शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

Coronavirus: तणावातून मुक्ती हवीच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 1:37 AM

माणूस मग तो गरीब असो वा श्रीमंत, त्याला करमणूक लागतेच. ती करमणूक तो चित्रपटांमधून मिळवतो, टीव्हीवरील मालिका आणि अन्य कार्यक्रमांमधून मिळवतो.

कोरोनाच्या संसगार्मुळे जगातील गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, आबालवृद्ध असा प्रत्येक जण सध्या अतिशय चिंतेत आहे. घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. घरात बसून काय करावे हे सुचेनासे झाले आहे. दिवसाचे दहा-बारा तास कसे घालवायचे हा मोठा प्रश्न आहे.

रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले लाखो लोक आपण कधी आणि कसे घरी पोहोचणार या विवंचनेत आहेत. घरातील मंडळी त्यांची वाट पाहत आहेत. वृत्तपत्रेही काही दिवस बंद होती. त्यामुळे सोशल मीडियावरून पसरणाऱ्या बातम्या खºया की खोट्या हेही कळत नव्हते. आता काही ठिकाणी वृत्तपत्रे मिळू लागली आहेत, बातम्या नीट कळू लागल्या आहेत. वृत्तपत्र वाचनात किमान थोडाफार वेळ तरी जाऊ लागला आहे. अनेकांच्या दृष्टीने हा विरंगुळाच आहे.

माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा याखेरीज आयुष्यात करमणूकही लागते. शिवाय माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे, असे अरिस्टॉटलने म्हटले आहे ते किती योग्य आहे हे आता सर्वांनाच जाणवू लागले आहे. त्याला सतत एकमेकांना भेटावेसे वाटते, गप्पा माराव्याशा वाटतात आणि मनोरंजनाशिवाय त्याचे आयुष्य शुष्क होते. मानसोपचार तज्ज्ञ सामान्यांच्या या स्थितीबद्दल चिंतीत आहेत. अशा एकाकी अवस्थेमुळे वा सतत तणाव व अस्वस्थ राहण्याने मानसिक आणि शारीरिक आजारांची शक्यता असते. या आजारांपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी व्यायाम हा एक उपाय आहे. घरात बसून आणि काही काम न केल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायाम हवाच; पण पुरेसा नाही.

माणूस मग तो गरीब असो वा श्रीमंत, त्याला करमणूक लागतेच. ती करमणूक तो चित्रपटांमधून मिळवतो, टीव्हीवरील मालिका आणि अन्य कार्यक्रमांमधून मिळवतो. त्याला क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, कबड्डी अशा खेळांमधूनही त्याचे मनोरंजन होते. अनेकांसाठी चार वर्षांनी येणारे आॅलिम्पिक ही मोठीच पर्वणी असते. नोकरदार वा व्यापार, उद्योगांमध्ये असणारे किंवा मोलमजुरी करणारे यांचा वेळ रोज कामात जातो. सुट्टीच्या दिवशी टीव्हीवरील कार्यक्रम, चित्रपट, खेळांचे सामने असे वेगळे काही त्याला हवेच असते. भारतातील लाखो वा काही कोटी लोक गेले दहा-पंधरा दिवस घरी आहेत. एवढी मोठी सुट्टी असूनही कुटुंबीयांसमवेत त्यांना बाहेरगावी फिरायला जाणे तर सोडाच, पण चित्रपट पाहायला जाणेही शक्य नाही. एकही नवा चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला नाही, चित्रपटांचे चित्रीकरण बंद आहे. तीच स्थिती टीव्ही मालिकांची. त्यामुळे जुन्याच रटाळ मालिका पुन्हा पुन्हा दाखविल्या जात आहेत. अशा काळात जुन्या विनोदी आणि लोकांचा तणाव दूर करतील अशा मालिका वा चित्रपट दाखवल्यास तणाव काहीसा कमी होईल.

केंद्र सरकारने रामायण, महाभारत आणि चाणक्य या एकेकाळी गाजलेल्या मालिका पुन्हा दाखवा, असे दूरदर्शनला सांगितले; पण नव्या पिढीला त्या आवडतील का, हा विचार केल्याचे दिसत नाही. कोरोना संसर्गाच्या शक्यतेने आयपीएल सामने पुढे ढकलले आहेत, आॅलिम्पिकही आता होणार नाही आणि विम्बल्डनही पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे टीव्हीवर क्रीडाविषयी शुकशुकाटच आहे. परीक्षा पूर्ण न होताच शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. आठवीपर्यंतची मुले पुढील वर्गात आपोआप जातील; पण या सुट्टीत काय करायचे हा त्यांच्या आणि पालकांपुढील प्रश्न आहे. खेळायला बाहेर जाता येत नाही. त्यामुळे अनेक मुलांना मोबाईल गेमची सवय वा व्यसन लागायची भीती आहे. ते होता कामा नये. अन्यथा कोरोनातून बाहेर पडल्यानंतर मुलांची ही सवय त्रासदायक ठरेल. त्यामुळे लहान मुलांसाठी मोगली वा तशा मालिका दाखवायला हव्यात. ये जो है जिंदगी, हम पांच, आदी मालिकाही लोक आनंदाने पाहतील; पण तसे घडताना दिसत नाही.

मुळात कोट्यवधी लोकांना घरांत बसणे भाग असताना त्यांचा तणावाविना वेळ कसा जाईल हे पाहणेही प्रशासनाची जबाबदारी आहे. तसे न झाल्यास तणाव आणि घरांत वाद वाढू शकतात, याचाही विचार व्हावा. चीनमध्ये तसे घडले आहे. भारतात ते घडणार नाही; पण सरकारी पातळीवरही याचा विचार व्हायला हवा. कोरोनाचा संसर्ग काही काळाने थांबेलच. त्यावेळी अनेक नव्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यात आर्थिक व रोजगाराचे प्रश्न असतीलच; पण सर्व भारतीयांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठणठणीत असणे गरजेचे असेल. मानसोपचार तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे अगदी किरकोळ वाटणाºया या बाबींचाही विचार प्रत्येकाने करायला हवा.

कोरोनाचा संसर्ग काही काळाने थांबेलच. त्यावेळी अनेक नव्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यात आर्थिक व रोजगाराचे प्रश्न असतीलच; पण सर्व भारतीयांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठणठणीत असणे गरजेचे असेल याचाही विचार करायला हवा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस