शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

Coronavirus : ‘कोरोना’ संकटाने दाखविला प्रदूषण रोखण्याचा मार्ग!

By गजानन दिवाण | Updated: March 24, 2020 02:43 IST

Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटाचा सामना करीत असताना रविवारी जवळपास सर्वांनीच घरी राहणे पसंत केले. रस्ते अक्षरश: निर्मनुष्य दिसले. त्यामुळे राज्यात मुंबईसह सर्वच शहरांमध्ये वायू प्रदूषण प्रचंड कमी नोंदविले गेले.

- गजानन दिवाण ( उप वृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद)संकटे अनेक गोष्टी शिकवीत असतात. युद्धजन्य परिस्थितीचे, नैसर्गिक आपत्तीचे विविध विभागांकडून मॉकड्रील केले जाते, ते यामुळेच. संकटाच्या काळातच आपली बलस्थाने-कमजोरी समोर येत असतात. ‘कोरोना’च्या संकटाचेच पाहा. दररोज किती वायू प्रदूषण आम्ही टाळू शकतो, हे या संकटाने एका दिवसात दाखवून दिले. ‘कोरोना’च्या संकटाचा सामना करीत असताना रविवारी जवळपास सर्वांनीच घरी राहणे पसंत केले. रस्ते अक्षरश: निर्मनुष्य दिसले. त्यामुळे राज्यात मुंबईसह सर्वच शहरांमध्ये वायू प्रदूषण प्रचंड कमी नोंदविले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन आणि ‘कोरोना’विषयीची भीती-काळजी यामुळे लोकांनी वाहने घराबाहेर काढलीच नाहीत. यामुळे अनेकांची कामे खोळंबली, हे खरे असले तरी वाहनांचा अनावश्यक वापर टळला आणि प्रदूषणाला आळा बसला, हे सत्यदेखील नाकारून चालणार नाही.हवेमध्ये ० ते ५० पीएम आढळले तर सर्वात चांगली हवा मानली जाते. ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० खराब आणि ३०१ ते ४०० पीएम अतिखराब हवा मानली जाते. ४०० च्या पुढे पीएम आढळल्यास चिंताजनक परिस्थिती मानली जाते. रविवारी राज्यातील विविध शहरांत वाहने आणि लोकांची वर्दळ नसल्याने प्रदूषणात जवळपास निम्मी घट आढळून आली. १५ मार्चला धोक्याच्या पातळीत असणारी शहरे २२ मार्चला मात्र १०० पीएमच्या खाली आढळून आली. कल्याण १९९ पीएमवरून ६३ वर, मुंबई बांद्रा १२७ वरून ५० वर, पुणे ३१४ पीएमवरून ८० वर, औरंगाबाद ९२ वरून ८१ वर, तर ठाण्यात प्रदूषण १३० वरून ३६ पीएमपर्यंत घसरले. एरव्ही कायद्याचा दंडुका दाखवून किंवा मोठ्या प्रमाणावर जनजागृती करूनही हे शक्य झाले नसते. ‘कोरोना’च्या संकटाने ते करून दाखवले.या संकटाच्या आधीची आपल्या राज्यातील प्रमुख शहरांची प्रदूषणाची स्थिती पाहा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा २०१८-१९ चा प्रदूषण अहवाल नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झाला. यानुसार, राज्यात २५ शहरांतील ६५ टक्के नमुने हे २०१७-१८ च्या तुलनेत चांगल्या श्रेणीत, तर ३५ टक्के नमुने हे धोकादायक श्रेणीत आढळले. या अहवालात चंद्रपूर, मुंबईतील सायन, बांद्रा, डोंबिवली ही शहरे अतिप्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले. मागील आठ वर्षांपासून औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, नाशिक, डोंबिवली, बांद्रा, ऐरोली, पुणे आणि सोलापूर येथे वायू प्रदूषण वाढत असल्याचे हा अहवाल सांगतो. राज्यात धूळ प्रदूषणात चंद्रपूर प्रथम, तर मुंबई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.सल्फर डाय आॅक्साईडचे प्रदूषण महाराष्ट्रात कमी असले तरी मुंबई, पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात ते अधिक आहे. प्रदूषणामुळे वर्षाला १२ लाख लोक मरण पावतात, असा निष्कर्ष ‘ग्लोबल एअर २०१९’च्या अहवालातून काढण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगातील अति २० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १४ शहरे येतात. प्रदूषणामुळे डोके, गळा, नाक, फुफ्फुस, श्वसननलिकेचे आजार होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, मानसिक आजार, जनन क्षमतेवर परिणाम आणि कॅन्सरसारखे आजार होतात. प्रदूषणाचे एवढे मोठे धोके ठाऊक असूनही त्यात कमी होताना दिसत नाही.भरपूर झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन करण्यासोबतच अधिक जुन्या वाहनांचा वापर टाळणे, सीएनजीवर चालणारी वाहने, पर्यावरणपूरक वाहने, दिल्लीप्रमाणे सम-विषम क्रमांकाची वाहने आलटून-पालटून रस्त्यावर आणणे, असे अनेक उपाय केले जात आहेत. यानंतरही हवेतील प्रदूषण कमी होताना दिसत नाही. वाहनांची वाढती संख्या ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे.वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी करणे आम्हाला अशक्य नाही, हे ‘कोरोना’ संकटाने दाखवून दिले आहे. फक्त नियम-कायदे करून चालत नाही. त्या नियमांची-कायद्याची अंमलबजावणी होणे तेवढेच महत्त्वाचे असते. आमच्याकडे त्याचीच वानवा आहे.कायदे भरपूर असूनही ते तोडण्यासाठीच जणू आमची स्पर्धा असते. एखादी भीती किंवा संकटच आम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो. तो मार्ग या ‘कोरोना’ संकटाने आम्हाला दाखवून दिला आहे. वैयक्तिक वाहने आमच्यासाठी किती महत्त्वाची आहेत, हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. घरात वाहन असले तरी ते रस्त्यावर आणलेच पाहिजे असे नव्हे. अधिकाधिक वेळी सार्वजनिक वाहनांचा वापर करून आणि वैयक्तिक वाहनांचा अनावश्यक वापर टाळून आम्ही दररोज होणारे प्रदूषण टाळू शकतो. त्यासाठी पुन्हा ‘कोरोना’सारखे दुसरे संकट यायलाच हवे, याची वाट पाहायची कशासाठी?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या