शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भ्रष्टाचार केवळ सत्ताप्राप्तीसाठीचे हत्यार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:29 IST

​​​​​​​भ्रष्टाचार निखंदून काढण्याच्या गरजेवर देशातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत आहे. भ्रष्टाचारात केवळ इतर पक्षच लिप्त असतात, यावरही त्यांचे एकमत असते!

- रवी टालेभ्रष्टाचार निखंदून काढण्याच्या गरजेवर देशातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत आहे. भ्रष्टाचारात केवळ इतर पक्षच लिप्त असतात, यावरही त्यांचे एकमत असते! सत्ता मिळाल्यास भ्रष्टाचाराचा समूळ नाश करू, असे तोंडभरून आश्वासनही प्रत्येकच पक्ष देत असतो, मात्र एकदा सत्ता मिळाली, की त्या आश्वासनांचा सोयीस्कर विसर पडतो.महाराष्ट्रात गत काही वर्षांपासून गाजत असलेला सिंचन घोटाळा हे राजकीय पक्षांच्या भ्रष्टाचारविषयक मानसिकतेचे मासलेवाईक उदाहरण म्हणता येईल. हा घोटाळा तब्बल ७० हजार कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येते. सध्याचे सत्ताधारी पक्ष विरोधात असताना त्यांनी या घोटाळ्यावरून प्रचंड रान उठविले होते; मात्र गत चार वर्षांपासून सत्तेत असूनही, घोटाळ्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा व्हावी, यासाठी त्यांनी कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत. घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) गठनासंदर्भातील सरकारच्या भूमिकेमुळे तर सरकारला दोषींना पाठीशी घालायचे आहे की काय, अशीच शंका यावी!जनमंच या संस्थेने सिंचन घोटाळाप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर सरकारने दोन एसआयटीचे गठन केले खरे; पण प्रत्यक्षात तो या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचाच प्रकार आहे. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) सुरू असलेल्या चौकशीमध्ये गुंतलेले अधिकारीच आता एसआयटीच्या नावाखाली चौकशी करतील!न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर, एसआयटीमध्ये समाविष्ट अधिकारी केवळ सिंचन घोटाळ्याचीच चौकशी करतील, अशी भूमिका सरकारने घेतली होती; मात्र प्रतिज्ञापत्रात तसा उल्लेखच नाही. त्यामुळे सरकारला केवळ धूळफेक करायची आहे की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे. तसाही या प्रकरणात आजवर जो तपास झाला, त्याची गती अत्यंत मंद आहे. आतापर्यंत केवळ काही कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच तपासाची आच पोहोचली आहे. बडे मासे मात्र मोकळेच आहेत. त्यामुळेच संतापून न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले होते; पण सरकार धडा घेण्यास तयार असल्याचे दिसत नाही.एसआयटीचे गठन करताना, सरकारने तपास पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित न केल्यानेही, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सरकारने एसआयटीचे गठन न केल्यास आम्ही ते करू, असा सज्जड इशारा न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिला होता. बहुधा ते टाळण्यासाठीच सरकारने घिसाडघाई करून एसआयटीचे गठन केले असावे.या घटनाक्रमामुळे राजकीय पक्षांच्या भ्रष्टाचारविषयक भूमिकांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकीय पक्षांना भ्रष्टाचाराची प्रकरणे केवळ सत्ताधाºयांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी हत्यार म्हणूनच हवी असतात, असे दिसते. एकदा सत्ता मिळाली, की मग ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या विरोधकांनाही संरक्षण दिले जाते. आलटून-पालटून सत्तेची ऊब मिळतच राहील, ही खात्रीच त्यासाठी कारणीभूत आहे.