शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

सामान्य माणसाला ‘बॅंकिंग’बाहेर फेकायचे ठरले आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 09:09 IST

सार्वजनिक क्षेत्रातील बँक-कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात संप पुकारला आहे. संपकरी कर्मचारी संघटनांची बाजू मांडणारे टिपण.

देवीदास तुळजापूरकर, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉइज फेडरेशन

सरकारतर्फे बँकिंग कायदा अधिनियम २०२१ हे विधेयक लोकसभेत मांडण्यात येत आहे. हे विधेयक मंजूर झाले, तर सरकारतर्फे अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेनुसार आयडीबीआय आणि  सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण या वर्षात करणे शक्य होईल.” फक्त तीन ते चार बँका सार्वजनिक क्षेत्रात ठेवण्यात येतील आणि उर्वरित सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्यात येईल”, असे सरकारतर्फे दोन वर्षांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आकड्यांच्या परिभाषेतील  नफ्याबरोबर सामाजिक नफ्यासाठीही काम करतात. जनधन, जीवन सुरक्षा, जीवन विमा, अटल पेन्शन, शेतकरी कल्याण योजना, पीक कर्ज, पीक विमा, बेरोजगारांसाठीची मुद्रा योजना, फेरीवाल्यांसाठीची स्व निधी योजना, कोरोना महामारीच्या काळात छोट्या, मध्यम उद्योग, व्यापार या क्षेत्रांसाठी राबविण्यात आलेली आणीबाणीची मदत योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी सर्व योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा वाटा ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण केले गेले, तर इतिहासाची चाके उलट्या दिशेने फिरतील.  खासगी क्षेत्रातील बँका नफा, फक्त नफा, वाट्टेल ते करून नफा यासाठी काम करतात.  या प्रक्रियेत खासगी बँका व्यवहार्यतेच्या नावावर  ग्रामीण भागातील शाखा, मागास भागातील शाखा बंद करतील.  आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना बंद करतील.  शेतीला देण्यात येणाऱ्या कर्जात कपात केली जाईल. एकूणच सामान्य माणसाला बँकिंग आणि पर्यायाने विकासाच्या वर्तुळाबाहेर फेकले जाईल. २०१७ ते २०२१ या चार वर्षांत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सामीलीकरणाचे धोरण अवलंबिले व या प्रक्रियेत  बँकांच्या २४०६ शाखा बंद करण्यात आल्या. यातील ८०७ शाखा ग्रामीण आणि निमशहरी भागातील आहेत.  याच काळात खासगी क्षेत्रातील  बँकांनी एकूण १०,९८९ नवीन शाखा उघडल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्यापुरते बोलायचे झाले, तर या चार वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ४३४ शाखा बंद केल्या आहेत, तर याच काळात खासगी क्षेत्रातील बँकांनी १०३४ नवीन शाखा महाराष्ट्रात उघडल्या आहेत. तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकारला  भांडवल उपलब्ध करून द्यावे लागते; या सबबीवर सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करू पाहत आहे; पण वस्तुस्थिती अशी की, या सर्व बँका या काळात कार्यगत नफा  कमवत होत्या. 

गेल्या १३ वर्षांत या बँकांनी १५.९७ लाख कोटी रुपये कार्यगत नफा कमविला होता. पण थकीत कर्जापोटी करावी लागणारी तरतूद होती १४.४२ लाख कोटी रुपये, ज्यात मोठा वाटा होता मोठ्या उद्योगांचा.  २००१ ते २०२१ या वीस वर्षांत बँकांनी या थकीत कर्जातील ९.८८ लाख कोटी रुपये निर्लेखित म्हणजे राईट ऑफ केले आहेत; ज्यात १० % पेक्षा कमी वसुली झालेली आहे . यातील ५ मोठ्या खात्यात बँकांनी ६८,६०७ कोटी रुपये निर्लेखित म्हणजे राईट ऑफ केले आहेत.  या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी रामबाण उपाय म्हणून दिवाळखोरी कायदा आला.  याअंतर्गत प्रक्रियेत तेरा मोठ्या खात्यात येणे रक्कम होती ४.४६ लाख कोटी रुपये. पण यात वसूल झालेली रक्कम आहे १.६१ लाख कोटी रुपये.  यासाठी बँकांना २.८५ लाख कोटी रुपये एवढ्या रकमेवर पाणी सोडावे लागले आहे.

खासगी बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतरच भारतातील बँकिंग व्यवस्थेचा खऱ्याअर्थाने विकास शक्य झाला.  १९६९ मध्ये बँकांच्या शाखा होत्या ८,०००; ज्या आज आहेत १,१८,०००! बँकांच्या  राष्ट्रीयीकरणामुळे सावकारी नष्ट झाली, शेतीचा विकास शक्य झाला, देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनला, रोजगार निर्मिती झाली, बँका खेड्यात, मागास भागात जाऊन पोहोचल्या,  अर्थव्यवस्थेला उभारी आली. १८६९ ते २०२० या काळात खासगी क्षेत्रातील २५ बँका दिवाळखोरीत निघाल्या होत्या.  त्यांना वाचवले ते सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी. म्हणून बँकिंग तसेच अर्थव्यवस्था स्थिर आहे. 

शेतीचा विकास, रोजगार निर्मिती, आर्थिक विषमता, आर्थिक तसेच सामाजिक मागासलेपण हे प्रश्न देशापुढे आहेत. अनेक जनसमूह भूक, गरिबी, दारिद्र्याशी झगडत आहेत.  अशा परिस्थितीत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण केले, तर बँकिंगमध्ये तसेच अर्थव्यवस्थेत अस्थैर्य निर्माण होईल, सामान्य माणूस बॅंकिंग म्हणजेच पर्यायाने विकासाच्या वर्तुळाबाहेर फेकला जाईल, हे नक्की!

टॅग्स :bankबँकIndiaभारत