शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: निर्बंधात शिथिलता, पण निग्रह कायम हवा...

By किरण अग्रवाल | Updated: June 3, 2021 08:19 IST

Coronavirus in Maharashtra: कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरेच, पण म्हणून अनिर्बंधपणे वागले व वावरले जाणार असेल तर तिसऱ्या लाटेला थोपवता येणे मुश्किलच ठरावे.

- किरण अग्रवाल

कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधात काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली, याचा अर्थ संकट टळले आहे असे अजिबात नाही. संकटाची तलवार आपल्या शिरी लटकलेली आहेच, त्यामुळे निर्बंध शिथिल केले गेले असले तरी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये (Lockdown) १५ जूनपर्यंत वाढ केलेली आहे हे विसरता येऊ नये; परंतु दुर्दैवाने कोरोना जणू संपला अशा अविर्भावात खबरदारीकडे दुर्लक्ष होताना दिसत असेल तर अवघड आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरेच, पण म्हणून अनिर्बंधपणे वागले व वावरले जाणार असेल तर तिसऱ्या लाटेला थोपवता येणे मुश्किलच ठरावे. (Coronavirus in Maharashtra)

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात १ जूनपर्यंत घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन यापुढे १५ जूनपर्यंत वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, पण तसे करताना ज्या जिल्ह्यांमधील कोरोनाच्या पॉझिटिव्हिटीचा रेट दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे, या जिल्ह्यातील आवश्यक वस्तू व सेवांची एकल दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगीही देण्यात आली आहे; म्हणजेच अशा जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिकसह जळगाव, गोंदिया, नांदेड, धुळे, जालना, यवतमाळ, सोलापूर, बुलडाणा आदी जिल्ह्यांचा यात समावेश आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे या जिल्ह्यातील बाजारांमध्ये चैतन्य दिसून आले. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे, तिला या शिथिलतेमुळे काहीशी चालना मिळेल हे खरे, परंतु ज्या अनिर्बंधपणे पूर्ववत सारे सुरू झालेले दिसत आहे ते पुन्हा धोक्याला निमंत्रणच देणारे ठरण्याची भीती आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी त्यात काही नियम आहेत, त्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे पाहावयास मिळते. फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचे कसलेही भान न बाळगता लोकांनी बाजारांमध्ये गर्दी करीत आहेत, ही गर्दी संसर्गाला कारणीभूत ठरू शकणारी असून ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांच्या आत असला तरी काठावर म्हणजे ९ च्या जवळपास आहे, तो यामुळे वाढावयास वेळ लागणार नाही. तसे झाले तर पुन्हा या जिल्ह्यांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते, तेव्हा नियम पाळण्याबाबत काळजी घेण्याचा निग्रह गरजेचा आहे.

महत्त्वाचे म्हणजे, तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक सांगितला जातो आहे, अर्थात, याबद्दलही जाणकार किंवा तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत हा भाग वेगळा; परंतु अहमदनगरसारख्या जिल्ह्यात गेल्या मे महिन्यात सुमारे दहा हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलीत, जो आकडा एप्रिल महिन्यापेक्षा अधिक असल्याचे पाहता मुलांना असलेल्या धोक्याची खात्री पटावी. राज्याच्या अन्य भागातही लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण काहीसे वाढताना दिसत आहे, पण असे असताना त्यांच्याबाबत जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जाताना दिसत नाही. आता काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर कुटुंबेच्या कुटुंबे बाजारासाठी बाहेर पडत आहेत. त्यात गरज नसताना लहान मुलांना सोबत घेतले जात आहे. यातही अनेक ठिकाणी ही लहान मुले मास्कविना बाजारात व गर्दीत फिरत असल्याचे आढळून येते. दुसरे म्हणजे कुटुंब घरात टीव्हीसमोर बसून असताना घरातील लहान मुले मात्र गल्लीत एकत्र येऊन पूर्वीप्रमाणे गप्पागोष्टीत किंवा खेळण्यात रमलेली दिसून येतात, ही बाब संसर्गाला निमंत्रण देणारीच ठरावी. याबाबत पालकांनीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पहिल्यापेक्षा अधिक फटका दिला आहे. अर्थकारण तर ढासळले आहेच, परंतु जवळपास प्रत्येक कुटुंबालाच कुण्या न कुण्या प्रिय व्यक्तीला गमावल्याच्या दुःखाला सामोरे जावे लागले आहे. या दुःखासह व प्रचंड भीतीच्या वातावरणात यापुढची वाटचाल करायची आहे, कोलमडून पडलेले सारे काही सावरायचे आहे. त्यासाठी बेफिकीर राहून चालणार नाही. अधिक नुकसान होऊ नये व सामान्यांची अडचण टाळण्यासाठी शासनाने काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता आणली असली तरी, मी जबाबदार बनूनच वागायला अगर वावरायला हवे. कामाखेरीज बाहेर पडायला नको किंवा किरकोळ कामासाठी संपूर्ण कुटुंबाने बाजारात जाण्याची गरज नाही; बाहेर जावे लागले तरी मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्स राखणे... या खरे तर अतिशय साध्या गोष्टी, त्या समोरच्याकडून पाळल्या जाणार नसतील तर आपण त्याला आठवण व जाणीव करून द्यायला हवी; कारण हे संकट एकट्या-दुकट्यावरचे नाही तर सर्वांवरचे आहे. त्यामुळे ते परतवून लावण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम व निर्देश पाळण्याचा आग्रह धरूया. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक