शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus : ‘कोरोना’ संकटाने दाखविला प्रदूषण रोखण्याचा मार्ग!

By गजानन दिवाण | Updated: March 24, 2020 02:43 IST

Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटाचा सामना करीत असताना रविवारी जवळपास सर्वांनीच घरी राहणे पसंत केले. रस्ते अक्षरश: निर्मनुष्य दिसले. त्यामुळे राज्यात मुंबईसह सर्वच शहरांमध्ये वायू प्रदूषण प्रचंड कमी नोंदविले गेले.

- गजानन दिवाण ( उप वृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद)संकटे अनेक गोष्टी शिकवीत असतात. युद्धजन्य परिस्थितीचे, नैसर्गिक आपत्तीचे विविध विभागांकडून मॉकड्रील केले जाते, ते यामुळेच. संकटाच्या काळातच आपली बलस्थाने-कमजोरी समोर येत असतात. ‘कोरोना’च्या संकटाचेच पाहा. दररोज किती वायू प्रदूषण आम्ही टाळू शकतो, हे या संकटाने एका दिवसात दाखवून दिले. ‘कोरोना’च्या संकटाचा सामना करीत असताना रविवारी जवळपास सर्वांनीच घरी राहणे पसंत केले. रस्ते अक्षरश: निर्मनुष्य दिसले. त्यामुळे राज्यात मुंबईसह सर्वच शहरांमध्ये वायू प्रदूषण प्रचंड कमी नोंदविले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन आणि ‘कोरोना’विषयीची भीती-काळजी यामुळे लोकांनी वाहने घराबाहेर काढलीच नाहीत. यामुळे अनेकांची कामे खोळंबली, हे खरे असले तरी वाहनांचा अनावश्यक वापर टळला आणि प्रदूषणाला आळा बसला, हे सत्यदेखील नाकारून चालणार नाही.हवेमध्ये ० ते ५० पीएम आढळले तर सर्वात चांगली हवा मानली जाते. ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० खराब आणि ३०१ ते ४०० पीएम अतिखराब हवा मानली जाते. ४०० च्या पुढे पीएम आढळल्यास चिंताजनक परिस्थिती मानली जाते. रविवारी राज्यातील विविध शहरांत वाहने आणि लोकांची वर्दळ नसल्याने प्रदूषणात जवळपास निम्मी घट आढळून आली. १५ मार्चला धोक्याच्या पातळीत असणारी शहरे २२ मार्चला मात्र १०० पीएमच्या खाली आढळून आली. कल्याण १९९ पीएमवरून ६३ वर, मुंबई बांद्रा १२७ वरून ५० वर, पुणे ३१४ पीएमवरून ८० वर, औरंगाबाद ९२ वरून ८१ वर, तर ठाण्यात प्रदूषण १३० वरून ३६ पीएमपर्यंत घसरले. एरव्ही कायद्याचा दंडुका दाखवून किंवा मोठ्या प्रमाणावर जनजागृती करूनही हे शक्य झाले नसते. ‘कोरोना’च्या संकटाने ते करून दाखवले.या संकटाच्या आधीची आपल्या राज्यातील प्रमुख शहरांची प्रदूषणाची स्थिती पाहा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा २०१८-१९ चा प्रदूषण अहवाल नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झाला. यानुसार, राज्यात २५ शहरांतील ६५ टक्के नमुने हे २०१७-१८ च्या तुलनेत चांगल्या श्रेणीत, तर ३५ टक्के नमुने हे धोकादायक श्रेणीत आढळले. या अहवालात चंद्रपूर, मुंबईतील सायन, बांद्रा, डोंबिवली ही शहरे अतिप्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले. मागील आठ वर्षांपासून औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, नाशिक, डोंबिवली, बांद्रा, ऐरोली, पुणे आणि सोलापूर येथे वायू प्रदूषण वाढत असल्याचे हा अहवाल सांगतो. राज्यात धूळ प्रदूषणात चंद्रपूर प्रथम, तर मुंबई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.सल्फर डाय आॅक्साईडचे प्रदूषण महाराष्ट्रात कमी असले तरी मुंबई, पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात ते अधिक आहे. प्रदूषणामुळे वर्षाला १२ लाख लोक मरण पावतात, असा निष्कर्ष ‘ग्लोबल एअर २०१९’च्या अहवालातून काढण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगातील अति २० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १४ शहरे येतात. प्रदूषणामुळे डोके, गळा, नाक, फुफ्फुस, श्वसननलिकेचे आजार होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, मानसिक आजार, जनन क्षमतेवर परिणाम आणि कॅन्सरसारखे आजार होतात. प्रदूषणाचे एवढे मोठे धोके ठाऊक असूनही त्यात कमी होताना दिसत नाही.भरपूर झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन करण्यासोबतच अधिक जुन्या वाहनांचा वापर टाळणे, सीएनजीवर चालणारी वाहने, पर्यावरणपूरक वाहने, दिल्लीप्रमाणे सम-विषम क्रमांकाची वाहने आलटून-पालटून रस्त्यावर आणणे, असे अनेक उपाय केले जात आहेत. यानंतरही हवेतील प्रदूषण कमी होताना दिसत नाही. वाहनांची वाढती संख्या ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे.वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी करणे आम्हाला अशक्य नाही, हे ‘कोरोना’ संकटाने दाखवून दिले आहे. फक्त नियम-कायदे करून चालत नाही. त्या नियमांची-कायद्याची अंमलबजावणी होणे तेवढेच महत्त्वाचे असते. आमच्याकडे त्याचीच वानवा आहे.कायदे भरपूर असूनही ते तोडण्यासाठीच जणू आमची स्पर्धा असते. एखादी भीती किंवा संकटच आम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो. तो मार्ग या ‘कोरोना’ संकटाने आम्हाला दाखवून दिला आहे. वैयक्तिक वाहने आमच्यासाठी किती महत्त्वाची आहेत, हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. घरात वाहन असले तरी ते रस्त्यावर आणलेच पाहिजे असे नव्हे. अधिकाधिक वेळी सार्वजनिक वाहनांचा वापर करून आणि वैयक्तिक वाहनांचा अनावश्यक वापर टाळून आम्ही दररोज होणारे प्रदूषण टाळू शकतो. त्यासाठी पुन्हा ‘कोरोना’सारखे दुसरे संकट यायलाच हवे, याची वाट पाहायची कशासाठी?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या