शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

चला, झोपड्या टाकायला सुरुवात करुया...!'

By अतुल कुलकर्णी | Updated: December 22, 2017 00:57 IST

तमाम मुंबईकर, नाताळासोबतच दिवाळी साजरी करण्याची संधी सरकारने दिलीय. २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी घेतला आहे.

तमाम मुंबईकर, नाताळासोबतच दिवाळी साजरी करण्याची संधी सरकारने दिलीय. २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी घेतला आहे. या महानगरातील झोपड्या हटवणे कुणालाही शक्यच नाही याची त्या सगळ्यांनी दिलेली ही जाहीर कबुली म्हणूनच अत्यंत कौतुकास्पद आहे. या सगळ्यांनी आपणच दिलेल्या मतांवर निवडून येत आपल्याला दिलेली ही ‘रिटर्न गिफ्ट’ आनंदाने घ्या. उगाच पाच-सहा कोटी खर्च करून फ्लॅट विकत घ्या, बिल्डरांच्या मागे पुढे धावाधाव करा, बँकेचे लोन घ्या, हप्ते भरा, असल्या फालतू गोष्टींची गरज नाही. दिसली मोकळी जागा की टाका झोपड्या. कारण १९७० ते २०११ पर्यंतच्या झोपड्या जशा नियमित झाल्या तशाच २०२१ पर्यंतच्या नियमित होतील. झोपडपट्टींनी भरलेले जगातले एकमेव शहर म्हणून आपल्या मुंबईची जगात नोंद होईल.मुंबईचे शांघाय करायचे म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी वर्षातला एक दिवस झोपडपट्टी उत्सव म्हणून साजरा करु. त्यादिवशी सगळ्यात चांगल्या झोपड्यांना बक्षिसं देऊ. ज्यांनी झोपड्या टाकायला मदत केली अशा नेत्यांचे सत्कार करू. अधिकाºयांना पुरस्कार देऊ. चॅनलवाले त्याचे लाईव्ह कव्हरेज करतील.या निर्णयाचे फायदेच फायदे आहेत. यामुळे मुंबईची वाहतूक मुंगीचे गतीने होऊ लागेल. आॅफिसला उशिरा जाण्याचा आनंद रोज घेता येईल. नाले तुंबल्याने उदबत्त्यांचा खर्च वाढेल. सर्वत्र कचºयाचे ढीग होतील. थोडा औषधांवरचा खर्च वाढेल पण हळूहळू तुम्हाला फक्त औषध गोळ्यांवरच रहायची सवय लागेल आणि अन्नावरची वासना उडाली की धान्य, भाजीपाल्याचा खर्च वाचेल... निसर्गाची अ‍ॅलर्जी किती तीव्र आहे हे पाहून डॉक्टर अमूक नाल्याच्या बाजूने रोज सकाळी १५ मिनिटे पायी चालत जा, असे प्रिस्क्रिप्शन लिहून देतील.घर नाही याची चिंता करू नका, ओव्हल मैदान, आझाद मैदान, दिसेल तेथे झोपड्या टाकल्या तरी तुम्हाला कुणी अडवणार नाही. उत्तरभारतीयांसाठी अमूक मैदान, बिहारींसाठी तमूक, विदर्भ, मराठवाड्यासाठी खारपट्टीच्या जागा झोपड्यांसाठी राखून ठेवल्या जातील. त्यांच्या गावात त्यांना अशा कुठेही झोपड्या टाकू देत नाहीत म्हणून ते इथे येतात. इथे त्यांना कुणी काही बोलत नाही, फुकटात घरं मिळतात. एवढी उदारता कोणत्या राज्यात आहे का? आपल्याला आपलंच कौतुक नाही. तथाकथित पर्यावरणवादी बडबड करतील. लक्ष देऊ नका. कशाला पाहिजेत खारपट्टे? चार-पाच वर्षात कधीतरी पूर येतो. येईल तेव्हा पाहू. मॅनग्रोव्हज कुठेही येतील. झोपड्या थोड्याच दुसरीकडे टाकता येतात राव...? विविध भागातील फुटपाथसुध्दा झोपडपट्टीदादांना अधिकृत दिले जातील. तेथे डबल स्टोरीड झोपड्या उभ्या राहतील. त्यामुळे थेट तुमच्या दारात सिटीबस थांबेल. आणखी काय करावं मायबाप सरकारने तुमच्यासाठी?जे अधिकारी आपल्याला झोपड्या टाकायला मदत करतात त्यांचीही सोय नको का करायला? अतिवरिष्ठ अधिकाºयांना मलबारहिलच्या हँगिंग गार्डनच्या आजूबाजूस, त्या खालच्या अधिकाºयांंना नरीमन पॉर्इंट, चौपाटी भागात झोपड्या टाकण्याची परवानगी मिळेल. पुढे मागे तेही या भागात एसआरएच्या योजना राबवू शकतील. या सगळ्यामुळे स्वस्तात घरे बांधण्याची वेगळी योजना पुन्हा राबविण्याची गरजच उरणार नाही. झोपड्यांचा विषय निघाला की काहींना पोलिसांची कीव येते. ते रस्त्यावर उभे राहून कमी कमवतात का? त्यांना कशाला पाहिजेत घरं. जर हवीच असतील तर त्यांनी देखील अन्य भाषिकांच्या नावावर झोपड्या टाकायला कुणाची परवानगी हवीय का?जाता जाता : आपापल्या जिल्ह्यातही झोपड्या टाकल्या तर त्याही नियमित करून मिळतील का ते आपल्या लोकप्रतिनिधींना विचारून घ्या, म्हणजे ‘सब भूमी गोपालकी’ हे खरं ठरेल...!- अतुल कुलकर्णी‘‘ं३४’@ॅें्र’.ूङ्मे

टॅग्स :Mumbaiमुंबई