ठेवूनच सुरू असते. अशा वाचाळ न्यायाधीशांना कोणीतरी त्यांची जागा दाखवून देण्याची व मर्यादांची जाणीव करून देण्याची गरज होतीच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना न्यायाधीशांचे कान टोचण्याचे हे काम केले, हे छान झाले. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर या दोन पुरोगामी विचारवंतांच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्यांचा निर्णायकपणे छडा लावू न शकणे ही गोष्ट राज्याला नक्कीच लांच्छनास्पद आहे. ही दोन्ही प्रकरणे उच्च न्यायालयापुढे आहेत. एकाचा तपास न्यायालयाने ‘सीबीआय’कडे सोपविला आहे. या दोन्ही तपासांवर न्यायालय देखरेख करत आहे. त्यामुळे ढिसाळ आणि असमाधानकारक तपासावरून न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त करणे आणि तपासी अधिकाऱ्यांना धारेवर धरणे यात काही गैर नाही. पण मध्यंतरी हे न्यायाधीश विनाकारण मुख्यमंत्र्यांवर घसरले. १३ खाती सांभाळणाºया मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालायला वेळ नाही, मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे असतात, वगैरे शेलके टोमणे त्यांनी मारले. माध्यमांनीही याची मसालेदार बातमी केली. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे आहे म्हणून पोलिसांच्या तपासात ते नाक खुपसू शकत नाहीत. त्यांनी तसे केले असते तर याच न्यायाधीशांनी त्यावरून मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढले असते. खासकरून या दोन्ही हत्या विचारसरणीच्या वैमनस्यातून झाल्या हे विचारात घेतले तर मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नसतात, या भाष्याला गडद राजकीय रंग येतो. न्यायासनावर बसून अशी राजकीय शेरेबाजी नक्कीच शोभनीय नाही. दुसरे असे की, जो पक्षकार वा आरोपी नाही त्याला अशा प्रकारे एकतर्फी दूषणे देणे गैर आहे, याचा विचारही न्यायालयाने केला नाही. खरे तर लगेच न्यायालयात जाऊन याचा सोक्षमोक्ष करायला हवा होता. पण ते शक्य नव्हते कारण कुठेही लेखी नोंद न करण्याची मखलाशी न्यायाधीशांनी केली होती. विधानसभेतील चर्चेत न्यायालयाच्या या शेºयांच्या हवाल्याने विरोधकांनी टीका केल्यावर मुख्यमंत्र्यांना त्याला उत्तर देणे भाग पडले. ते देताना फडणवीस यांनी जो अभ्यास केला तो न्यायाधीशांनी तोंड उघडण्याआधी करायला हवा होता. विधिमंडळात न्यायसंस्थेवर टीका-टिप्पणी करू नये, असे संकेत आहेत. पण हे संकेत दोन्ही बाजूंनी पाळायचे असतात. एका बाजूने ते वाºयावर सोडल्यावर दुसºयाने तरी का गप्प बसावे? एखादा मुरब्बी वकील मुद्देसूद युक्तिवाद करतो व त्यास समर्पक न्यायनिर्णयांचे पाठबळ देतो तसे मुख्यमंत्र्यांचे हे न्यायसंस्थेला सुनावलेले उत्तर सडेतोड होते, पण त्यात उर्मटपणा नव्हता. राज्यघटनेने शासनाच्या तिन्ही अंगांना मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यामुळे न्यायालयांनी या मर्यादेचे पालन करावे, सरकार कसे चालवावे याचे सल्ले देऊ नयेत, हे फडणवीस यांचे म्हणणे बिनतोड होते. न्यायाधीशांना याचा विसर पडतो तेव्हा असा उजळणी वर्ग घेणे भाग पडते. न्यायाधीशांनी तोंडी केलेली वक्तव्ये हे निकाल नसतात, हे खरेच. पण विरोधी पक्षात असताना न्यायालयाच्या अशाच वक्तव्यांच्या आणि त्यावरून आलेल्या बातम्यांच्या आधारे फडणवीस यांनी तेव्हाच्या सत्ताधाºयांना सळो की पळो करून सोडले होते, याचेही स्मरण त्यांना करून देण्याची गरज आहे.

टॅग्स :Courtन्यायालय