शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अध्यक्ष ‘निवडण्या’साठी काँग्रेसचे ‘मुंबई मॉडेल’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 06:50 IST

Congress : काँग्रेस महासमितीच्या धुरिणांचे हे ‘मुंबई मॉडेल’ नेमके कसे काम करते? सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या १० जनपथवरच्या बैठकीत काय घडले?

- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

प्रतिष्ठेच्या काँग्रेस पक्ष अध्यक्षपदासाठी समजा निवडणूक झालीच तर सोनिया गांधी यांच्या जागी नवा अध्यक्ष लोकशाही प्रक्रियेतून कसा निवडला जाईल? अलीकडच्या काळातील घडामोडी पाहता अनेकांना हा प्रश्न पडला असेल. या निवडणुकीची प्रक्रिया प्रदीर्घ  असेल. सगळ्यात आधी देशभरातून ‘अखिल भारतीय काँग्रेस महासमिती प्रतिनिधी’ निवडले जातील. यांची संख्या १४०० हून अधिक असेल. पुढे हे अ. भा. काँग्रेस महासमिती प्रतिनिधी  काँग्रेसची नवी कार्यकारी समिती निवडतील. नंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये नवा अध्यक्ष निवडला जाईल. अर्थात निवडणूक पुढे ढकलली गेली नाही, तर हे असे याच क्रमाने घडेल.

दरम्यान, काँग्रेस महासमितीच्या धुरिणांनी एक नवीच पद्धत शोधून काढली आहे. ही पद्धत अलीकडेच मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष निवडण्यासाठी  वापरली गेली. मुंबईत या पद्धतीचा पहिला प्रयोग झाल्याने या पद्धतीला आता ‘मुंबई मॉडेल’ असेच संबोधले जात आहे. काय आहे हे ‘मुंबई मॉडेल’?  महाराष्ट्राच्या प्रभारी सरचिटणीसांनी ४५० नियोजित पक्ष पदाधिकाऱ्यांना मोबाइलवर  एक मौखिक संदेश पाठवला. या संदेशात काय म्हटले होते, ‘मी महासमिती प्रभारी एच. के. पाटील बोलत आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष कोण असावा, असे तुम्हाला वाटते, यावर मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. बीप आवाज झाल्यावर फक्त एक नाव तुम्ही सांगायचे. तुमचे उत्तर गुप्त राखले जाईल. धन्यवाद!’ 

आता ही सगळी कवायत नेमकी कोणी पार पाडली आणि कोणी नाही हे कोणालाच माहीत नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने चाललेल्या या नव्या पद्धतीत सगळे ठिकठाक पार पडेल, याची काळजी घेतली गेली. अत्यंत सफाईने सगळे केले गेले. अर्थात ‘तो’ फोन आला तेव्हा कोणी कोणते नाव सांगितले आणि मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष त्यातून कसा निवडला गेला, हे या क्षणापर्यंत ४५० पैकी कोणत्याच पदाधिकाऱ्याला नीटसे माहीत नाही, ही गोष्ट वेगळी!  पण आता हे मात्र स्पष्ट झाले आहे की, हे ‘मुंबई मॉडेल’ वापरूनच काँग्रेस महासमितीची निवड होईल. त्याचे कारण अगदी साधे आहे. राहुल गांधी यांच्या समर्थकांनी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्याचा चंग बांधला आहे. महासमितीचे प्रसिद्धी प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी तर जाहीरपणेच सांगितले  आहे की, ९९.९ टक्के काँग्रेसजनांना राहुल हेच अध्यक्ष म्हणून हवे आहेत. महासमितीच्या प्रतिनिधींपैकी ९९.९ टक्के प्रतिनिधींचे मत हे असे आधीच कळल्यावर मग उरले काय? अंतिम शब्द लिहिला जाणे  एवढेच बाकी उरते!

