शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

सामूहिक अबोध मन

By admin | Updated: November 9, 2015 21:38 IST

विसाव्या शतकातील आणखी एक थोर मानसशास्त्रज्ञ म्हणजे कार्ल गुस्टाव युंग. त्यांनी विश्लेषणात्मक मानसशास्त्राचा पाया घातला.

डॉ. दिलीप धोंडगेविसाव्या शतकातील आणखी एक थोर मानसशास्त्रज्ञ म्हणजे कार्ल गुस्टाव युंग. त्यांनी विश्लेषणात्मक मानसशास्त्राचा पाया घातला. व्यक्तिमत्त्वाचे अंतर्मुख व बहिर्मुख असे खरे स्वरूप त्यांनीच स्पष्ट केले. स्वत:च्या इच्छा-आकांक्षांमध्ये गुंतलेले मन अंतर्मुख व्यक्तिमत्त्वाचे तर सभोवतालच्या जगात गुंतलेले मन हे बहिर्मुख व्यक्तिमत्त्वाचे लक्षण. अंतर्मुख व्यक्ती ‘स्व’च्या पोषणाचा विचार करणारी तर बहिर्मुख व्यक्ती स्वेतरांच्या पोषणाचा विचार करणारी असते.युंग यांनी काही संज्ञा निर्माण केल्या व त्यांना स्वविशिष्ट अर्थ दिला. उदाहरणार्थ न्यूनगंड, मूलबंध इत्यादी. व्यक्तीच्या मनातील भावना पुंजात्मक स्वरूपाच्या असतात. त्याना गंड म्हणायचे. या भावनांचा स्तर निम्न असला की तो पुंज न्यूनगंडात्मक तर उच्च असल्यास तो अहंगंडात्मक गणला जातो. मूलबंध किंवा आदिबंधाचे स्वरूप समजून घेण्यासाठी युंगची सामूहिक अबोध मनाची कल्पना समजून घ्यावी लागते. मनाचा उभा छेद घेतला तर वरचे टोक सबोध आणि खालचे टोक सामूहिक अबोध मनाचे. या सामूहिक अबोध मनात युगानुयुगांच्या भावना साठलेल्या असतात. त्या नकळत स्वप्न, नवनिर्मिती दर्शविणारे शोध, कलाकृती यांच्याद्वारा प्रकट होत असतात. सामूहिक अबोध मनातील आशय आणि मानववंश यात संरचनात्मक संबंध असल्याची युंगची खात्री पटलेली होती.सामूहिक अबोध मनातील संचित हे मानवी विकासाचा पुरातन काळापासून वंशपरंपरागत आध्यात्मिक वारसा असतो. यामुळे सर्व मानवांमध्ये आदिम प्रतीके समान असतात व त्यानाच मूलबंध व आदिबंध म्हणतात. मानवी विकास हा मानवी अंतरंगाच्या उन्नयनाच्या अंगानेच लक्षात घ्यावा लागतो; भौतिक उन्नयनाच्या अंगाने नव्हे, हा याचा इत्यर्थ. व्यक्तिमत्त्वाच्या संकल्पनेच्या गाभ्याशी जीवात्मा असल्याचे युंगचे मत आहे. जीवात्मा म्हणजे स्व’च्या अस्तित्वाचे भान. या स्व’विषयक भानामुळे व्यक्तीला स्थैर्य आणि एकजिनसीपणा येतो. आत्मसाक्षात्कार हा व्यक्तिमत्त्व विकासातील फार वरच्या दर्जाचा, परिपक्वतेचा टप्पा होय. आपल्या मराठी संतांनी हा टप्पा गाठलेला होता. यामुळे त्यांच्या अनुभूतींना मानण्याचे परिमाण असण्याबरोबर वैश्विकतेची जाण होती. संतांच्या अनेकविध आविष्कारांमधून आत्मसाक्षात्काराची प्रस्फुरणे लक्षात येतात. संतांच्या अनुभूतींमधून सामूहिक अबोध मनातील आदिबंधांचे दर्शन घडते. युंगच्या मते मानवी मन शोधणे हेच आजचे खरे विज्ञान होय.