शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

जाणता मतदार आणि गोंधळलेले पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 03:33 IST

या दोन राज्यांतील निवडणुकीच्या निकालांनी भाजपच्या चढत्या कमानीला कुठेही धक्का लागलेला नाही.

पवन के. वर्मा

एखादी घटना घडते आणि त्यामागोमाग अनेक घटना उलगडत जातात, ज्याचा अंतर्गत प्रभाव जाणून घेणे आपल्याला शक्य होत नाही. त्या घटनेविषयी अनेक जण तत्काळ प्रतिक्रिया देतात, त्याचे मूल्यमापन करतात. इलेक्ट्रॉनिक मीडियावरूनही त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होतात. पण त्या घटनेचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले जात नाही. त्यात नि:पक्षपातीपणाचा अभाव असतो आणि पूर्वग्रहसुद्धा असतात. दोन घटनांच्या मधल्या काळात त्या घटनांचा आढावा घेणे, आत्मचिंतन करणे यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे महत्त्वाच्या घटनांच्या प्रतिमासुद्धा धूसर होऊ लागतात. त्याबद्दल काढलेले निष्कर्षसुद्धा अपुरे असतात. हरयाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत झालेल्या निवडणुका, त्या निवडणुकांचे निकाल आणि त्या निकालानंतर उद्भवलेली परिस्थिती यासंदर्भात वरील विवेचन करण्यात आले आहे. या निवडणुकांचे निकाल घोषित होताच त्याआधारे काहींनी भाजपचे मृत्युलेखसुद्धा लिहून टाकले! तर काहींनी भाजपचा वरचश्मा अद्याप कायम असल्याचा शंखनाद केला. या दोन्ही तºहेच्या प्रतिक्रिया वस्तुस्थितीला धरून नव्हत्या, असे माझे मत आहे. सत्य हे या दोन्ही तºहेच्या प्रतिक्रियांच्या अधेमधे कुठे तरी होते, त्यातून सर्वच राजकीय पक्षांसमोर आव्हाने उभी झाली आहेत, हे मात्र नक्की.

या दोन राज्यांतील निवडणुकीच्या निकालांनी भाजपच्या चढत्या कमानीला कुठेही धक्का लागलेला नाही. दोन्ही राज्यांत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. महाराष्ट्रात त्याचे विजयाचे प्रमाण अधिक आहे. गतवेळेपेक्षा यंदा त्या पक्षाने कमी जागा लढवून १०५ जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. हरयाणातही त्या पक्षाने सत्ताविरोधी मानसिकतेवर मात करून सर्वात मोठा पक्ष होणे साध्य केले आहे. लोकमताचा विचार करता, तो पक्ष अद्यापही लोकांची पहिली पसंती ठरत आहे. तेव्हा भाजपची कामगिरी निराशाजनक म्हणता येणार नाही. पण तो अपेक्षेइतकी चांगली कामगिरी करू शकला नाही, हेही वास्तव आहे. हरयाणात तो पक्ष एकहाती सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत होता. ‘अबकी बार पचहत्तर पार’ (या वेळी ७५ पेक्षा जास्त जागा) ही त्याची घोषणा होती. पण ७५ ऐवजी तो फक्त ४० जागा जिंकू शकला, म्हणजे अर्ध्या जागाही त्याला जिंकता आल्या नाहीत. महाराष्ट्रातही भाजप-सेना मिळून २०० जागांची मर्यादा ओलांडतील, अशी त्यांना आशा होती. पण प्रत्यक्षात दोघे मिळून कशाबशा १६० जागा ते जिंकू शकले. या राज्यात एकहाती सत्ता स्थापन करता येईल, या आशा एक्झिट पोलनेदेखील प्रज्वलित केल्या होत्या. पण फक्त अ‍ॅक्सिस याच संस्थेचे अंदाज वस्तुस्थितीच्या जवळपास होते!एकूणच निवडणुकीचे निकाल भाजपसाठी पूर्णत: वाईट नव्हते, पण ते चांगलेही नव्हते! भाजपच्या हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रवादाच्या भूमिकेला अपेक्षेप्रमाणे यश लाभले नाही. कलम ३७० रद्द करणे ही आपली सर्वात मोठी कामगिरी आहे, असा त्या पक्षाने गवगवा केला. पण मतदारांनी त्याला फारसे महत्त्व दिले नाही. त्यांच्या दृष्टीने स्थानिक प्रश्न अधिक महत्त्वाचे होते. याशिवाय आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दुर्दशा या विषयाकडे मतदारांनी अधिक लक्ष दिले. मतदारांच्या या बदलत्या भूमिकेकडे भाजपने लक्ष देण्याची गरज आहे.

या निकालापासून विरोधकांनाही बोध मिळाला. बॉक्सरने एक हात पाठीशी बांधून रिंगणात उतरावे तसे विरोधी पक्ष निवडणुकींना सामोरे गेले. त्यांच्याजवळ कोणतेही नियोजन नव्हते. पराभूत मनोवृत्ती घेऊनच ते निवडणूक लढले. त्याला अपवाद होता तो शरद पवार यांचा. ८० वर्षांचे वय असताना ते मैदानात हिरिरीने उतरले आणि त्यांनी चांगली झुंज दिली. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्या. विरोधक विखुरलेले आणि प्रभावहीन असतानासुद्धा भाजपची ही अवस्था झाली, तर ते जर संघटित असते तर भाजपची स्थिती काय झाली असती, याची कल्पनाच केलेली बरी. तेव्हा हे विरोधकांसमोर आव्हान आहे. भाजपची भूमिका प्रतिक्रियावादी, विस्कळीत, तत्त्वशून्य अशीच होती. त्यामुळे निवडणूक निकालाने त्या पक्षाने जागे व्हायला हवे, तर काँग्रेसवर अधिक जबाबदारी आली आहे. त्या पक्षाने लढाऊ बाणा स्वीकारून भाजपला आव्हान दिले पाहिजे. आर्थिक मंदीमुळे निर्माण झालेल्या असंतोषाला एकजूट करू शकणाºया विरोधी पक्षाची देशाला गरज आहे, अन्यथा अपघाताने का होईना भाजप हा आपल्या संघटनात्मक कौशल्याच्या बळावर आगेकूच करीतच राहील.

 आपल्या चैतन्यमयी लोकशाहीला प्रभावी विरोधकांची गरज आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही गरज प्रतिपादन केली आहे. तेव्हा विरोधकांनी पुढाकार घेऊन स्वत:चे पुनरुज्जीवन करण्यास पुढे सरसावले पाहिजे. भाजपनेसुद्धा सध्याच्या आर्थिक दुरवस्थेला नाकारण्याची भूमिका टाकून देऊन, केवळ हिंदुत्वाच्या आधारावर राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्याचादेखील त्याग करायला हवा. सरतेशेवटी देशातील मतदार हाच सार्वभौम सम्राट असतो. त्याला स्वत:च्या जीवनाला प्रभावित करणाºया गोष्टी कोणत्या आहेत याची जाणीव असते आणि त्यांचा विचार करूनच तो मतदान करीत असतो. ही गोष्ट भाजप आणि विरोधक जितक्या लवकर ध्यानात घेतील तितके ते दोघांसाठीही हितकर ठरेल.( लेखक राजकीय विषयाचे विश्लेषक आहेत )

टॅग्स :VotingमतदानPoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस