शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

अमेठी हातची गेली, रायबरेलीही धोक्यात! सोनिया गांधींना शोधावी लागणार सुरक्षित जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 05:41 IST

काही दशके अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघांत काँग्रेस पक्ष पाय रोवून होता. आता सोनिया गांधींनाच उत्तर प्रदेशात सुरक्षित जागा शोधावी लागेल!

- हरीश गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्लीअमेठीत २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून अवमानास्पद रीतीने  पराभूत झाले होते. उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा शेवटचा बालेकिल्ला रायबरेली हाही आता अडचणीत आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पाचही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस पक्षाला पराभवाची नामुश्की पत्करावी लागली आहे. त्याहूनही अतिशय अवमानास्पद म्हणजे सर्व काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. अमेठी आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी प्रियांका गांधी यांनी जोरदार प्रचार करूनही हे घडले. शेवटच्या टप्प्यात राहुल गांधीही प्रचारासाठी आले होते. परंतु अमेठीतही  सर्वच्या सर्व पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या. गेली काही दशके अमेठी, रायबरेली हे दोन आणि बाजूच्या मतदारसंघात काँग्रेस पक्ष पाय रोवून होता. २००४ साली सोनिया गांधी रायबरेलीतून निवडून आल्या. इथून फिरोज गांधी आणि इंदिरा गांधीही अनेकदा निवडून आल्या होत्या. मात्र २०१९ मध्ये सगळेच बदलले आणि आता पक्षाच्या अध्यक्षांनाच उत्तर भारतात, विशेषत: उत्तर प्रदेशात सुरक्षित जागा शोधावी लागेल, असे चित्र दिसते आहे. २०१९ सालीही सपा, बसपा यांनी रायबरेलीत उमेदवार न देता काँग्रेसला अप्रत्यक्ष मदत केली हेही लक्षात घेतले पाहिजे. 

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३९९ जागा लढवल्या. त्यापैकी केवळ २ जागांवर पक्ष विजय मिळवू शकला. ३८७ ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली हा केवढा दैवदुर्विलास. पक्षाला फक्त २.४ टक्के मते मिळाली. सोनिया गांधी यांनी आता अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. २००४ साली त्यांनी भाजपला हरविण्यासाठी मोठी आघाडी उभी केली होती, त्या दिशेने पुन्हा हालचाली करण्याची वेळ आलेली आहे. गांधी कुटुंबाने आधी आपले घर सावरले नाही, तर उत्तर पट्ट्यात पक्षाला पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता कमी दिसते.भाजपचेही आत्मपरीक्षणउत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांत भाजप भले निवडणूक जिंकला असेल; पण मुस्लिमांची केवळ २ टक्के मते पक्षाला मिळाली हे पक्ष श्रेष्ठी नजरेआड करू शकत नाहीत. पंतप्रधानांच्या नावे चालणाऱ्या अनेक योजनांचा लाभ मुस्लिमांनाही झाला; पण मते मात्र पुरेशी मिळाली नाहीत.मतदानकेंद्रनिहाय मतांची तपासणी करता श्रेष्ठींना आश्चर्य वाटले. पक्षातल्या अनेकांनी मोठमोठे दावे करूनही मुस्लीम महिलांची मते पक्षाला मिळाली नाहीत. बहुसंख्याकांना न दुखावता मुस्लीम महिलांची मते कशी मिळवावीत या विवंचनेत भाजपचे नेते सध्या पडलेले दिसतात. 
उत्तर प्रदेशातून एखादी मुस्लीम महिला राज्यसभेत न्यावी अशी एक सूचना पुढे आली आहे. भाजप राज्यात राज्यसभेच्या किमान ७ जागा जिंकू शकतो. अनेक वर्षे पक्षाने नजमा हेपतुल्ला कार्ड वापरले. पण, अरब जगतात मोठा संपर्क असूनही त्यांचा फारसा प्रभाव आता पडत नाही. मुस्लिमांमध्ये पक्षाविरुद्ध केला जाणारा प्रचार लक्षात घेऊन भाजप एखादा नवा चेहरा समोर आणेल अशी शक्यता आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या चेअरमन शाईस्ता अंबर हिजाब प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. मुस्लीम मतांच्या बाबतीत भाजपच्या  हातून सगळे काही निसटलेले नाही असाच याचा अर्थ होतो.एक संपली, लगेच दुसरी लढाई..पाच राज्यांतील निवडणुकांची धूळ अद्याप खाली बसलेली नाही तोच निवडणुकांची नवी रणधुमाळी सुरू होण्याच्या खुणा दिसू लागल्या आहेत.राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून राज्यसभेच्या ७५ जागा रिक्त होत आहेत. डॉ. सुब्रमण्यम स्वामी, डॉ. नरेंद्र जाधव, छत्रपती संभाजीराजे, एम. सी. मेरी कोम, स्वप्न दासगुप्ता, रूपा गांगुली, सुरेश गोपी यांच्यासारखे ७ नियुक्त सदस्यही पायउतार होतील. मात्र, जनमताचा इतका कौल मिळूनही भाजप राज्यसभेत स्वबळावर बहुमत मिळवू शकत नाही. १०० जागा पक्ष मिळवू शकतो; पण बहुमतासाठी १२२ जागा लागतात. 
सर्व राज्यांपैकी महाराष्ट्रातली लढत चुरशीची होईल. तिथल्या ६ जागा लवकरच रिक्त होत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांना पक्ष नामनियुक्त करण्याऐवजी तिकिटावर आणू इच्छितो. राज्यात भाजप राज्यसभेच्या केवळ दोन जागा जिंकू शकतो. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील पक्षनेते पीयूष गोयल यांना दुसरी जागा जाईल. तसे झाल्यास या फेरीत निवृत्त होत असलेल्या विनय सहस्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे यांची सोय लावणे कठीण जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अनुक्रमे प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत यांना निवडून आणतील. पी. चिदंबरम तामिळनाडूकडे जातील. राज्यसभेतील काँग्रेसच्या एकमेव जागेसाठी मात्र खेळ अद्याप खुला आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस