शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: नव्या परिस्थितीजन्य संस्कृतीची नितांत गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 05:16 IST

वसुंधरा दिनी प्रतिज्ञा करावी की, ‘जगडव्याळ विचार, स्थानिक कृती व जो बदल वांच्छित आहे तो स्वत: बनणे.’ वसुंधरेचे रक्षण हा २१व्या शतकाचा युगधर्म आहे.

- प्रा. एच. एम. देसरडा, प्रख्यात अर्थतज्ज्ञ; माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ१९७० पासून २२ एप्रिल हा दिवस जगभर पृथ्वी दिवस (अर्थ डे) म्हणून साजरा केला जातो. यंदा त्याला ५० वर्षे पूर्ण होत असून, यावेळचा विषय ‘हवामान कृती’ (क्लायमेट अ‍ॅक्शन) हा आहे. अर्थात त्याचे मूळ प्रयोजन, मर्म व महत्त्व लक्षात न घेता सोपस्कार नि समारंभ चालत राहतात. यंदाचा अर्थ-डे ‘कोरोना’च्या भीषण धास्तीमुळे अंतर्मुख करणारा आहे, असावयास हवा. महामारीच्या लागण व मृत्यू तांडवापायी सव्वा लाख मानवांचा हकनाक बळी गेला. अवघे जग भांबावले. कोट्यवधी लोकांचे जीवन व जीविका धोक्यात आली. जगभर श्रमजीवींचे, स्थलांतरितांचे हाल होत आहेत.