राहुल आणि त्यांचा नवा मोबाइल सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी, १० जनपथ येथे पाच तास बैठक झाली, तेंव्हा राहुल आणि प्रियांका आलेल्यांचे आगतस्वागत करत होते. खरे तर गांधी मंडळींची इच्छा झूमवर ऑनलाइन बैठक घ्यावी अशी होती; पण गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भूपिंदरसिंग हुडा यांच्यासह कोणत्याच बंडखोराला ही अशी ऑनलाइन चर्चा नको होती. त्यांनी समोरासमोर भेटीचा आग्रह धरला आणि सोनियांनी तो मान्यही केला. मात्र, राहुल त्यांच्या नव्या ‘आय फोन १२’ वर बोलण्यात गर्क होते, हे अनेक नेत्यांना खटकले. या बैठकीत सामील झालेल्या एका नेत्याने सांगितले की, राहुल तब्बल तीन तास फोनवर होते. मध्येच कमलनाथ, ए. के. एंटोनी यांच्याशी बोलण्यासाठी ते बैठक सोडून गेले. अधूनमधून फोन तर घेतच होते. उलट सोनिया गांधी मात्र अजिबात न उठता सलग ५ तास बैठकीत बसून होत्या.

हुडा यांचा बैठकीत दणका हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा हे एरवी मवाळ बोलतात. क्वचितच कठोर होतात; पण सोनियांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत स्पष्ट बोलणारे ते बंडखोरांपैकी एकमेव निघाले. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण या आणि इतर पत्रलेखक बंडखोरांनी काहीसा सामंजस्याचा सूर लावला होता खरा; पण हुडा यांनी मात्र एकदम काहीच आडपडदा न ठेवता बोलायला सुरुवात केली. एकदाच काय ते स्पष्ट बोलून मोकळे व्हायचे, हे त्यांनी ठरवले असावे. त्यांच्या बोलण्याने  हिरवळीवरील एरवी उबदार अशा  बैठकीत एकदम हुडहुडीच भरली. हुडा म्हणाले, ‘बडोद्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत १०० कोटी रुपये ओतून ती कडवी झुंज जिंकणाऱ्या भाजपविरुद्ध हरियाणात मी एकाकी लढत आहे. तरीही अनेक अडचणींचा सामना करत आपण भाजपला मात देत आहोत.’ एवढे बोलून हुडा थांबले नाहीत. गतवर्षी  विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्याला हरियाणात पक्षनेता केले असते तर आपण ती निवडणूक जिंकून दिली असती, असेही त्यांनी सांगून टाकले. ‘राज्यातल्या लोकांना मी हवा आहे; पण दुर्दैव असे की, दिल्लीला मी नको आहे.’,  हे सांगायलाही ते कचरले नाहीत. 

नड्डा यांची वाढती वट भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा  यांना कोविडने गाठले होते. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा कारभार गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या हातात घेतला. काहीशा कोड्यात टाकणाऱ्या कारणांनी बिहार निवडणुकीत ते सक्रिय दिसले नाहीत; पण आता बंगालमध्ये मात्र ममता बॅनर्जी यांना त्यांनी शिंगावर घेतले आहे. अर्थात नड्डा स्वस्थ बसलेले नाहीत. घरात राहून त्यांनी काम चालू ठेवले आहे. पश्चिम बंगालच्या ७ विधानसभा विभागांत सूत्रे हलवण्यासाठी त्यांनी सात केंद्रीय मंत्र्यांची निवड केली. असे म्हणतात की, ही निवड पंतप्रधानांच्या इच्छेनुसार केली गेली. मर्जीतल्या अनेक मंत्र्यांना बाजूला ठेवले गेल्याने आश्चर्यही व्यक्त झाले. बिहार निवडणुकीनंतर नड्डा यांची वट चांगलीच वाढली, हे उघड दिसते आहे. अगदी अलीकडची गोष्ट - भाजपचे राज्य असलेल्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांना मोदी यांची भेट हवी होती; परंतु ‘आधी पक्षाध्यक्षांना भेटून काय ते त्यांना सांगा,’ असे कोणाचे मन दुखावणार नाही, अशा पद्धतीने कळवण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा