शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
2
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
3
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
6
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
7
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
8
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
9
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
10
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
11
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
12
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
13
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
15
ग्रीन टी, ब्लॅक टी सोडा... आता 'बनाना टी' एकदा प्या; स्ट्रेसला कराल बाय-बाय, हाडं होतील मजबूत
16
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
17
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
18
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
19
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
20
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन

विचारांचा सहवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 06:59 IST

प्रत्येक गोष्टीला कारण असते. विनाकारण कुठलीही कृती ही फुकट वेळ गमविण्याचे लक्षण समजले पाहिजे. साद-प्रतिसाद हा तर निसर्गनियमच आहे. मनुष्य ज्या पद्धतीची कृती करतो, विचार करतो, त्याच प्रकारचे फळ त्याच्या पदरात पडत असतात.

- विजयराज बोधनकार

प्रत्येक गोष्टीला कारण असते. विनाकारण कुठलीही कृती ही फुकट वेळ गमविण्याचे लक्षण समजले पाहिजे. साद-प्रतिसाद हा तर निसर्गनियमच आहे. मनुष्य ज्या पद्धतीची कृती करतो, विचार करतो, त्याच प्रकारचे फळ त्याच्या पदरात पडत असतात. वाईट कृती असेल, तर फळही वाईट मिळते आणि कृती मंगलमय असेल, तर फळही तितकेच मधुर मिळत राहते. जसे जो मनुष्य फक्त लोभ, भय, स्वार्थापोटी देवपूजा करीत असतो, त्याचे भय स्वार्थ वाढीस लागून त्याच्या पदरात कोरड्या दु:खाशिवाय काहीही पडणार नसते, परंतु जो मानसिक शांती आणि एकाग्रतेसाठी काही काळ मंदिरात किंवा घरात नामस्मरण आणि पूजापाठ करीत असेल, तर ज्याची शांती वाढत जाऊन एकाग्र वृत्तीमुळे त्याचा स्वभाव, त्याची कार्यपद्धती ही नक्कीच यशाकडे सरकत राहते. मनात जसा भाव असेल, तोच भाव तनामनात मुरत राहतो, तोच खरा प्रतिसाद असतो. दिवसातला काही काळ माणसाला मानसिक शांतीची गरज असते. त्यासाठीच माणसाने देव नावाचे एक प्रतीक शोधून काढले. ज्याच्यासमोर बसल्यानंतर त्याला पाहताक्षणी त्याचे गुण, विचार आपल्या मनातून संचारत जाऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत राहतो. ज्या ऊर्जेचा मानवाच्या व्यवहारिक जीवनात उपयोग होऊ शकतो. पूर्वीच्या काळी गावाबाहेरच्या उंच डोंगरावर मंदिरे बांधण्याची परंपरा होती, त्यामागे हेच कारण असायचे की, डोंगर चढताना एकाग्रतेने होणारा श्वासोच्छवास आणि निसर्गातली स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा याचा लाभ मनाला आणि शरीराला व्हावा, हाच उद्देश असायचा, प्राणायम किंवा कपालभाती त्या निमित्ताने सहजरीत्या होऊन अनेक रोगांपासून मुक्त हेण्याची शक्यता असायची. डोंगरावर या निमित्ताने जाऊन निसर्गसृष्टीचाही आनंद समाज घेऊन मन, बुद्धी, चित्त, आरोग्य उत्तम राहून परिवारावर पंचतत्त्वाची म्हणजेच ईश्वराची सतत कृ पादृष्टी राहत असायची. हेच त्यामागचे मूळ कारण होते. जसे देवाजवळचा दिवा, ही खरे तर प्रकाश पूजा म्हणायला हवी. रात्र झाल्यानंतर मिणमिणत्या वातीची ऊर्जा पूर्ण घराला मिळो आणि थोडा वेळ जरी ज्योतीवर एकाग्र केले, तरी प्रकाशाचे गुण मनबुद्धी प्रेरणा देवो, माणसाचे मन हे मुळातच चंचल वृत्तीचे असल्यामुळे त्याला स्थिर करण्यासाठीच अशा गोष्टीचा जन्म झाला. ज्याची वृत्ती स्थिर त्याला अनेक गोष्टींचा सहजच लाभ मिळत राहतो. त्याच्या स्थिर बुद्धीमुळे तो व्यक्ती उत्तम निर्णय घेण्यात, योजना आखण्यात, योजनांचा पाठपुरावा करण्यास, समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांची मने जिंकण्यात, व्यवहारिक गोष्टींचा ताळमेळ साधण्यात यश मिळवित राहतो. देवाधिकांची भक्ती म्हणजे व्यक्तीविकासाचे कारण असले पाहिजे. देव कुठलाही असो, त्याच्या भक्तीचे नेमके कारण काय, याची जर जाणीव असेल, तर त्या जाणिवेला सात्विक प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते. माणूस हाच खऱ्या अर्थाने त्याचा देव असतो. प्रत्येकाने आपला देव आपल्या अंतरात शोधायला पाहिजे. विचारांशिवाय कुठलीही भक्ती, देवपूजा म्हणजे निव्वळ वेळ वाया घालविणे होय. देव हा सकारात्मक विचारांचा सहवास आणि देव एक कर्मयोगाचा संस्कार आहे. तो कोरड्या पूजेने कदापिही होणार नाही. म्हणूनच सकारात्मक प्रबळ इच्छेचे कारण असेल, तर त्यामुळे मानवाला तसाच प्रतिसाद मिळत राहणार. म्हणून ग्रामगीतेत राष्टÑसंत तुकडोजी महाराज लिहितात, ‘त्याला सहवास उत्तम द्यावा, दर्जा जीवनाचा वाढवावा, त्याने समाज होईल नवा, ज्ञानवंतांचा निर्माण.’

टॅग्स :spiritualअध्यात्मिक