शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - वेग मंदावला, पण...

By admin | Updated: May 1, 2017 01:01 IST

देशाची आजची १ अब्ज ३४ कोटी लोकसंख्या आणि तिच्या वाढीचा वेग लक्षात घेतला, तर २०२५ साली म्हणजे अवघ्या आठ वर्षांत आपण

देशाची आजची १ अब्ज ३४ कोटी लोकसंख्या आणि तिच्या वाढीचा वेग लक्षात घेतला, तर २०२५ साली म्हणजे अवघ्या आठ वर्षांत आपण चीनवर मात करून जगात पहिल्या क्रमांकावर जाऊ. लोकसंख्या वाढीचा वेग आणि प्रतिचौरस कि.मी. घनतेचा विचार केला, तर उत्तर प्रदेश (२८ व्यक्ती) खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेशची. तेथे प्रतिचौरस कि.मी. क्षेत्रात केवळ १७ व्यक्ती राहतात. उत्तर प्रदेशची तुलना केली, तर ८२८ व्यक्ती आणि केवळ १७ व्यक्ती. लोकसंख्येच्या अफाट वाढीमुळे देशातील उपलब्ध सर्व स्रोत कमी पडतात. त्याचा परिणाम आपल्याला पावलापावलावर जाणवतो. प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी येथे आपल्याला संघर्ष करावा लागतो. एकूणच चित्र भयावह आहे. नवीन आकडेवारीनुसार जन्मदर कमी होत आहे. ही आशादायक बातमी समजली पाहिजे. याचा अर्थ जन्मदर घसरला, तर लोकसंख्या वाढीचा वेग कमी होईल असा लावला जातो; पण भारतासाठी हे सूत्र चुकीचे ठरते. कुटुंबातील मुलांची सरासरी संख्या ही २.७ वरून २.२ पर्यंत कमी झाली. जन्मदर घटला असला तरी एकाची जागा दुसऱ्याने घेण्याचे प्रमाण कायम असल्याने लोकसंख्येची वाढ कायम आहे आणि २०५० पर्यंत १ अब्ज ७० कोटी आपली लोकसंख्या असेल. याचे कारण देशातील तरुण लोकसंख्या, जी सध्या ३६ कोटी ५० लाखांवर आहे. १० ते २४ वयोगटातील ही लोकसंख्या असल्याने पुनरुत्पादनालाही तेवढाच वाव आहे. म्हणजे जन्मदर कमी झाला, तरी लोकसंख्या वाढीचा वेग मात्र कमी होणार नाही. प्रत्येकाने एक मूल जन्माला घातले तरी वेग वाढतच राहील आणि ७५ टक्के लोकसंख्येच्या वाढीचा हा वेग असेल. जन्मदराचा विचार केला, तर राज्यांचाही मुद्दा पुढे येतो. उत्तरेकडच्या राज्यांचा जन्मदर वेग पाहता ही तरुण राज्ये ओळखली जातात, तर दक्षिणेकडील राज्यांचा जन्मदरच कमी असल्याने ही राज्ये हळूहळू ज्येष्ठांची राज्ये म्हणून नावारूपाला येतील. उत्तर प्रदेशची लोकसंख्या ब्राझीलएवढी आहे, तर महाराष्ट्राचा वाढीचा वेग हा मेक्सिकोशी स्पर्धा करतो. बिहार हे तिसऱ्या क्रमांकावर असून, जर्मनीच्या बरोबर आहे. स्त्री-पुरुषाच्या प्रमाणाचा विचार केला, तर केवळ केरळचा दर हा सर्वात जास्त आहे. वाढत्या समस्येचे मूळ वाढती लोकसंख्या असल्याने अजूनतरी आपण त्याचा गंभीरपणे विचार करीत नाही. लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला; पण परिणाम दिसणार नाही हेच खरे.