शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
2
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
3
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
4
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
5
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
Pawan Singh : "सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी
7
722847400000 रुपयांची बंपर कमाई...! टीसीएस, इन्फोसिसनं रिलायन्सला मागं टाकलं, गेल्या आठवड्यात ही कंपनी राहिली आघाडीवर
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली
9
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
10
हृदयद्रावक! फुगा फुगवताना अचानक फुटला, श्वास नलिकेत अडकला अन्...; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
Smriti Mandhana: "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
12
EMI चा भार हलका होणार! RBI च्या निर्णयापाठोपाठ 'या' ४ बँकांकडून कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात
13
मोठी दुर्घटना! लग्न समारंभात आनंदाने नाचत होते लोक, अचानक कोसळलं घर; २५ महिला जखमी
14
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
15
हवाईत जगातील सर्वात घातक ज्वालामुखीचा उद्रेक, 400 मीटर उंच लावा उसळला; पाहा VIDEO
16
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
17
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
18
Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद...
19
कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन...
20
फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड
Daily Top 2Weekly Top 5

संसर्गाचा सारीताप, कोरोनाचा सारिपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 22:51 IST

गेल्या महिनाभरापासून या सारी रुग्णांची संख्या वाढत असून, औरंगाबादेत या आठवड्यात चौदाजणांचा बळी गेला आहे.

संजीव उन्हाळेराज्यभर कोरोनाचे थैमान असतानाच, तुलनेने कमी संसर्गजन्यता असूनही कोरोनाशी तंतोतंत साधर्म्य असलेला ‘सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन’ म्हणजेच सारी हा आजार मराठवाडा आणि विदर्भामध्ये वाढत आहे. तथापि, कोरोनापेक्षा या तीव्र वेदनादायी ‘सारी’मध्ये श्वसनसंस्थेची संसर्गबाधा झाल्याने मृत्यूचे प्रमाण जास्त म्हणजे किमान १५ टक्के आहे. राज्यभर या सारी आजाराने बाधित रुग्णांचे शासनाने सर्वेक्षण केले असून, त्यामध्ये ३.८ टक्के कोरोनाबाधित सापडले आहेत. अगदी अलीकडे शासनाने सर्व खासगी डॉक्टरांना ‘सारी’चा रुग्ण सापडला, तर अगोदर सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा आदेश दिला; पण गर्दी वाढल्याने उपचार आणि बडदास्त ठेवता-ठेवता नाकीनऊ आले आहे.

गेल्या महिनाभरापासून या सारी रुग्णांची संख्या वाढत असून, औरंगाबादेत या आठवड्यात चौदाजणांचा बळी गेला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गांभीर्य ओळखून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ‘ताप उपचार केंद्र सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. कोविड केअर सेंटरचा ताप उपचार केंद्र हा एक भाग असून, आता सार्वजनिक आरोग्य विभागाने बांधून पूर्ण केलेल्या; पण अद्याप वापरात नसलेल्या इमारती, स्टेडिअम, हॉटेल याठिकाणी आता सारी ताप असलेल्या रुग्णालासुद्धा दाखल करण्यात येईल. वस्तुत: कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल येऊनही जर ताप, श्वसनाचा आजार दिसून आला, तर त्याला सारी रुग्ण म्हणून दाखल करण्यात येते. असेही घडले आहे की, अगोदरचा निगेटिव्ह अहवाल नंतर पॉझिटिव्ह आढळला. मग कोरोनाचा रुग्ण म्हणून धांदल उडते. ‘सारी’साठी दाखल रुग्णांना प्रथम कोरोनाचे औषधोपचार चालू करणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर रुग्णालयात दाखल झालेला कोणताही ‘सारी’चा रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह आहे, असे समजूनच सर्व उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे,’ असे ज्येष्ठ डॉक्टर मंगला बोरकर यांनी सांगितले. वस्तुत: ‘सारी’ हा काही वेगळा आजार नाही, तर तीव्रतम श्वसन संस्थेचे आजार, शीतज्वर या संसर्गजन्य आजारांच्या समूहाला साकल्याने ‘सारी’ असे संबोधण्यात येते. त्यात स्वाईन फ्लू, बॅक्टेरिअल इन्फेक्शन, फ्लूपासून अलीकडे आलेल्या कोरोनाचाही समावेश होतो. मुळामध्ये न्यूमोनिया या आजारामध्ये अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत होते; पण त्याची माध्यमांनी कधीच गंभीरपणे दखल घेतली नाही. कोरोनाच्या आगमनानंतर या आजाराला विशेष महत्त्व आले आहे. ‘सारी’ची लक्षणे व कोरोनाची लक्षणे एकसारखीच आहेत. दम लागणे, ताप येणे, श्वासोच्छ्वासास त्रास होणे, खोकला यांपासूनच दोन्ही आजारांची सुरुवात होते. ‘सारी’ हा आजार कमी संसर्गजन्य आहे एवढेच. जागतिक तापमानवाढीमुळे ‘सारी’च्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. याघडीला महाराष्ट्रातील आठ जिल्हे, तमिळनाडू, गुजरात, केरळ, आदी राज्यांतही ‘सारी’ने हात-पाय पसरले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वयस्करांना लवकर होतो, तसे ‘सारी’चे नाही. लहान मुलांपासून मध्यमवयीन माणसांपर्यंत ‘सारी’चा संसर्ग दिसतो.मुंबईहून आलेले स्टेट बँक आॅफ इंडियाचे एक व्यवस्थापक देवळाई चौकामध्ये राहिले. त्यांना न्यूमोनिया झाला. त्यामुळे ‘सारी’ वॉर्डात दाखल करण्यात आले. शेवटच्या क्षणी ते कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आले. त्यानंतर श्वासोच्छ्वासक लावला; पण काही उपयोग झाला नाही. नंतर अल्पावधीत त्यांचा मृत्यू झाला. त्यांना न्यूमोनियाचा रुग्ण समजून घरातील सर्वांनी संपर्क ठेवला आणि चारजणांना न्यूमोनियाची बाधा झाली. अशा कितीतरी सारी-कोरोनाच्या कथा.इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केलेल्या संशोधनामध्ये असे लक्षात आले आहे की, ‘सारी’च्या रुग्णांमध्ये कोविड-१९चे रुग्ण सापडतात. ५,९११ सारी रुग्णांमध्ये १०४ कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून, ‘सारी’च्या पुरुष रुग्णांमध्ये कोरोना सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. जवळपास ४० टक्के न्यूमोनियासदृश आजार असलेल्या सारी-कोरोना संशयित रुग्णांमध्ये परदेशी पर्यटनाचा इतिहास नाही. तरीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आयसीएमआरने केलेल्या संशोधनामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील ५५३ सारी रुग्णांचा अभ्यास केला असता कोरोनाचे २१ पॉझिटिव्ह सापडले. या अहवालात सर्वाधिक ‘सारी’चे रुग्ण गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळले. सारीच्या संसर्गजन्य आजाराच्या गटामध्ये कोरोनाचा समावेश अपरिहार्य झाला आहे.अगोदरच सगळी जनता लॉकडाऊनने हैराण आहे. त्यात कोणत्या एखाद्या भागामध्ये कोरोना रुग्ण निघाला की, पोलीस व्यवस्था कडक होते. त्या सगळ्या यातनांतून मार्ग काढत असताना मध्येच ‘सारी’चा हा सारिपाट काही वेगळाच आहे. ‘सारी’चे रुग्ण हे केवळ शहरापुरते मर्यादित नसून, ग्रामीण भागातूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर येतआहेत. अगदी खेड्यातील सामान्य खासगी डॉक्टरसुद्धा सध्या सारी रुग्णांची जोखीम घ्यायला तयार नाहीत. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयाची वाट दाखविण्यात येते. प्रश्न एवढाच आहे की, शासनाच्या आरोग्य विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ आहे व अशा तोकड्या मनुष्यबळाच्या जोरावर कोरोनाप्रमाणेच ‘सारी’च्या रुग्णांची व्यवस्था ठेवणे, हे मोठे आव्हान आहे. यापैकी एकही रुग्ण कोरोनाबाधित असेल, तर आरोग्य कर्मचाऱ्यांचे भविष्यही टांगणीला लागल्यासारखे होणार आहे.( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत )

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या