उत्क्रांती तसेच सामाजिक स्थित्यंतराच्या कालौघात मानवाने असंख्य आपत्तींचा सामना केला. उत्पात, संसर्गजन्य विषाणू, साथीचे रोग याखेरीज संसाधने व भूभाग काबीज करण्यासाठी तसेच जात-वर्ग-वर्ण वर्चस्ववादी युद्धांमुळे कोट्यवधींची हत्या, वंशसंहार घडले, विसावे शतक मानव समाजाच्या इतिहासात महाहिंसेचे शतक म्हणून नोंदले गेले. वसाहतवाद व संसाधनाच्या दोहनमुळे ४६० कोटी वर्षे आयुर्मानाच्या पृथ्वीला औद्योगिक क्रांतीनंतरच्या दोन-अडीचशे वर्षांत तापमानवाढीच्या संकटात लोटले. याला मुख्यत: कारणीभूत जीवाश्म इंधन (कोळसा, तेल, वायू) वापरामुळे होणारे कर्ब व अन्य विषारी वायूंच्या उत्सर्जनात झालेली अफाट वाढ हे लक्षणीय प्रमाणात हवामानबदल घडवू लागले. ही जगासमोरील अव्वल समस्या आहे.
सोबतच निसर्गचक्र व त्याची एकात्मता समजून न घेता कीड व विषाणूंवर वर्चस्वासाठी डीडीटीसारखी घातक रसायने शोधून त्याचा अनाठायी वापर सुरू केला. रॅचेल कार्सन या जीवशास्त्रज्ञ बाईंनी ‘सायलंटस्प्रिंग’ या पुस्तकात त्याचा पर्दाफाश केला. आधुनिक पर्यावरणीय चळवळीच्या त्या उद्गात्या मानल्या जातात. २०१२ मध्ये ब्राझीलमधील ‘रिओ+२०’ परिषदेतील सहभागानंतर जेव्हा मी हार्वर्ड विद्यापीठात काही भित्तीचित्रं पाहात होतो तेव्हा कार्सन यांचे लक्षवेधी, मर्मभेदी चित्र व खाली त्यांनी मानवजातीला दिलेली चेतावणी वाचावयास मिळाली. ती अशी : ‘इंडिकेशन ऑयु द हार्म अँड नाट द प्रुफ ऑफ हार्म इज युअर कॉल फॉर अ‍ॅक्शन.’ सांप्रतच्या कोरोनाग्रस्त काळात याची प्रकर्षाणं आठवण होते. भल्या माणसा, आता काय पुरावा हवा आहे? निसर्गात जो अविवेकी हस्तक्षेप केला, त्यामुळे कडेलोट होत असून, जैवविविधतेचा लोप, ऱ्हास; पशुपक्षी, वन्यप्राण्यांचे अधिवास संपुष्टात येणे, याचा परिपाक म्हणजे नवे संसर्ग विषाणू फोफावण्याचे प्रकार घडत आहे.
लॉकडाऊननंतर जगातील शहरं कमी प्रदूषित, शांत, सुसह्य होत असल्याच्या बातम्या म्हणजे निरर्थक वृद्धीची पागलदौड बंद करण्याची कोरोना ही संधी होय. खरं तर गांधीजींनी सेवाग्राम आश्रमात लावलेला ‘पागलदौड’ फलक म्हणजे निसर्गाची ऐशीतैशी करणाऱ्यांना दिलेला परखड इशारा आहे! तात्पर्य, निसर्ग, मानव व समाजाच्या जैव एकात्मतेचे जे नाते, जो जीवन समुच्चय (वेब ऑफ लाईफ) बुद्धापासून गांधींपर्यंतचे तत्त्वज्ञ (थोरो, रस्कीन, टॉल्स्टाय आदी) व रॅचेल कार्सन यांच्यासारख्या मानवतावादी शास्त्रज्ञापासून ग्रेटा थनबर्गसारखी शाळकरी मुलगी जी तथ्ये अधोरेखित करत आहे, त्याचा मानवसमाज आता तरी गांभीर्याने स्वीकार व कृती करेल?थोडक्यात, विनाशकारी वाढवृद्धी, विकासप्रणाली, जीवनशैलीत जगातील सत्ताधारी, धोरणकर्ते, महाजन, अभिजन आमूलाग्र बदल करतील की लॉकडाऊन उठताच परत अट्टाहासाने, विकासाच्या गोंडस नावाने तोच विमानप्रवास, मोटारवाहने, पंचतारांकित सेवा, आदी सर्व मस्तवालपणे चालू ठेवतील? आजमितीला सत्तेला हे सत्य सांगणं गरजेचं आहे, ही चैनचंगळ परवडणारी नाही.मंत्री, बडेबाबू, न्यायाधीश, कंपन्यांचे प्रमुख, मी मी म्हणणारे विद्वान, पत्रकार मंडळी सध्या मोटारवाहने बंद झाल्यामुळे प्रदूषण कमी झाल्याने मानवी आरोग्य व पृथ्वीच्या सुरक्षेसाठी वांच्छित असल्याचे मानत असतील, तर यापैकी प्रत्येकाने यापुढे ही वाहने, निरर्थक प्रवास याला सोडचिठ्ठी देण्यास काय अडसर आहे?
‘कोरोना’चा ढळढळीत धडा असा आहे की, यापुढे जगाला नव्या परिस्थितीजन्य संस्कृतीची नितांत गरज आहे. वसुंधरेचे रक्षण केले, तरच मानव निरोगी, सुखी राहू शकेल. किंबहुना, विकासाची प्रचलित संकल्पना, समीकरणे यात मूलभूत परिवर्तन आवश्यक आहे. सुदैवाने पर्याय उपलब्ध आहेत. यासंदर्भात डिजिटल तंत्रज्ञान, माहिती संसाधने, इंटरनेटची सार्वत्रिक उपलब्धता नि विपुल विदासंपदा याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठी वसुंधरा दिनी प्रतिज्ञा करावी की, ‘जगडव्याळ विचार, स्थानिक कृती व जो बदल वांच्छित आहे तो स्वत: बनणे.’ वसुंधरेचे रक्षण हा २१व्या शतकाचा युगधर्म आहे.पर्यावरण, परिस्थितीजन्य निसर्गव्यवस्था हा मानवाच्या भरणपोषण, जनकल्याणाचा मूलाधार असून प्रकल्प, योजना, बांधकामे पर्यावरणीय परिणामाची शहानिशा केल्याखेरीज राबवू नयेत! एकंदरीत, यापुढे विकास व प्रशासनाचा ढाचा यात आमूलाग्र बदल करून भारताला मोदींची पाच ट्रिलियन डॉलर व महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर (फडणवीस उवाच) अर्थव्यवस्था बनविण्याच्या बातम्यांना सोडचिठ्ठी देऊन सर्वांच्या मूलभूत गरजा भागवणारी विकेंद्रित, स्वदेशी, श्रमजिवींचा सन्मान करणारी अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था व संस्कृती निर्माण करणे ही वसुंधरा दिनाची आर्त हाक आहे. आज, २२ एप्रिलला केंद्र, राज्य सरकारे व जिल्हा प्रशासनांनी महात्मा गांधींचे स्मरण करून त्यांच्या स्वप्नांचा देश निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, प्रतिज्ञा घ्यावी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण