शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - वेग मंदावला, पण...

By admin | Updated: May 1, 2017 01:01 IST

देशाची आजची १ अब्ज ३४ कोटी लोकसंख्या आणि तिच्या वाढीचा वेग लक्षात घेतला, तर २०२५ साली म्हणजे अवघ्या आठ वर्षांत आपण

देशाची आजची १ अब्ज ३४ कोटी लोकसंख्या आणि तिच्या वाढीचा वेग लक्षात घेतला, तर २०२५ साली म्हणजे अवघ्या आठ वर्षांत आपण चीनवर मात करून जगात पहिल्या क्रमांकावर जाऊ. लोकसंख्या वाढीचा वेग आणि प्रतिचौरस कि.मी. घनतेचा विचार केला, तर उत्तर प्रदेश (२८ व्यक्ती) खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेशची. तेथे प्रतिचौरस कि.मी. क्षेत्रात केवळ १७ व्यक्ती राहतात. उत्तर प्रदेशची तुलना केली, तर ८२८ व्यक्ती आणि केवळ १७ व्यक्ती. लोकसंख्येच्या अफाट वाढीमुळे देशातील उपलब्ध सर्व स्रोत कमी पडतात. त्याचा परिणाम आपल्याला पावलापावलावर जाणवतो. प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी येथे आपल्याला संघर्ष करावा लागतो. एकूणच चित्र भयावह आहे. नवीन आकडेवारीनुसार जन्मदर कमी होत आहे. ही आशादायक बातमी समजली पाहिजे. याचा अर्थ जन्मदर घसरला, तर लोकसंख्या वाढीचा वेग कमी होईल असा लावला जातो; पण भारतासाठी हे सूत्र चुकीचे ठरते. कुटुंबातील मुलांची सरासरी संख्या ही २.७ वरून २.२ पर्यंत कमी झाली. जन्मदर घटला असला तरी एकाची जागा दुसऱ्याने घेण्याचे प्रमाण कायम असल्याने लोकसंख्येची वाढ कायम आहे आणि २०५० पर्यंत १ अब्ज ७० कोटी आपली लोकसंख्या असेल. याचे कारण देशातील तरुण लोकसंख्या, जी सध्या ३६ कोटी ५० लाखांवर आहे. १० ते २४ वयोगटातील ही लोकसंख्या असल्याने पुनरुत्पादनालाही तेवढाच वाव आहे. म्हणजे जन्मदर कमी झाला, तरी लोकसंख्या वाढीचा वेग मात्र कमी होणार नाही. प्रत्येकाने एक मूल जन्माला घातले तरी वेग वाढतच राहील आणि ७५ टक्के लोकसंख्येच्या वाढीचा हा वेग असेल. जन्मदराचा विचार केला, तर राज्यांचाही मुद्दा पुढे येतो. उत्तरेकडच्या राज्यांचा जन्मदर वेग पाहता ही तरुण राज्ये ओळखली जातात, तर दक्षिणेकडील राज्यांचा जन्मदरच कमी असल्याने ही राज्ये हळूहळू ज्येष्ठांची राज्ये म्हणून नावारूपाला येतील. उत्तर प्रदेशची लोकसंख्या ब्राझीलएवढी आहे, तर महाराष्ट्राचा वाढीचा वेग हा मेक्सिकोशी स्पर्धा करतो. बिहार हे तिसऱ्या क्रमांकावर असून, जर्मनीच्या बरोबर आहे. स्त्री-पुरुषाच्या प्रमाणाचा विचार केला, तर केवळ केरळचा दर हा सर्वात जास्त आहे. वाढत्या समस्येचे मूळ वाढती लोकसंख्या असल्याने अजूनतरी आपण त्याचा गंभीरपणे विचार करीत नाही. लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला; पण परिणाम दिसणार नाही हेच खरे.