शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

भाष्य - आप्पांची भांडणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 00:12 IST

भारतीय जनता पक्षाचे दक्षिणेतील विजयी महाद्वार म्हणून २००८मध्ये कर्नाटकाचे उदाहरण दिले जात होते. कारण जनसंघ ते भाजपा

 भारतीय जनता पक्षाचे दक्षिणेतील विजयी महाद्वार म्हणून २००८मध्ये कर्नाटकाचे उदाहरण दिले जात होते. कारण जनसंघ ते भाजपा या प्रवासात दक्षिण भारतातील एकाही राज्याने या पक्षाला स्वीकारलेले नव्हते. कर्नाटकात सत्तेवर येण्याचा प्रयत्न प्रथमच यशस्वी ठरला होता. त्या यशाचे नायक भाजपाचे कर्नाटकातील प्रथम मुख्यमंत्री बी. एस. येड्डीयुराप्पा होते. मात्र, या सरकारच्या पाच वर्षांच्या कालखंडाच्या अखेरीस भाजपांतर्गत गटबाजीतून वाताहत झाली. येड्डीयुराप्पा यांना भाजपातून बाहेर पडावे लागले. त्यांनी कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. या पक्षाला २०१३च्या विधानसभा निवडणुकीत केवळ दहा टक्के मते आणि त्यांचे सातच आमदार निवडून आले. पण त्या दहा टक्के मतांच्या विभाजनाने काँग्रेसचे पन्नासहून अधिक आमदार विजयी झाले. हा सर्व इतिहास ताजा असताना केवळ अकरा महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये पुन्हा गटबाजीने डोके वर काढले आहे. यावेळची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा येड्डीयुराप्पा यांच्या भोवतीच घोंगावते आहे. कर्नाटक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते के. एस. ईश्वराप्पा यांनी येड्डीयुराप्पा यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. केवळ स्वत:च्या माणसांचे पक्षात महत्त्व वाढविण्याचे, त्यांना पदे देण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यांच्या कामाची पद्धतही एकाधिकारशाहीची आहे, असा आरोप ईश्वराप्पा यांनी येड्डीयुराप्पा यांच्यावर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या गटबाजीने सार्वजनिक रूप धारण केले आहे. याची पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने नोंद घेतली. पक्षाचे राष्ट्रीय निरीक्षक पी. मुरलीधर राव यांनी तातडीने बंगलोर गाठले. त्यांनी दोन्ही गटाच्या प्रत्येकी दोन पदाधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकले. दरम्यान, माजी मंत्री व्ही. श्रीनिवास प्रसाद यांना येड्डीयुराप्पा यांनी प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त केले. या कृतीने ईश्वराप्पा यांच्या गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १० मेपर्यंत पक्षातील येड्डीयुराप्पा यांचा एकाधिकार पद्धतीचा कारभार बंद झाला नाही तर आपला गट वेगळा विचार करेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. ईश्वराप्पा यांनी संगोळी रायण्णा ब्रिगेडच्या व्यासपीठावरून चालविलेली मोहीम येड्डीयुराप्पा यांची अडचण ठरली आहे. संगोळी रायण्णा यांना क्रांतिकारक म्हणून धनगर समाजात मानणारा मोठा वर्ग आहे. त्या समाजाला दुखावण्याचे धाडस भाजपा करू शकत नाही. त्याचवेळी लिंगायत समाजाचे आयकॉन समजणारे येड्डीयुराप्पा यांनाही डावलायचे नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या लढाईपूर्वीच भाजपा गटबाजीने बेजार झाला आहे. या दोन आप्पांची सत्ताकांक्षा दडून राहिलेली नाही. मात्र, भाजपा यापैकी एकालाही डावलू शकत नाही. त्यांना एकत्र आणण्याचे आव्हान पक्ष कसे पेलतो त्यावर त्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.