शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

भ्रष्टाचार केवळ सत्ताप्राप्तीसाठीचे हत्यार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:29 IST

​​​​​​​भ्रष्टाचार निखंदून काढण्याच्या गरजेवर देशातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत आहे. भ्रष्टाचारात केवळ इतर पक्षच लिप्त असतात, यावरही त्यांचे एकमत असते!

- रवी टालेभ्रष्टाचार निखंदून काढण्याच्या गरजेवर देशातील सर्व राजकीय पक्षांचे एकमत आहे. भ्रष्टाचारात केवळ इतर पक्षच लिप्त असतात, यावरही त्यांचे एकमत असते! सत्ता मिळाल्यास भ्रष्टाचाराचा समूळ नाश करू, असे तोंडभरून आश्वासनही प्रत्येकच पक्ष देत असतो, मात्र एकदा सत्ता मिळाली, की त्या आश्वासनांचा सोयीस्कर विसर पडतो.महाराष्ट्रात गत काही वर्षांपासून गाजत असलेला सिंचन घोटाळा हे राजकीय पक्षांच्या भ्रष्टाचारविषयक मानसिकतेचे मासलेवाईक उदाहरण म्हणता येईल. हा घोटाळा तब्बल ७० हजार कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येते. सध्याचे सत्ताधारी पक्ष विरोधात असताना त्यांनी या घोटाळ्यावरून प्रचंड रान उठविले होते; मात्र गत चार वर्षांपासून सत्तेत असूनही, घोटाळ्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा व्हावी, यासाठी त्यांनी कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत. घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) गठनासंदर्भातील सरकारच्या भूमिकेमुळे तर सरकारला दोषींना पाठीशी घालायचे आहे की काय, अशीच शंका यावी!जनमंच या संस्थेने सिंचन घोटाळाप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर सरकारने दोन एसआयटीचे गठन केले खरे; पण प्रत्यक्षात तो या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचाच प्रकार आहे. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) सुरू असलेल्या चौकशीमध्ये गुंतलेले अधिकारीच आता एसआयटीच्या नावाखाली चौकशी करतील!न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर, एसआयटीमध्ये समाविष्ट अधिकारी केवळ सिंचन घोटाळ्याचीच चौकशी करतील, अशी भूमिका सरकारने घेतली होती; मात्र प्रतिज्ञापत्रात तसा उल्लेखच नाही. त्यामुळे सरकारला केवळ धूळफेक करायची आहे की काय, अशी शंका घेण्यास वाव आहे. तसाही या प्रकरणात आजवर जो तपास झाला, त्याची गती अत्यंत मंद आहे. आतापर्यंत केवळ काही कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच तपासाची आच पोहोचली आहे. बडे मासे मात्र मोकळेच आहेत. त्यामुळेच संतापून न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले होते; पण सरकार धडा घेण्यास तयार असल्याचे दिसत नाही.एसआयटीचे गठन करताना, सरकारने तपास पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित न केल्यानेही, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सरकारने एसआयटीचे गठन न केल्यास आम्ही ते करू, असा सज्जड इशारा न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिला होता. बहुधा ते टाळण्यासाठीच सरकारने घिसाडघाई करून एसआयटीचे गठन केले असावे.या घटनाक्रमामुळे राजकीय पक्षांच्या भ्रष्टाचारविषयक भूमिकांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकीय पक्षांना भ्रष्टाचाराची प्रकरणे केवळ सत्ताधाºयांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी हत्यार म्हणूनच हवी असतात, असे दिसते. एकदा सत्ता मिळाली, की मग ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या विरोधकांनाही संरक्षण दिले जाते. आलटून-पालटून सत्तेची ऊब मिळतच राहील, ही खात्रीच त्यासाठी कारणीभूत आहे.