शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तांबेंचा घोळ, काँग्रेसची नाचक्की अन् भाजपची खेळी

By यदू जोशी | Updated: January 13, 2023 10:33 IST

नाशिक पदवीधरमध्ये तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेसला दगा दिला. देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली. गाफील नेत्यांमुळे काँग्रेस तोंडावर पडली.

- यदु जोशी

विधान परिषदेच्या पाच शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील निवडणुकीचे निकाल ही शिंदे-फडणवीस सरकारची लिटमस टेस्ट असेल, तसेच महाविकास आघाडी अद्यापही एकत्र असल्याच्या दाव्यातील खरेखोटेपणाही समोर येईल. मुळात या मतदारसंघांतील उमेदवार हे फार आधीपासून ठरवायचे असतात, कारण चार-पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या मतदारसंघांत प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा लागतो, तसेच आपली मतदारनोंदणी अधिकाधिक करण्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे असते. ज्यांच्याकडे केडर मजबूत आहे त्यांची नोंदणी अधिक होते. उमेदवारीच्या घोषणेचे टायमिंग हा येथे कळीचा मुद्दा असतो. 

शिक्षक, पदवीधरांच्या निवडणुका या संघटनांच्या बॅनरखाली लढविण्याचे  प्रमाण पूर्वी अधिक होते; पण संघटनांकडून निवडून गेलेले आमदार विधान परिषदेत वा राजकारणात आपले ऐकत नाहीत, वा त्यांना व्हिप जारी करता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर राजकीय पक्षांनी थेट आपले उमेदवार लढवायला सुरुवात केली. संघटनांसाठी हा शह होता. यानिमित्ताने संघटनांचा संकोच करण्याचा वा संघटना संपविण्याचाही हेतू होता; काही ठिकाणी तो साधला गेला, काही ठिकाणी संघटनांनी आपली ताकद कायम ठेवत राजकीय पक्षांना झुकवले. 

स्वत:चे उमेदवार असोत की पाठिंब्यावरचे, भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, ती विधान परिषदेत आपला सभापती बसविण्यासाठी. त्यादृष्टीने सगळी खेळी खेळली जात आहे. विधानसभा तर हातात नाही, किमान विधान परिषद हातात ठेवण्यासाठी या पाच जागा किती महत्त्वाच्या आहेत याचे गांभीर्य महाविकास आघाडीला कळलेले दिसत नाही. शिक्षक मतदारसंघात लक्ष्मीदर्शन घडविणे हा प्रकार अलीकडच्या काळात काही ठिकाणी सुरू झाला. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत एका मतामागे पाच हजार रुपये आणि एक पैठणी वाटली गेल्याची जोरदार चर्चा झाली होती. यावेळी तरी लक्ष्मीकांत प्यारेलालचे संगीत वाजणार नाही, अशी अपेक्षा आहे.

अमरावती पदवीधरमध्ये विद्यमान आमदार डॉ. रणजित पाटील यांची उमेदवारी चार महिने आधी जाहीर केली. शिवसेनेतून आलेले धीरज लिंगाडे यांना काँग्रेसने काल उमेदवारी देऊन उशीर केला. १२ वर्षांत पाटलांनी पदवीधरांसाठी काय केले हा संशोधनाचा विषय. अकोल्याच्या राजकारणात भाजपमध्ये त्यांच्याशी कोणाचेही पटत नाही, पण देवेंद्र फडणवीसांचा वरदहस्त आहे. त्यांना पाडण्यासाठी गेल्या वेळी पक्षातील काही लोकांनी काँग्रेसचे संजय खोडके यांना मदत केली होती. यावेळी तसे दिसत नाही. तरीही कोणी काही काड्या केल्या तर तशांची यादी तयार होण्याची भीती आहेच.  उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढलेले ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवार देऊन महाविकास आघाडीचे तर बच्चू कडू यांनी प्रहारचा उमेदवार देऊन भाजपचे टेन्शन वाढविले आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपने शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांना पाठिंबा दिला.

महाविकास आघाडीचा उमेदवार ठरता ठरत नाही. मुंबईत बैठक करून उद्धव सेनेचे गंगाधर नाकाडे यांची उमेदवारी ठरविली गेली. काँग्रेसने वेगळा सूर लावला. राष्ट्रवादीचा म्हणून एकाने उमेदवारी अर्ज भरला. आ. कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली. काँग्रेसमधीलच एक गट विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या विरोधात आहे. पदवीधरमध्ये मिळविलेले यश टिकवण्याची रणनीती काँग्रेसने आखलीच नाही. काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या नागपुरातील बैठकीला बड्या नेत्यांनी दांडी मारली, पक्षात ताळमेळ नाही. राज्यात पाचपैकी एकाही ठिकाणी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नाही. 

गाणार तसेच औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांच्याबाबत अँटिइन्कमबन्सी फॅक्टर थोडाफार आहेच, पण दोघांकडेही नेटवर्क आहे. औरंगाबादेत आधी काँग्रेसमध्ये असलेले किरण पाटील यांनी भाजपची उमेदवारी मिळविली आहे. याशिवाय शिक्षक संघटनांचे सूर्यकांत विश्वासराव, प्रदीप साळुंके, मनोज पाटील, नितीन कुलकर्णी, डॉ. गणेश शेटकर आदी उमेदवार आहेत. पदवीधरमध्ये असलेली पूर्वतयारी शिक्षक मतदारसंघात नसणे ही भाजपची अडचण आहे. मात्र अर्जमाघारीनंतर बरेच चित्र स्पष्ट होईल. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील पुन्हा लढत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा आहे; उद्धव सेनेने तसे जाहीर केलेले नाही; पण त्यांच्यासोबतच जातील असे दिसते. शिंदे सेनेतून आलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रेंना भाजपने उमेदवारी दिली आहे. दोन्ही धनवान आहेत. म्हात्रे गेल्या वेळी क्रमांक दोनवर होते. विरोधकांची मते विभागल्याचा फायदा बाळाराम पाटलांना झाला होता, यावेळी त्यांची कसोटी आहे.

 नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे यांनी काँग्रेस आणि अपक्ष म्हणूनही अर्ज भरल्याने सस्पेन्स वाढला आहे. त्यांना काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्याने काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही. म्हणजे ते उद्या जिंकले तरी काँग्रेसला बांधिल नसतील. भाजपने कोणालाही उमेदवारी दिली नाही. याचा अर्थ भाजप तांबेंवर रुमाल टाकायला मोकळा आहे. काँग्रेसने सत्यजित यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती; पण अचानक सत्यजित आले. हे सगळे घडताना सत्यजित यांचे मामा बाळासाहेब थोरात मुंबईत होते अन् तिकडे नाशकात घोळ सुरू होता. नाशिकमध्ये काँग्रेसची नाचक्की झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीने काँग्रेस तोंडावर पडली. तांबे पिता-पुत्राने काँग्रेसला दगा दिला आणि काँग्रेसचे नेते गाफील राहिले.  महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांना उमेदवारी द्यावी, असे भाजपमध्ये चालले होते; पण एकाच घराण्यात मंत्रिपद, खासदारकी अन् आमदारकीही द्यायची का यावरून ते बारगळले. शिक्षक, पदवीधर मतदारसंघ हवेतच कशाला, इथले आमदार या वर्गाचे किती प्रश्न सोडवतात, अशी चर्चादेखील अधूनमधून होत असते. हा आत्मचिंतनाचा विषय!

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेसBJPभाजपा