शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

राज्यघटनेचा कैवार घेऊन राज्यघटनेचेच धिंडवडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 06:15 IST

केरळ विधानसभेने ‘सीएए’च्या विरोधात केलेला ठराव हा तर या विवेकशून्यतेचा कळस आहे. संसदेने कोणते व राज्य विधिमंडळाने कोणते कायदे करावेत याची विषयसूची राज्यघटनेने ठरवून दिली आहे. त्यानुसार ‘नागरिकत्व’ हा विषय पूर्णपणे संसदेच्या अखत्यारितील आहे.

राज्यघटना स्वीकारून भारत लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र झाल्याचे यंदाचे ७०वे वर्ष आहे. अनुभवाने राज्यघटना प्रगल्भ होण्याऐवजी धिंडवडे काढून तिला बोडकी करण्याची अहमहमिका सुरू असल्याचे विदारक चित्र सध्या देशात दिसत आहे. राजकीय आखाड्यात राज्यघटनेचे वस्त्रहरण करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांनी राज्यघटनेचाच कैवार घेऊन आपापल्या कृतीचे समर्थन करावे हे केवळ दुर्दैवीच नव्हे तर लांच्छनास्पद आहे. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) या त्रिकुटावरून सध्या काहूर माजले आहे.

भारताला रा. स्व. संघाच्या कल्पनेतील ‘हिंदुराष्ट्र’ बनविण्याच्या वाटचालीची ही त्रिसूत्री म्हणजे पहिले पाऊल आहे, असा आरोप करून सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. खास करून देशातील मुस्लिमांना देशोधडीला लावून ‘दुय्यम नागरिक’ करण्याचे सरकारचे हे कारस्थान आहे, असे म्हणत विद्यार्थी आणि ‘सिव्हिल सोसायटी’वालेही रस्त्यावर उतरत आहेत. विरोधी पक्षनेते व अन्य आंदोलक राज्यघटनेच्या ज्या ‘वुई दि पीपल...’ या प्रस्तावनेचे जाहीर वाचन करून निदर्शने करत आहेत, त्याच ‘वुई दि पीपल’ने निवडलेल्या संसदने ‘सीएए’ कायदा रीतसर मंजूर केला आहे. लोकशाहीत कायदे करण्याची हीच घटनासंमत पद्धत आहे. अण्णा हजारेंच्या ‘जनलोकपाल’ आंदोलनाच्या रूपाने एखादा कायदा कसा करावा, यासाठीचे देशव्यापी जनआंदोलन या देशाने पूर्वी पाहिले आहे. आता सत्तेत बसलेले त्या वेळी त्या आंदोलनाच्या लाटेवर स्वार झाले होते. ‘संपुआ’ आघाडीचे दुबळे सरकार त्या आंदोलनापुढे नमले. आताच्या आंदोलनाची तीच प्रेरणा आहे. पण आताचे आंदोलन नेमके उलटे म्हणजे संसदेने केलेला कायदा रद्द करण्यासाठी आहे व भक्कम बहुमत असलेले सरकार त्यापुढे अजिबात झुकायला तयार नाही.

सत्ताधारी आघाडीतील पक्षांची सरकारे असलेल्या बिहार व ओदिशासह आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये ‘सीएए’ व ‘एनपीआर’ न राबविण्याची भूमिका घेतली आहे. यापैकी काही मुख्यमंत्री आंदोलनात रस्त्यावरही उतरले. त्यांच्या पक्षांचे नेते या नात्याने त्यांनी आंदोलन करणे समजण्यासारखे आहे. पण मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी केंद्र सरकारने केलेला कायदा राज्यात राबविणार नाही, असे म्हणणे हा केवळ स्टंटबाज पोरकटपणाच नव्हे तर राज्यघटनेची प्रतारणा आहे. केरळ विधानसभेने ‘सीएए’च्या विरोधात केलेला ठराव हा तर या विवेकशून्यतेचा कळस आहे. संसदेने कोणते व राज्य विधिमंडळाने कोणते कायदे करावेत याची विषयसूची राज्यघटनेने ठरवून दिली आहे. त्यानुसार ‘नागरिकत्व’ हा विषय पूर्णपणे संसदेच्या अखत्यारितील आहे. हे संघराज्यातील एका राज्याने संघराज्याच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावणे आहे. राज्यांनी केंद्रास व संसदेस न जुमानणे सुरू केले तर राज्यघटनेने दिलेले व गेली ७० वर्षे जिवापाड जपलेले भारतीय प्रजासत्ताक गणराज्य खिळखिळे होण्यास वेळ लागणार नाही.
राज्य विधानसभेने ‘विशेषाधिकार’ वापरून हा ठराव केला, असे म्हणून केरळचे मुख्यमंत्री पिनराय विजयन यांनी त्याचे समर्थन केले आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावरून केरळ सरकार बरखास्त करण्याचे संकेत दिले आहेत. किंबहुना राजकारण करण्यास भक्कम मुद्दा मिळेल म्हणून विजयन यांनाही तेच हवे आहे. संघ-भाजप आणि कम्युनिस्ट यांच्यातील जुन्या, कट्टर हाडवैराचाही यास पैलू आहे. काँग्रेसनेही या ठरावात हिरिरीने सहभाग दिला. राजकीय पक्षांनी निकराने राजकारण जरूर करावे. लोकशाहीत त्यांचे तेच काम आहे. पण सत्ताकारण करताना राज्यघटनेचे कसोशीने पालन करणे अपरिहार्य आहे. भाजपने राज्यघटनेच्या आडून बहुमतवादी मग्रुरी दाखविली तरी विरोधकांनी राज्यघटनेचे भान ठेवायला हवे. अन्यथा एकाने गाय मारली म्हणून दुसºयाने वासरू मारल्यासारखे होईल. या राजकीय ‘गोवंश हत्ये’ने देशाच्या गळ्याला मात्र नक्कीच तात लागेल!

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी