शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

Coronavirus: आपण सारेच जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 06:00 IST

हरिद्वार येथे कुंभमेळा होणार असताना उत्तराखंड उच्च न्यायालयाने, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बनविण्यात आलेली नियमावली पाळली जावी, असे निर्देश उत्तराखंड राज्य सरकारला दिले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जंगी रॅली काढण्यात आल्या, त्यावेळी तुम्ही परग्रहावर गेला होता का, असा थेट सवाल मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारला आहे. हाच सवाल आपण सर्व भारतीय नागरिकांनी स्वत:ला विचारला, तर लागू पडेल की नाही, किंबहुना त्याचे उत्तर प्रत्येकाने देण्याची नैतिक जबाबदारी येईल की नाही, मद्रास उच्च न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उपस्थित केलेले मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे कोराेना संसर्गाच्या लाटेनंतर जवळपास सहा उच्च न्यायालयांनी तसेच सर्वोच्च न्यायालयानेही सवाल उपस्थित केले आहेत.

हरिद्वार येथे कुंभमेळा होणार असताना उत्तराखंड उच्च न्यायालयाने, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बनविण्यात आलेली नियमावली पाळली जावी, असे निर्देश उत्तराखंड राज्य सरकारला दिले, त्यांनीही मान डोलावली. मुख्य सचिव आणि उत्तराखंडच्या पोलीस महासंचालकांना एवढी बुद्धी नसेल का? कुंभमेळ्यात किती साधू-संत येतात, भाविक येतात, तो कार्यक्रम कसा पार पडतो याची कल्पना नसेल, ही कल्पना असूनही नियमावलीचे पालन करू, असे खोटे प्रतिपादन उच्च न्यायालयात कसे करण्यात आले. त्यावर न्यायालयानेही विश्वास कसा ठेवला? शेवटी काय घडले, हे जगाने पाहिले आणि जगभरातून टीका होऊ लागताच, आमचे देशप्रेम जागे झाले. आमच्या अंतर्गत बाबीत लक्ष घालायचे नाही, असे  आपण बजावले. ते ठीक आहे; पण कोरोनाची दुसरी लाट ज्या वेगाने पसरते आहे, तेव्हा आपण विधानसभांच्या निवडणुकांसाठी हजारो लोकांचा जमाव जमवितो. त्याचवेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करतो. तेथे गर्दी दिसते.

बंगालमधील रोड शोमध्ये देशाचे गृहमंत्री सहभागी होतात किंवा मुख्यमंत्री भाग घेतात, त्यांना कोरोनाची नियमावली आठवत नसावी? केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेकवेळा एखाद्या विभागातील किंवा प्रदेशातील परिस्थिती सामान्य नसेल, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, तर निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मुदतीप्रमाणे संपूर्ण देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. पण, आसामधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होता, म्हणून त्या प्रदेशातील निवडणुका, उर्वरित देशातील निवडणुका पूूर्ण होऊन निकाल जाहीर झाल्यावर घेण्यात आल्या.

कोरोना संसर्गाने शाळा, महाविद्यालये बंद, मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद, अशा अवस्थेत पाच राज्यांत निवडणुका घेतल्या, तर कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी बनविलेल्या आचारसंहितेचे काय होणार याची कल्पना करावी, असे निवडणूक आयोगाला का वाटले नाही? त्या जाहीर होताच न्यायालयात आव्हान द्यायला हवे होते, पण सरकारने खोटी आश्वासने दिली आणि न्यायालयाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्या कुंभमेळ्याने संसर्ग पसरला. त्याला आता जबाबदार कोण? निवडणूक आयोगाच्या निर्णयांना आव्हान देण्याचा प्रश्नच येत नाही. ती स्वायत्त संस्था आहे. त्यांना प्रचंड अधिकार आहेत.

एकदा राज्यात निवडणूक घेण्यास असमर्थ आहोत, असा अभिप्राय दिला, तर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट सहा-सहा महिन्यांसाठी किमान दोन वेळा लावण्याची तरतूद आहे किंवा विद्यमान राज्य सरकारला मुदतवाढ देण्याची तरतूद करून केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठामपणे सांगणे आवश्यक आहे. जर संपूर्ण वर्षभर शैक्षणिक वर्ष आपण चालवू शकलो नाही, तर निवडणूक, कुंभमेळा आदी प्रकारही रोखता आले असते. त्याच्यावाचून काही अडणार नव्हते. मानवाचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. शिवाय केंद्र सरकारने कोरोना रोखण्यासाठीचे निर्णय पटापट घेण्याची गरज होती. केवळ ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही म्हणून माणसं देशाच्या राजधानीत पटापट मरण पावली.

रेमडेसिविर औषधे मिळत नाहीत, लसीकरणासाठी लसीचा आवश्यक पुरवठा होत नाही, अनेक शहरांत रुग्णांसाठी बेड मिळत नाहीत, एकाच टेम्पोमध्ये बावीस मृतदेह कोंबून जाळण्यासाठी घेऊन जाणारे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर या देशातील स्थितीला नरकाची उपमा कोणी दिली, तर राग का यावा? हा देश आपण साऱ्यांनी मिळून आहे, तर याला  आपण सारे जबाबदार नाही का? यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने, तुम्ही परग्रहावर होता का, हा उपस्थित केलेला सवाल लाखमोलाचा आहे.  आणि ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त झालेत, ते अधिक जबाबदार नाहीत का? 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार