शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

Coronavirus: ओमायक्रॉनचे काय करावे? कोरोनाच्या संसर्गामुळे जग पुन्हा चिंतेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 13:23 IST

Coronavirus: आधीच्या व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉनचा प्रसार किती तरी पट वेगाने होत असल्याने सगळ्याच देशांनी सावधगिरी बाळगण्याचा सूचनावजा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या नव्या अवताराने बाधित रुग्ण दक्षिण आफ्रिकेबाहेर इंग्लंड, इस्रायल, जर्मनीसोबतच  हाँगकाँगमध्ये सापडले आहेत.

यापुढे विषाणूसाेबतच जगण्याची सवय करून घ्यावी लागेल, हे वाक्य पुन्हा उच्चारण्याची वेळ आली आहे. कारण कोविड-१९ या विषाणूचे अनेक अवतार एका मागोमाग येत राहतील, असे अंदाज सुरुवातीपासून दिले जात आहेत.  कोविडच्या डेल्टा व्हेरिएंटने भारतासह अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातला. आताही युरोपमधील अनेक देशांमध्ये किंवा रशियात महामारीच्या लाटेचा कहर सुरूच असताना दक्षिण आफ्रिकेतून बाहेर पडलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभर भीतीचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रात १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथी-सातवीपर्यंतच्या शाळा किंवा देशात सुरू होणारी आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची उड्डाणे या सगळ्यांचा फेरविचार सुरू झाला आहे. काल-परवापर्यंत महाराष्ट्रात चर्चेत असलेले आर्यन खान, एनसीबी, नवाब मलिक, परमबीर सिंह वगैरे विषय ओमायक्रॉनच्या बातमीनंतर मागे पडले आहेत. आधीच्या व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉनचा प्रसार किती तरी पट वेगाने होत असल्याने सगळ्याच देशांनी सावधगिरी बाळगण्याचा सूचनावजा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या नव्या अवताराने बाधित रुग्ण दक्षिण आफ्रिकेबाहेर इंग्लंड, इस्रायल, जर्मनीसोबतच  हाँगकाँगमध्ये सापडले आहेत. अर्थात, विषाणूचा हा नवा अवतार नेमका किती घातक असेल, त्याचा प्रसार कसा होईल किंवा लसीकरणाचे कवच भेदून तो प्राणघातक ठरेल का, या प्रश्नांची उत्तरे देणारी पुरेशी आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेसह कोणाकडेच नाही. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेले दोघे जण बंगळुरूमध्ये डेल्टा विषाणूने बाधित आढळले, तर महाराष्ट्रात ठाणे परिसरातही तिकडूनच परत आलेल्यांचा शोध सुरू आहे. थोडक्यात, ओमायक्रॉनचे कुणी बाधित अद्याप भारतात आढळलेले नाहीत. तेव्हा लोकांनी विनाकारण घाबरून जाण्याची गरज नाही. दुसरी दिलासादायक बाब म्हणजे, केंद्र सरकारकडून कोरोना महामारीच्या सुरुवातीला दिसलेला गोंधळ आता दिसत नाही. ओमायक्रॉनची बातमी येताच स्वत: पंतप्रधानांनी दिल्लीत तज्ज्ञांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला, तर गृहसचिवांनी काल रविवार असूनही एक बैठक घेतली व राज्य सरकारांनी राबवावयाच्या उपायांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा केली. केंद्र सरकारने इतक्या तातडीने पावले उचलण्यामागे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी देशाच्या वाट्याला आलेली नामुष्की आहे. बहुतेक सगळ्या मोठ्या राज्यांमध्ये रोज हजारोंच्या संख्येने बाधित रुग्ण निष्पन्न होत असताना ऑक्सिजनचा तुटवडा होता, इस्पितळांमध्ये पुरेसे बेडस् नव्हते, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा निर्माण झाला होता. मृत्यूनंतरही अनेकांच्या वाट्याला नरकयातना आल्या.  मोठ्या शहरांमधील स्मशानभूमीत एका वेळी अनेकांचे दहन झाल्याची किंवा गंगा नदीत वाहून जाणाऱ्या हजारो प्रेतांची छायाचित्रे मन विषण्ण करणारी होती. केंद्र व राज्य सरकारांनी त्यावर कितीही पांघरूण घालण्याचा  प्रयत्न केला तरी ही यंत्रणेची दशा जगभर पोहोचलीच. लसीकरणाचा वेग हा अजूनही देशात चिंतेचा विषय आहे. सगळ्याच गोष्टींचा उत्सव साजरा करण्याची सवय आपल्याला लागली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे शंभर कोटी दिल्याचाही आपण उत्सव केला. आता हा प्रवास एकशे वीस कोटी डोसच्या घरात गेलेला आहे. प्रत्यक्षात दोन्ही डोस घेतलेल्यांचे भारतीयांचे प्रमाण जगात खूप खालच्या स्थानावर स्थितीत आहे. जगातील इतर देश  अगदी ऐंशी टक्के जनतेला दोन्ही डाेस देत असताना भारतात मात्र हे प्रमाण अवघे ३२ टक्के आहे.  या जागतिक महामारीचा सामना करताना देश अनेक आघाड्यांवर चाचपडताना दिसला. ते साहजिकही आहे. अशा संकटांचा अलीकडच्या काळात मोठा अनुभव यंत्रणांना नाही. तरीदेखील किमान इतिहासातील अशा महामारीचा अनुभव लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, लस वितरणाची योग्य व्यवस्था याबाबतीत बरेच काही करता आले असते. असो. आता तरी या नव्या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट देशात येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. महामारीच्या सुरुवातीला ज्या प्रकारे आपले विमानतळ सताड उघडे होते, तसे होऊ नये. परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची विमानतळावरच तपासणी, संशयास्पद रुग्णांचे विलगीकरण, त्यांच्यावर उपचार या मार्गानेच जावे लागेल. मग पुढे ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट याचा अर्थ संपर्कातील व्यक्तींचा शोध, चाचणी व उपचार हेच या नव्या भीतीमधून लोकांना बाहेर काढण्याचा उपाय आहेत. सोबतच तातडीने लसीचे दोन्ही डोस, दुहेरी मास्क, सॅनिटायझर ही दक्षता लोकांनी घेतली तर ओमायक्रॉनचा धोका नक्की टळेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत