शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा फटका शिक्षणाला; लॉकडाऊनला कवटाळून बसणाऱ्या राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:50 IST

मुलांना उत्तम शिक्षण देण्याची पालकांची आकांक्षा टाळेबंदीमुळे कोमेजली. टाळेबंदीचा नागरिकांच्या पगारावरील परिणाम अस्वस्थ करणारा आहे. २२ टक्के पगारदारांनी नोकऱ्या गमावल्या आणि पगार कपात ३० टक्क्यांवर गेली.

कोरोनाच्या भारतातील साथीचा आलेख अद्याप उतरणीला लागलेला नाही. संसर्ग रोखण्यासाठीची टाळेबंदी अनेक राज्यांत कायम आहे. टाळेबंदीतील निर्बंधांची अंमलबजावणी पूर्वीइतक्या कडकपणे होत नसली, तरी निर्बंध कायम असल्याने समाजाच्या आर्थिक नाड्या आखडलेल्या आहेत. कोरोनाचे वैद्यकीय दुष्परिणाम आता सर्वपरिचित आहेत. मात्र, कोरोनाची साथ व त्यापाठोपाठ आलेली टाळेबंदी याचे विविध क्षेत्रांवर होत असलेल्या परिणामांबद्दल पुरेशी जाणीव आलेली नाही. हे आर्थिक दुष्परिणाम पुढे येऊ लागले आहेत. टाळेबंदीचा पहिला फटका बसला आहे तो खासगी शिक्षणाला. खासगी शाळांची फी परवडत नसल्यामुळे या शाळांतून मुलांना काढून घेऊन त्यांची सरकारी शाळेत भरती करण्यास पालकांनी सुरुवात केली आहे. फी न परवडण्याचे कारण टाळेबंदीत गेलेली नोकरी वा घटलेला पगार हे आहे. भारतीय नागरिकांमध्ये मुलांना चांगले शिक्षण देण्याची आकांक्षा जबरदस्त आहे.

अन्य सांसारिक खर्चांना कात्री लावून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठविण्याची, खर्च करण्याची आणि प्रसंगी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढणाऱ्यांची संख्या देशात खूप मोठी आहे. गरिबीतून वर उठून मध्यमवर्गात शिरायचे असेल वा मध्यमवर्गातून उच्च मध्यमवर्गात जायचे असेल, तर शिक्षणाची शिडी आवश्यक आहे, असे देशात मानले जाते. त्यातही कौशल्यपूर्ण शिक्षणापेक्षा मुलांना पदवी शिक्षण देण्याकडे पालकांचा ओढा असतो. कारण कष्टातून मिळालेल्या पैशापेक्षा नोकरीच्या पगारातून मिळणाऱ्या पैशाचा या देशात सन्मान होतो. लोकांची ही मानसिकता लक्षात घेऊन उत्तम शिक्षणाचे आमिष दाखविणाऱ्या खासगी शाळा अनेक शहरांतून मोठ्या संख्येने उभ्या राहिल्या. १९९१ मध्ये अर्थव्यवस्था मुक्त झाल्यानंतर मध्यमवर्गाची संख्या वाढली, तसे या शाळांचे उत्पन्न वाढले. खासगी शाळा काढणे हा गत वीस वर्षांत किफायतशीर उद्योग झाला. याचदरम्यान सरकारी वा सरकारी अनुदान मिळविणाºया शाळांची गुणवत्ता झपाट्याने घसरत गेल्याने खासगी शाळांकडे अधिक लोक वळले. यातील काही शाळांत खरोखरच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते आणि गुणवत्ता नेहमीच खर्चिक असते.

कित्येक खासगी शाळांमध्ये गुणवत्तेच्या नावाखाली लूट होत असली, तरी चांगली शाळा चालविणे हे खर्चिक असते, हे मान्य करावेच लागते. कोरोना-टाळेबंदीमुळे हा खर्च शाळांबरोबर पालकांनाही परवडेनासा झाला आणि पालकांनी पुन्हा सरकारी अनुदानप्राप्त शाळांमध्ये मुलांना पाठविण्यास सुरुवात केली. गुजरातमध्ये खासगी शाळांतून ३० टक्के मुले कमी होऊन सरकारी शाळेत गेली. असाच ओघ पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा अशा अन्य अनेक राज्यांमध्ये दिसून आला. शिक्षणात वरचढ असणाऱ्या केरळमध्येही सीबीएसईची मुले या वर्षी कमी झाली. मुलांना उत्तम शिक्षण देण्याची पालकांची आकांक्षा टाळेबंदीमुळे कोमेजली. टाळेबंदीचा नागरिकांच्या पगारावरील परिणाम अस्वस्थ करणारा आहे. सीएमआई अहवालानुसार २२ टक्के पगारदारांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. सूचिबद्ध असलेल्या १५६० कंपन्यांचे गेल्या तीन महिन्यांचे हिशेब पाहिले, तर पगारावरील खर्चात मोठी कपात झाल्याचे दिसते. कापड उद्योगात २९ टक्के, चामडे उद्योगात २२ टक्के, मोटारींचे सुटे भाग निर्मितीच्या उद्योगात २१ टक्के पगारावरील खर्चात कपात दिसते.

पर्यटन क्षेत्रात ती ३० टक्क्यांपर्यंत गेली. शिक्षण क्षेत्रातील पगार कपात २८ टक्के आहे. नोकरी गेली व पगारही कमी झाल्यावर लोकांनी खर्च कमी करण्यास सुरू केला असून, त्याचा फटका मुलांच्या शिक्षणाला बसला. आर्थिक हतबलतेमुळे पालक सरकारी शाळांकडे वळले आहेत. गुणवत्तेमुळे नव्हेत, हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढविण्याची संधीही यातून सरकारला मिळत आहे. आरोग्य, शिक्षण, वाहतूक अशा क्षेत्रांत सरकारचे अस्तित्व हे गुणवत्तापूर्ण असेल, तर या खासगी संस्थांकडून होणाऱ्या लूटमारीवर आपोआप नियंत्रण येईल. सध्या तशी स्थिती नसल्याने अवास्तव फी उकळण्याची संधी खासगी शाळांना मिळते. तथापि, सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारणे हा खूप लांबचा प्रवास आहे. आर्थिक व्यवहार लवकर सुरळीत करणे आताची गरज आहे. टाळेबंदीला कवटाळून बसणाऱ्या राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे.

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या