शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus : कोरोना विरोधातील लढाईचे हे परिणाम कसे दुर्लक्षित करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 00:12 IST

CoronaVirus : कोरोनामुळे अनेकांना आपले छंद जपण्याकरिता चांगलाच वेळ मिळाला आहे.

- संदीप प्रधान  (वरिष्ठ सहायक संपादक)कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणारे मृत्यू ही चिंताजनक आपत्ती आहे, यात वाद नाही. अनेक बेजबाबदार व्यक्ती विलगीकरणाचा सहजसाध्य उपाय करायलाही तयार नाहीत हे दुर्दैव आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारीवर्ग आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून या संकटाचा मुकाबला करीत आहे ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटाला जसे भीती, क्लेष, दु:ख, यातनांचे पदर आहेत तसेच जिद्द, आत्मविश्वास, एकजिनसीपणा वगैरे बाबींचे दिलासादायक पदरही आहेत. कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय हा होम क्वारंटाईन हाच असल्याने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेक नामवंत व्यक्ती, सेलिब्रेटी घराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त आहेत. दररोज आपण सारेच आपापल्या रुटीनमध्ये व्यस्त असल्याने आपल्याला अनेक गोष्टीकरिता वेळ काढता येत नाही. कोरोनामुळे अनेकांना आपले छंद जपण्याकरिता चांगलाच वेळ मिळाला आहे.

छोट्या पडद्यावर किंवा वेबसीरिजच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणारे कलाकारही सध्या घरी ‘कैद’ झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या करमणुकीचे वांदे झाले आहेत. लोकांची हीच अडचण ओळखून श्रीरंग गोडबोले यांनी त्यांच्या संस्थेच्यावतीने आॅनलाइन मैफिल जमवली आहे. यामध्ये तासभर वेगवेगळे कलाकार, गायक, कवी मनोरंजन करतात. संगीतकार कौशल इनामदार यांनी त्यांच्या वेबपेजवर ‘कौशल कट्टा’ सुरु केला आहे. अनेक प्रतिथयश गायक या कट्ट्यावर सुरेल मैफिली रंगवत असून कोरोनाच्या भयाने घरात कोंडलेल्यांचा दिवस सुरेल करतात. अमेरिकेतून आल्याने होम क्वारंटाईन झालेले अभिनेते अमेय वाघ हेही दररोज व्हिडीओ तयार करुन रसिकांशी आपली जोडलेली नाळ टिकवून ठेवत आहेत. ठाण्यातील एका संस्थेतर्फे सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने व राजश्री गढीकर हे संस्थेच्या फेसबुक पेजवरुन कथाकथन करुन लोकरंजन करीत आहेत.

लेखक, कवी, नाटककार यांच्याकरिताही ही एकाअर्थी पर्वणी आहे. व्याख्याने, कार्यक्रम, मालिकांचे लेखन वगैरे कामात अनेकांना आपल्या अपूर्णावस्थेतील साहित्यकृती पूर्ण करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे काहींचा कथासंग्रह येऊन दोन वर्षे झाली किंवा गेली सहा-आठ महिने प्रतीक्षा करुनही नाटक पूर्ण झाले नाही, अशी अवस्था होती. लेखिका, कवयित्री नीरजा या सध्या गेल्या दोन ते तीन वर्षांत लिहिलेल्या, परंतु अंतिम न केलेल्या कथांचे लेखन बैठक मारुन करीत आहेत. सुप्रसिद्ध नाटककार जयंत पवार हेही त्यांचे अपूर्ण असलेले नाटक पूर्ण करीत आहेत. नीरजा व पवार यांच्याप्रमाणेच अनेक लेखक, कवी हे आपल्या कलाकृती अंतिम करीत असल्याने कोरोनाचे सावट संपुष्टात येताच साहित्य क्षेत्रात नवीन ग्रंथांची निश्चित भर पडणार आहे. कोरोनाच्या संकटाचे सामाजिक, राजकीय, कौटुंबिक परिणाम हेही अनेक प्रतिभावंतांकरिता साहित्य निर्मितीकरिता प्रेरणादायी ठरणार आहेत.

अनेकदा सेलिब्रेटी हे गळ््यातले ताईत बनतात तसेच त्यांच्या व्यावसायिकतेमुळे घृणेचा विषय ठरतात. मात्र सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या दातृत्वाने कोरोनाच्या संकटात हातावर पोट असलेल्या नाट्यसृष्टीतील कामगारांना दिलासा दिला. शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष सुबोध भावे हेही सध्या सिनेसृष्टीतील तंत्रज्ञ व अन्य गरीब कामगारांना महिनाभराचा किराणा घरपोच करण्याकरिता धडपडत आहेत. अभिनेते जितेंद्र जोशी हे अन्य १५ कलाकारांसोबत कोरोना व लॉकडाऊन याबाबत व्हिडीओ तयार करुन जनप्रबोधन करीत आहेत. आनंद इंगळे यांनी आपल्या फेसबुकद्वारे पुण्यात वास्तव्य करीत असलेल्या वृद्ध दाम्पत्याना औषधे घरपोच केली. प्रवीण तरडे यांनी मराठवाडा, विदर्भातील जे विद्यार्थी पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. सुमारे १५० विद्यार्थ्यांना त्यामुळे दिलासा लाभला आहे.

कोरोनाचे दुष्परिणाम अनेक असले तरी त्याच्या या काही सकारात्मक बाबी पूर्णपणे दुर्लक्षून चालणार नाहीत. प्रत्येक माणूस कुटुंबाला वेळ देऊ लागला, लोकांच्या अंगातील चित्रकला, नृत्यकला यांना बहर आला, सापशिडीपासून कॅरम, पत्त्यांपर्यंतचे खेळ पुन्हा घराघरात खेळले जाऊ लागले. गेल्या काही वर्षांत विरळ होत गेलेला संवाद दाट झाला, वाहने रस्त्यांवर नसल्याने घराच्या खिडकीतून दिसणारे तेच आकाश निळे दिसू लागले, कारखाने बंद असल्याने नदीचे गढूळ पाणी स्वच्छ दिसू लागले. याचे स्वागत न करुन कसे चालेल?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या