शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

भाष्य - वेग मंदावला, पण...

By admin | Updated: May 1, 2017 01:01 IST

देशाची आजची १ अब्ज ३४ कोटी लोकसंख्या आणि तिच्या वाढीचा वेग लक्षात घेतला, तर २०२५ साली म्हणजे अवघ्या आठ वर्षांत आपण

देशाची आजची १ अब्ज ३४ कोटी लोकसंख्या आणि तिच्या वाढीचा वेग लक्षात घेतला, तर २०२५ साली म्हणजे अवघ्या आठ वर्षांत आपण चीनवर मात करून जगात पहिल्या क्रमांकावर जाऊ. लोकसंख्या वाढीचा वेग आणि प्रतिचौरस कि.मी. घनतेचा विचार केला, तर उत्तर प्रदेश (२८ व्यक्ती) खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेशची. तेथे प्रतिचौरस कि.मी. क्षेत्रात केवळ १७ व्यक्ती राहतात. उत्तर प्रदेशची तुलना केली, तर ८२८ व्यक्ती आणि केवळ १७ व्यक्ती. लोकसंख्येच्या अफाट वाढीमुळे देशातील उपलब्ध सर्व स्रोत कमी पडतात. त्याचा परिणाम आपल्याला पावलापावलावर जाणवतो. प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी येथे आपल्याला संघर्ष करावा लागतो. एकूणच चित्र भयावह आहे. नवीन आकडेवारीनुसार जन्मदर कमी होत आहे. ही आशादायक बातमी समजली पाहिजे. याचा अर्थ जन्मदर घसरला, तर लोकसंख्या वाढीचा वेग कमी होईल असा लावला जातो; पण भारतासाठी हे सूत्र चुकीचे ठरते. कुटुंबातील मुलांची सरासरी संख्या ही २.७ वरून २.२ पर्यंत कमी झाली. जन्मदर घटला असला तरी एकाची जागा दुसऱ्याने घेण्याचे प्रमाण कायम असल्याने लोकसंख्येची वाढ कायम आहे आणि २०५० पर्यंत १ अब्ज ७० कोटी आपली लोकसंख्या असेल. याचे कारण देशातील तरुण लोकसंख्या, जी सध्या ३६ कोटी ५० लाखांवर आहे. १० ते २४ वयोगटातील ही लोकसंख्या असल्याने पुनरुत्पादनालाही तेवढाच वाव आहे. म्हणजे जन्मदर कमी झाला, तरी लोकसंख्या वाढीचा वेग मात्र कमी होणार नाही. प्रत्येकाने एक मूल जन्माला घातले तरी वेग वाढतच राहील आणि ७५ टक्के लोकसंख्येच्या वाढीचा हा वेग असेल. जन्मदराचा विचार केला, तर राज्यांचाही मुद्दा पुढे येतो. उत्तरेकडच्या राज्यांचा जन्मदर वेग पाहता ही तरुण राज्ये ओळखली जातात, तर दक्षिणेकडील राज्यांचा जन्मदरच कमी असल्याने ही राज्ये हळूहळू ज्येष्ठांची राज्ये म्हणून नावारूपाला येतील. उत्तर प्रदेशची लोकसंख्या ब्राझीलएवढी आहे, तर महाराष्ट्राचा वाढीचा वेग हा मेक्सिकोशी स्पर्धा करतो. बिहार हे तिसऱ्या क्रमांकावर असून, जर्मनीच्या बरोबर आहे. स्त्री-पुरुषाच्या प्रमाणाचा विचार केला, तर केवळ केरळचा दर हा सर्वात जास्त आहे. वाढत्या समस्येचे मूळ वाढती लोकसंख्या असल्याने अजूनतरी आपण त्याचा गंभीरपणे विचार करीत नाही. लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला; पण परिणाम दिसणार नाही हेच खरे.