शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : खरा धोका पुढेच!

By रवी टाले | Updated: March 21, 2020 16:13 IST

कम्युनिटी ट्रान्समिशनच्या पातळीवर पोहचल्यास, परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या रुग्णांमध्ये घातांकी वाढ (एक्पोनेन्शिअल ग्रोथ) होत आहे. छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील नागरिक कोरोनासंदर्भात पुरेसे गंभीर दिसत नाहीत.आपल्या देशात रुग्णालयांमधील खाटांची संख्या आवश्यकतेच्या तुलनेत खूपच कमी आहे.

संपूर्ण जगाला घाबरवून सोडलेल्या कोरोना या विषाणूवरील विनोद, व्यंगचित्रे, मीम समामजमाध्यमांवरून पुढे ढकलण्यात बहुतांश भारतीय मग्न असतानाच, महाराष्ट्र सरकारने मुंबई, पुणे, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड ही चार शहरे ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. याचा अर्थ या शहरांमध्ये आता जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प होतील.कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याच्या प्रादुर्भावामुळे होत असलेल्या आजारावर अद्यापही औषध अथवा लस शोधण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखणे हाच सध्याच्या घडीला त्यावरील उपाय आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत; परंतु दुर्दैवाने चीन व इटलीमधील परिस्थिती समोर दिसत असतानाही, बहुतांश नागरिक पुरेसे गंभीर नाहीत. विलगीकरण (क्वारंटीन), एकमेकांपासून अंतर राखणे (सोशल डिस्टन्सिंग), सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे याकडे दुर्लक्ष करण्याकडेच बहुतांश नागरिकांचा कल आहे.भारतात कोरोनाचे सर्वाधिक बाधित व संशयित रुग्ण महाराष्ट्रातच असून, हा आकडा दिवसागणिक वाढतच जात आहे. जगभरातील अनुभव लक्षात घेता कोरोनाच्या रुग्णांमध्ये घातांकी वाढ (एक्पोनेन्शिअल ग्रोथ) होत आहे. घातांकी वाढ याचा अर्थ एकास बाधा झाल्यास त्यापासून आणखी तिघांना संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. तसे झाल्यास परिस्थिती फार गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.सध्याच्या घडीला राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर ही महानगरे आणि यवतमाळ व अहमदनगरसारखी छोटी शहरे यापुरताच मर्यादित आहे. बहुधा त्यामुळेच इतर छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील नागरिक कोरोनासंदर्भात पुरेसे गंभीर दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर, परिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केल्यास, राज्याच्या छोट्या शहरांमधील आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा स्थिती सांभाळण्यासाठी सक्षम आहे का, याचा विचार होणे गरजेचे आहे.वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्याच्या ग्रामीण भागात होण्याची शक्यता कमी आहे; मात्र ती मोडीतही काढता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनाशी लढा देण्याचा सर्वोत्तम उपाय आहे; मात्र आपल्या देशात अनेकांचे हातावर पोट आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेता आपण प्रत्येकाकडून घरात बसून राहण्याची अपेक्षा करू शकत नाही. मजुरी करून स्वत:चे व कुटुंबाचे पोट भरणाऱ्यांना घराबाहेर पडावेच लागणार आहे आणि त्यामुळे त्यांचा इतर लोकांशी संपर्क होणारच आहे!मार्च महिना संपल्यावर शेतीची बहुतांश कामे संपलेली असतात आणि त्यामुळे दुष्काळी भागातील अनेक मजूर रोजगाराच्या शोधार्थ मोठ्या शहरांची वाट धरतात. या लोकांना केवळ आवाहन करून घरी बसविणे शक्य नाही. सरकारने त्यांच्या उत्पन्नाएवढी रक्कम उपलब्ध करून देणे हा एक मार्ग असू शकतो; मात्र त्यासाठी सरकारी खजिन्यात तर पैसा असायला हवा ना?सरकारने येनकेनप्रकारेन ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यात यश मिळवले तरी, रोजगार अथवा शिक्षणासाठी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या जे युवक ‘लॉकडाऊन’मुळे गावाकडे परतणार आहेत, त्यांना कसे थांबवणार? या उलट्या स्थलांतरामुळेही विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहेच ना?आपल्या देशात रुग्णालयांमधील खाटांची संख्या आवश्यकतेच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यातच कोरोनासारख्या महामारीने उग्र रूप धारण केल्यास खाटांचा प्रचंड तुटवडा जाणवणार आहे. सरकारने आपत्कालीन स्थितीत खासगी रुग्णालयांमधील खाटा ताब्यात घेतो म्हटले तरी परिस्थिती आटोक्यात येऊ शकणार नाही. पुन्हा माहिती आणि ज्ञानाच्या अभावी नागरिकच विरोधासाठी पुढे येतात, हा ताजा अनुभव आहे. अनेक शहरांमध्ये विलगीकरण कक्षासाठी जागांचा शोध सुरू झाला तेव्हा त्या भागांमधील नागरिकांनी त्यांच्या वस्तीत कक्ष नको म्हणून विरोध केला, ही वस्तुस्थिती आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाच, तर राज्यातील परीक्षण प्रयोगशाळांची अल्प संख्या हा आणखी एक मोठा अडथळा सिद्ध होणार आहे. राज्य सरकारने आणखी काही प्रयोगशाळा सुरू करण्याचा आदेश दिला आहे; मात्र बाधितांच्या संख्येत घातांकी वाढ झाल्यास नव्याने सुरू होऊ घातलेल्या प्रयोगशाळाही कमीच पडणार आहेत. प्रत्येक संशयिताच्या नमुन्यांचे परीक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना परीक्षणांच्या संदर्भात दक्षिण कोरियाचा दर खूप जास्त असल्यामुळे त्या देशात कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण खूप कमी आहे, तर इटलीमध्ये दक्षिण कोरियाच्या तुलनेत खूप कमी परीक्षणे झाल्याने त्या देशातील मृत्यू दर खूप जास्त आहे. परीक्षणांच्या बाबतीत भारत तर इटलीच्या तुलनेतही कुठेच नाही. त्यामुळे भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव समुदाय प्रसार म्हणजेच कम्युनिटी ट्रान्समिशनच्या पातळीवर पोहचल्यास, परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाने हा धोका ओळखून तातडीने उपाययोजना आखण्याची नितांत आवश्यकता आहे.- रवी टाले        ravi.tale@lokmat.com   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस